शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरला पर्यटकांची पसंती; गुलाबी थंडीत निसर्गसौंदर्याची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 23:43 IST

गुलाबी थंडीत निसर्गसौंदर्याची भुरळ : व्यावसायिकांनी व्यक्त केले समाधान; वीकेंण्डला होतेय गर्दी

दिघी : विस्तीर्ण समुद्रकिनारा व पुरातन मंदिर असणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे पर्यटन कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद होते. मात्र, अनलॉकमध्ये पर्यटन व्यवसाय सुरू झाले असून, मागील आठवड्यात दिवेआगर येथील पर्यटन सुरू झाले असताना, या शनिवार रविवार सुट्टीत फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना येथील गुलाबी थंडीमुळे निसर्गसौंदर्याने भुरळ पाडलीय. त्यामुळे आता पुन्हा पर्यटकांची हळूहळू रेलचेल सुरू  झाली असून, येथील  व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये थंडीने जोर धरला असून, श्रीवर्धनमध्ये किमान तापमानामध्ये घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या या गुलाबी थंडीमुळे येथील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेताना पर्यटकांचा आनंद द्विगुणीत होत आहे. श्रीवर्धन परिसरात सायंकाळच्या वेळेस किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात बदल  होऊन थंडीचे प्रमाण वाढत आहे. हीच परिस्थिती आगामी पुढील दिवसांत कायम राहण्याचा अंदाज  व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता सध्या दिवाळी पर्यटन  हंगामात दिवेआगर येथे पर्यटकांची वाढ झालेली दिसून येत आहे.

गेल्या आठवडाभरापासून सर्वच भागांमध्ये तापमान दिवसेंदिवस खाली येत आहे. या महिन्यात दिवसभर ३० अंशपर्यंत गेलेलं तापमान आता सायंकाळी १० ते १५ अंश सेल्सिअसवर आले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून २५ ते २० अंशांदरम्यान तापमान राहू लागले. त्यामुळे अचानक थंडीची लाट आल्याचा अनुभव श्रीवर्धन मधील नागरिक घेत आहेत. 

मुख्य रस्त्यावर सकाळी ८ वाजेपर्यंत वातावरणात धुके दिसत आहे. त्यामुळे आता राज्यभरातले पर्यटकही शहराच्या कोंडीतून बाहेर पडून कोकणातले निसर्गसौंदर्य अनुभवायला दिवेआगरची वाट धरत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड