शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जिल्ह्यात २४१ बालके अतिकुपोषित

By admin | Updated: September 29, 2016 03:42 IST

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न चर्चेत असताना रायगड जिल्ह्यातही २४१ अतिकुपोषित, तर ९५८ कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- कांता हाबळे, नेरळठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न चर्चेत असताना रायगड जिल्ह्यातही २४१ अतिकुपोषित, तर ९५८ कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्यातील १६ जिल्ह्यात राज्य सरकारच्या महिला बाल कल्याण विभागाची एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली. कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा यात समावेश होता. कर्जत तालुक्यातील १४७ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र मे महिन्यात सुरू झालेली ही योजना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य न मिळाल्याने १५ दिवसांतच बंद पडली.योजनेनुसार कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त आहार पुरवला जाणार होता. यात केळी, अंडी, खजूर यांचा समावेश करण्यात येणार होते. मात्र अन्न शिजवण्यासाठी निधीच नसल्याने ही योजना बंद पडल्याचे सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीत समोर आले.आदिवासी विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांचा समन्वय नसल्याचा आरोप आदिवासी विभागात काम करणाऱ्या संघटनांकडून केला जात आहे. महिला व बालकल्याण विभागातील अनेक पदे सध्या रिक्त आहेत. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्यात मर्यादा येत आहेत.कुपोषित बालकांची संख्या वाढली असली तरी, आरोग्य तपासणीत आजारी आढळलेल्या बालकांना आणि त्यांच्या मातांना संदर्भ सेवा देण्यात येत आहे. त्यांना योग्य व पूरक आहार मिळेल, यांची खबरदारी घेतली जात आहे. कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत सांगण्यात आले.कुपोषणाची कारणेआदिवासी विभागाकडून पोषण आहार योजनेसाठी केली जाणारी आर्थिक तरतूद ३२ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. सुरु वातीला ही तरतूद ६२ टक्के होती. मात्र सरकारी पाठपुराव्यानंतर यात ३0 टक्के घट करण्यात आली. पोषण आहार योजनेसाठी गाव, तालुका पातळीवरील समित्या अस्तित्वात नाही. अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार हा शिजवून दिला पाहिजे. मात्र पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने पोषण आहार योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात १७ प्रकल्प जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील १७ प्रकल्पांतील २,६०४ अंगणवाड्यांचे तसेच ६०४ छोट्या (मिनी) अंगणवाड्यांतील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात एकूण १ लाख ५५ हजार ७७७ बालकांची तपासणी केली. सर्वेक्षणात २४१ बालके अतिकुपोषित, ९५८ बालके कुपोषित आढळून आली. कमी वजन असलेली १,१५२ बालके आढळली. कर्जत, सुधागड पाली, पेण, खालापूर येथे कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे.कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त आहार पुरवला जाणार होता. यात केळी, अंडी, खजूर यांचा समावेश करण्यात येणार होते. मात्र अन्न शिजवण्यासाठी निधीच नसल्याने ही योजना बंद पडल्याचे सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीत समोर आले.निधीअभावी प्रकल्प एकमध्ये १५ एप्रिलपासून तर प्रकल्प दोनमध्ये जुलै महिन्यापासून पोषण आहार योजना बंद आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला असून पुढील आठवड्यात ही योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. - आर.एन.सांबरे, प्रभारी अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प पोषण आहार योजनेसाठी केली जाणारी आर्थिक तरतूद वाढवण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना त्यांचे मानधन वेळच्या वेळी मिळावे. पोषण आहार मुलांना आवडेल असा असावा आणि तो गरम शिजवून द्यावा, कुपोषणमुक्तीसाठी विविध स्तरावर कार्यरत समित्यांचे तातडीने गठन व्हावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी स्वतंत्र कक्षांची स्थापना करण्यात यावी.- अशोक जंगले, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत