शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २४१ बालके अतिकुपोषित

By admin | Updated: September 29, 2016 03:42 IST

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न चर्चेत असताना रायगड जिल्ह्यातही २४१ अतिकुपोषित, तर ९५८ कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- कांता हाबळे, नेरळठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न चर्चेत असताना रायगड जिल्ह्यातही २४१ अतिकुपोषित, तर ९५८ कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्यातील १६ जिल्ह्यात राज्य सरकारच्या महिला बाल कल्याण विभागाची एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली. कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा यात समावेश होता. कर्जत तालुक्यातील १४७ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र मे महिन्यात सुरू झालेली ही योजना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य न मिळाल्याने १५ दिवसांतच बंद पडली.योजनेनुसार कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त आहार पुरवला जाणार होता. यात केळी, अंडी, खजूर यांचा समावेश करण्यात येणार होते. मात्र अन्न शिजवण्यासाठी निधीच नसल्याने ही योजना बंद पडल्याचे सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीत समोर आले.आदिवासी विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांचा समन्वय नसल्याचा आरोप आदिवासी विभागात काम करणाऱ्या संघटनांकडून केला जात आहे. महिला व बालकल्याण विभागातील अनेक पदे सध्या रिक्त आहेत. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्यात मर्यादा येत आहेत.कुपोषित बालकांची संख्या वाढली असली तरी, आरोग्य तपासणीत आजारी आढळलेल्या बालकांना आणि त्यांच्या मातांना संदर्भ सेवा देण्यात येत आहे. त्यांना योग्य व पूरक आहार मिळेल, यांची खबरदारी घेतली जात आहे. कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत सांगण्यात आले.कुपोषणाची कारणेआदिवासी विभागाकडून पोषण आहार योजनेसाठी केली जाणारी आर्थिक तरतूद ३२ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. सुरु वातीला ही तरतूद ६२ टक्के होती. मात्र सरकारी पाठपुराव्यानंतर यात ३0 टक्के घट करण्यात आली. पोषण आहार योजनेसाठी गाव, तालुका पातळीवरील समित्या अस्तित्वात नाही. अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार हा शिजवून दिला पाहिजे. मात्र पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने पोषण आहार योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात १७ प्रकल्प जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील १७ प्रकल्पांतील २,६०४ अंगणवाड्यांचे तसेच ६०४ छोट्या (मिनी) अंगणवाड्यांतील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात एकूण १ लाख ५५ हजार ७७७ बालकांची तपासणी केली. सर्वेक्षणात २४१ बालके अतिकुपोषित, ९५८ बालके कुपोषित आढळून आली. कमी वजन असलेली १,१५२ बालके आढळली. कर्जत, सुधागड पाली, पेण, खालापूर येथे कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे.कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त आहार पुरवला जाणार होता. यात केळी, अंडी, खजूर यांचा समावेश करण्यात येणार होते. मात्र अन्न शिजवण्यासाठी निधीच नसल्याने ही योजना बंद पडल्याचे सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीत समोर आले.निधीअभावी प्रकल्प एकमध्ये १५ एप्रिलपासून तर प्रकल्प दोनमध्ये जुलै महिन्यापासून पोषण आहार योजना बंद आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला असून पुढील आठवड्यात ही योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. - आर.एन.सांबरे, प्रभारी अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प पोषण आहार योजनेसाठी केली जाणारी आर्थिक तरतूद वाढवण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना त्यांचे मानधन वेळच्या वेळी मिळावे. पोषण आहार मुलांना आवडेल असा असावा आणि तो गरम शिजवून द्यावा, कुपोषणमुक्तीसाठी विविध स्तरावर कार्यरत समित्यांचे तातडीने गठन व्हावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी स्वतंत्र कक्षांची स्थापना करण्यात यावी.- अशोक जंगले, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत