शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

गेल्या ३० वर्षांतील मतदारसंघातील रोजगाराची आकडेवारी विदारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 03:38 IST

सुनील तटकरे : पेण येथे राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आघाडीची सभा

पेण : भारत सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश होणार असेल तर या तरुणांच्या रोजगाराचा विचार आताच व्हायला हवा. गेल्या ३०वर्षांतील आपल्या मतदारसंघातील रोजगाराची आकडेवारी पाहिली तर विदारक असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. देशात रोजगार निर्माण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. जाती-धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी के ले.

सोमवारी ते पेण येथील आगरी समाज भवन येथे आयोजित राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते. भाजपा आणि त्यांच्यासोबत फरफटणारी शिवसेना यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ फक्त एकमेकांवर टीका करण्यातच गेला. सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून शिवसेनेने सरकारच्या प्रत्येक निर्णयावर केवळ टीकाच केली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रत्येक अग्रलेखातून पंतप्रधान, मुख्यमंत्री व भाजपावर टीकाच होताना आपण पाहत आलो. पण आता सत्तेसाठी यांनी युती केली आहे. मात्र, ही युती गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांसाठी, तरु णांसाठी, महिलांसाठी काही करू शकली नाही, याबाबत आता जनताच त्यांना उत्तर देणार आहे, असे म्हणत तटकरे यांनी युती सरकारचा समाचार घेतला.

नागोठणे परिसरातील बेणसे गावात सभामंडपाचे काम पूर्ण झाल्याचा खोटा उल्लेख गीते यांच्या कार्यअहवालात केला आहे. तिथल्या कार्यकर्त्यांनी त्या जागेचे फोटो पाठवून तिथे सभामंडप झालाच नसल्याचे सांगितले आहे. हा सभामंडप चोरीला गेला की काय? असा टोला लगावत सुनील तटकरे यांनी गीते यांच्या कार्यअहवालातील खोटेपणा उघडा पाडला. अशी फसवाफसवी करत आजवर तुम्ही निर्वाचित झालात पण आता लोक शहाणे झाले आहेत. ते तुमच्या भूलथापांना फसणार नाहीत, असे तटकरे यांनी नमूद केले. आपण खासदार झाल्यानंतर रायगडमध्ये कागदाचा कारखाना आणू, त्यासाठी बांबूची लागवड करा, अस गीतेंनी सांगितलं होतं. तो कागदाचा कारखाना आजतागायत आला नाही. पंतप्रधानांनी विरोध केला म्हणून कारखाना आणू शकलो नाही, असे ते एकदा मुलाखतीत बोलले होते. आता युती झाल्यावर त्यांनी हे पुन्हा बोलून दाखवावे, असे आव्हान तटकरे यांनी केले.यावेळी आ. धैर्यशील पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, ज्येष्ठ नेते बाळाजीशेठ म्हात्रे, बापूसाहेब नेने, चंद्रकांत पाटील, सीताराम कांबळे व तालुक्यातील पदाधिकारी तसेच आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसraigad-pcरायगड