शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

ग्रामीण भागात पाणीप्रश्न गंभीर; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:02 AM

यावर्षी पाणीटंचाईची समस्या ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.

- संतोष सापतेश्रीवर्धन : नळाला येणारे पाणी बंद झाले...दैनंदिन कामासाठी पाणी तर लागतेच...पाणी अणण्यासाठी पायपीट करावी लागते...जेथे पाणी उपलब्ध होईल तेथे जावे लागते...गालसुर येथे बोअरवेलला पाणीच नाही...एकच विहीर पाणी आणण्यासाठी उपलब्ध आहे येथेही मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी गर्दी होते, त्यातून जसे पाणी उपलब्ध होईल असे आणावे लागते...हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत सध्या करावी लागत आहे, अशी प्रतिक्रिया रचना नादिवकर या गालसुरे येथील महिलेने दिली आहे.यावर्षी पाणीटंचाईची समस्या ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वावे, धनगरमलई, गुलधे, बापवली, साक्षीभैरी या गावांना तालुका प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे, परंतु तालुक्यातील इतर गावाचा प्रश्न उत्तरोत्तर बिकट बनत आहे. नियमित रोजंदारीवर काम करून उपजीविका चालवणाऱ्या लोकांना पाण्यासाठी रोजगार बुडवावा लागत आहे. घरातील लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे असे चित्र सध्या श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पहावयास मिळत आहे. पारंपरिक जलस्रोत असलेल्या विहिरीच्या पाण्याने तळ गाठले आहेत, विंधनविहिरी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करण्यात अयशस्वी ठरत आहेत , गावातील जुने हातपंप जास्तीत जास्त नादुरुस्त आहेत. सुव्यवस्थित हातपंप अशुद्ध पाणीपुरवठा करत आहेत त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. दिवस व रात्री लोकांची पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामीण भागात नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे .कोकणाच्या लाल मातीचा पोत बघता तिची पाणी साठवण क्षमता कमी आहे. निसर्गत: कोकणात भरपूर पाऊस पडतो, परंतु राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत कोकणात जलस्रोत साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी सरकार उदासीन असल्याचे दिसून येते. धरण, बंधारे यांचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. श्रीवर्धन तालुक्यात रानवली, कुडकी या दोन धरणाचा अपवाद वगळता इतर सरकार निर्मित स्रोतांचे प्रमाण फारच कमी आहे. बापवन, गालसुरे, निगडी, सायगाव, आडी, धारवली, मेघरे, हुन्नरवेली, वेळास, भरणा, वांजळे, दिघी, सर्वा, आदगाव, वडघरपांगळोली, गडबवाडी, मोहितेवाडी व कोलमांडला या ग्रामीण भागातील गावातील पाणीप्रश्न बिकट बनला आहे .हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धन येथील पर्यटन व्यवसायाला दुष्काळाच्या झळा पोहचत आहेत. धनगरमलई, वावे, नागलोली, गुलधे या गावांचा पाणीप्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. सरकारी यंत्रणेच्या विविध अभियान व उपक्रमांची दिशा व दशा यांचे चिकित्सक अवलोकन आणि परीक्षण अगत्याचे आहे, अन्यथा आगामी काळात संबंधित गावांचा प्रश्न अधांतरी राहील. ग्रामीण भागातील पेयजलाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पशुधन सांभाळणे जिकरीचे ठरत आहे. त्याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे. कोकणातील मान्सून लांबणीवर पडल्यास श्रीवर्धन तालुक्यात दुष्काळ दाह सोसावा लागणार आहे.

दूध उत्पादन घटलेयावर्षी पाणीटंचाईमुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांसाठी अवघड आहे. दुष्काळामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पयार्याने दूध उत्पादन घटले आहे. जोरदार फटका दूध व्यवसायाला बसला आहे.- मोतीराम परभळकर, दूध व्यावसायिक, बोर्लीपंचतनदिवसाआड पाणीधनगरमलई,वावे,नागलोली या गावाच्या पाणी प्रश्नी सरकारी यंत्रणेकडून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी गावात पाणीप्रश्न निर्माण होतो. टँकरने पाणीपुरवठा हा कायमचा उपाय होऊ शकत नाही त्यासाठी निर्णायक भूमिका सरकारदरबारी घेणे गरजेचे आहे. आम्हाला दिवसाआड पाणी मिळते ते सुद्धा मुबलक प्रमाणात मिळत नाही.- तृप्ती विचारे, शिक्षिका, नागलोलीपर्यटन व्यवसायाला फटकायंदा पाणीटंचाईचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटक येतात परंतु त्यांना योग्य सोईसुविधा पाण्याअभावी देणे अवघड ठरत आहे. नगरपालिकेकडून एकदिवसा आड पाणीपुरवठा केला जातो. नगरपालिकेने लवकरात लवकर टँकरने पाणी उपलब्ध करावे.- बाळा वाणी, हॉटेल व्यावसायिक, श्रीवर्धनपाणी हे जनावरांची देखील मुख्य गरज आहे. आमच्याकडील म्हशी, गायीचे पालन करणे कठीण झाले आहे. त्यांना चारा मिळणे अवघड झाले आहे, यामुळे दूध कमी निघते परिणामी दुधातून मिळणारे पैसे कमी झाले आहेत, यामुळे आर्थिक गणित बिघडले आहे.- उल्हास चितळे, शेतकरी, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगड