शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २४१ बालके अतिकुपोषित

By admin | Updated: September 29, 2016 03:42 IST

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न चर्चेत असताना रायगड जिल्ह्यातही २४१ अतिकुपोषित, तर ९५८ कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- कांता हाबळे, नेरळठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न चर्चेत असताना रायगड जिल्ह्यातही २४१ अतिकुपोषित, तर ९५८ कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्यातील १६ जिल्ह्यात राज्य सरकारच्या महिला बाल कल्याण विभागाची एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली. कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा यात समावेश होता. कर्जत तालुक्यातील १४७ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र मे महिन्यात सुरू झालेली ही योजना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य न मिळाल्याने १५ दिवसांतच बंद पडली.योजनेनुसार कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त आहार पुरवला जाणार होता. यात केळी, अंडी, खजूर यांचा समावेश करण्यात येणार होते. मात्र अन्न शिजवण्यासाठी निधीच नसल्याने ही योजना बंद पडल्याचे सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीत समोर आले.आदिवासी विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांचा समन्वय नसल्याचा आरोप आदिवासी विभागात काम करणाऱ्या संघटनांकडून केला जात आहे. महिला व बालकल्याण विभागातील अनेक पदे सध्या रिक्त आहेत. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्यात मर्यादा येत आहेत.कुपोषित बालकांची संख्या वाढली असली तरी, आरोग्य तपासणीत आजारी आढळलेल्या बालकांना आणि त्यांच्या मातांना संदर्भ सेवा देण्यात येत आहे. त्यांना योग्य व पूरक आहार मिळेल, यांची खबरदारी घेतली जात आहे. कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत सांगण्यात आले.कुपोषणाची कारणेआदिवासी विभागाकडून पोषण आहार योजनेसाठी केली जाणारी आर्थिक तरतूद ३२ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. सुरु वातीला ही तरतूद ६२ टक्के होती. मात्र सरकारी पाठपुराव्यानंतर यात ३0 टक्के घट करण्यात आली. पोषण आहार योजनेसाठी गाव, तालुका पातळीवरील समित्या अस्तित्वात नाही. अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार हा शिजवून दिला पाहिजे. मात्र पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने पोषण आहार योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात १७ प्रकल्प जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील १७ प्रकल्पांतील २,६०४ अंगणवाड्यांचे तसेच ६०४ छोट्या (मिनी) अंगणवाड्यांतील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात एकूण १ लाख ५५ हजार ७७७ बालकांची तपासणी केली. सर्वेक्षणात २४१ बालके अतिकुपोषित, ९५८ बालके कुपोषित आढळून आली. कमी वजन असलेली १,१५२ बालके आढळली. कर्जत, सुधागड पाली, पेण, खालापूर येथे कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे.कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त आहार पुरवला जाणार होता. यात केळी, अंडी, खजूर यांचा समावेश करण्यात येणार होते. मात्र अन्न शिजवण्यासाठी निधीच नसल्याने ही योजना बंद पडल्याचे सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीत समोर आले.निधीअभावी प्रकल्प एकमध्ये १५ एप्रिलपासून तर प्रकल्प दोनमध्ये जुलै महिन्यापासून पोषण आहार योजना बंद आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला असून पुढील आठवड्यात ही योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. - आर.एन.सांबरे, प्रभारी अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प पोषण आहार योजनेसाठी केली जाणारी आर्थिक तरतूद वाढवण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना त्यांचे मानधन वेळच्या वेळी मिळावे. पोषण आहार मुलांना आवडेल असा असावा आणि तो गरम शिजवून द्यावा, कुपोषणमुक्तीसाठी विविध स्तरावर कार्यरत समित्यांचे तातडीने गठन व्हावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी स्वतंत्र कक्षांची स्थापना करण्यात यावी.- अशोक जंगले, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत