शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

रायगडमधील मंदिरे उघणार धार्मिक पर्यटनाचे दरवाजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 23:23 IST

बल्लाळेश्वर, शितलादेवी, हरिहरेश्वर देऊळ परिसरांमध्ये लगबग सुरू ;  जिल्ह्यातील उलाढाल आता पूर्ववत होणार 

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : करोनामुळे महाराष्ट्र शासनाने मंदिरांमध्ये घातलेली प्रवेशबंदी उठविल्यामुळे रायगड जिल्ह्यातील मंदिरांशी संबंधित असेलेले व्यावसायिक खूश झाले आहेत. धार्मिक पर्यटनामुळे जिल्ह्यात होणारी उलाढाल आता पूर्ववत होणार असल्याने मंदिर परिसरात लगबग दिसू लागली आहे.

रायगड जिल्ह्यात अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थाने आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणेश सुधागड आणि खालापूर तालुक्यांमध्ये आहेत. पाली येथील बल्लाळेश्वर आणि महड येथील वरदविनायक ही क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. गेले सात ते आठ महिने मंदिरे बंद असल्यामुळे या मंदिरांवर उभे असणारे अर्थकारण ठप्प झाले होते. राज्यभरातून लोक या ठिकाणी येतात. पूजापाठातून पुरोहितांना उत्पन्न मिळते. तेही ठप्प झाल्याने मंदिरांचे पुजारीही हवालदिल झाले होते. संत तुकारामांच्या भेटीने परमार्थमय झालेला खालापूर तालुक्यातील साजगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरही घंटानादाने भरून गेला आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. कोरोनामुळे या ठिकाणी शुकशुकाट होता. याच परिसरात दिवेआगर येथील गणपती अलीकडेच प्रसिद्धीस आला. विशेष म्हणजे बहुतेक तीर्थक्षेत्रांमध्ये फुले, पूजेचे साहित्य आदी उपयुक्त जिनसांची विक्री करणारे सर्व धर्मांचे आहेत. या व्यतिरिक्त चौल येथील शितलादेवी, बरहिरोळळे येथील कनेकश्वर मंदिरेही उघडल्यामुळे अलिबाग तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे. चौल परिसरात जवळपास तीन हजार मंदिरे आहेत. मंदिर पर्यटनाचा विशेष फायदा रायगड जिल्ह्याला होईल, असा पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभिप्राय आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांना जनता दल सेक्युलर पक्षातर्फे मंदिर पर्यटनाची योजना देण्यात येणार असल्याचे रायगड जिल्हा चिटणीस विजय खारकर यांनी सांगितले. मंदिरांच्या अर्थकारणाचा फायदा सर्वसामान्यांना झाला पाहिजे, असे सांगितले.

रसायनी: कोरोनामुळे आपणाकडेही मार्च २०२० पासून लाॅकडाऊन लागू झाल्यानंतर जवळ-जवळ आठ महिने सर्व धर्मियांची प्रार्थास्थळे बंद होती. मंदिराच्या पुजारी किंवा देखभाल करणाऱ्याव्यतिरिक्त सामान्य नागरिकांसाठी देवदर्शन बंद होते. सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे अटी/ शर्तीनुसार उघडण्यास सरकारने  परवानगी दिली.

रसायनी परिसरात गुळसुंदेचे प्राचीन श्री सिद्धेश्वराचे मंदिर,मोहोपाडा येथील रसेश्वर मंदिर, साईबाबा मंदिर,विठ्ठल-रूक्मिणी व हनुमान मंदिर,श्री .दत्त मंदिर,गणेश मंदिर,राम मंदिर आणि चर्च इ.मंदिरे आहेत. तर आपटा व वावेघर येथे मस्जिद आहेत. आठ महिन्यांपासून सर्व भक्तांना देवदर्शनासाठी ही मंदिरे बंद होती. 

ही सर्व प्रार्थनास्थळे सुरू होणार असल्याने संबंधित धर्मियांच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्वात जास्त आनंद मंदिर परिसरातील उपहारगृृृृहे, श्रीफळ,मिठाई, रसवंती,फुलांच्या व खेळण्यांच्या दुकानदारांना या हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनाही झाला आहे.

टॅग्स :Templeमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या