शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:06 IST

महाराष्ट्र विकास आघाडीकडून सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदांचे वाटप केले जाणार आहे.

दासगाव : महाराष्ट्र विकास आघाडीकडून सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदांचे वाटप केले जाणार आहे. यात रायगडमधून मंत्रिपदाची संधी कोणाला मिळते याबाबत चर्चा सुरू असून, महाड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले भरत गोगावले यांचे नाव प्राधान्याने पुढे येत आहे. यामुळे महाड विधानसभा मतदारसंघात शिवसैनिक आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भरत गोगावले शिवसेनेकडून निवडणूक लढले असले तरी सत्ता स्थापन महाराष्ट्र विकास आघाडी करणार असल्याने सर्वसामान्य काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्ते आनंदित झाले आहेत. बऱ्याच वर्षाने भरत गोगावले यांच्या नावाने महाडला मंत्रिपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शिवसेना आणि भाजपमध्ये दुही निर्माण झाल्याने भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. मात्र, दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली आणि राज्यात राजकीय वर्तुळातील नवे समीकरण तयार झाले. या नव्या समीकरणामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असून, दोन वेगवेगळ्या विचार प्रवाहाचे पक्ष कसे जुळवून घेणार यात गेले काही दिवस बैठकांवर बैठका रंगल्या आहेत. या बैठकांच्या नाट्याचा अंतिम अंक आता सुरू झाला असून, राज्यात नवे सरकारची सत्ता स्थापन होणार आहे.या सत्ता स्थापनेनंतर संपूर्ण रायगडवासीयांचे लक्ष मंत्रिमंडळ वाटपाकडे लागून राहिले आहे. रायगडमधून निवडून आलेल्या कोणाला मंत्रिपदाची संधी मिळते, याची चर्चा जागोजागी रंगली असली तरी यामध्ये महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार भरत गोगावले यांचे नाव प्राधान्याने घेतले जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आघाडीमधील शेकापचे भाई जयंत पाटील आणि श्रीवर्धन मतदारसंघातील सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांचे नावदेखील पुढे आले आहे. मात्र, प्रशासकीय अनुभव लक्षात घेता आमदार भरत गोगावले हे विधानसभेवर सलग तीन वेळा निवडून गेलेले आमदार आहेत, यामुळे त्यांच्या नावाला आणि भाई जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.महाड विधानसभा मतदारसंघात सन १९९० पासून शिवसेनेची सत्ता आहे. सन २००४ च्या कालावधीत शिवसेनेकडून माणिक जगताप यांनी या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विजय प्राप्त केला होता. मात्र, सन २००९ पासून पुन्हा या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवण्यात गोगावले यशस्वी झाले.२००९ पासून पुढे सलग तीन वेळा महाड मतदारसंघात निवडून आले आहेत. यामुळे या महाराष्ट्र विकास आघाडीत भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळणे अपेक्षित आहे. संपूर्ण रायगड आणि महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले हे मंत्री व्हावेत, अशी आशा व्यक्त केली जात आहे. तर श्रीवर्धनमधून सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे या निवडून आल्या आहेत.या महाराष्ट्र विकास आघाडीतील सुनील तटकरे हे प्रमुख निर्णायक गटात आहेत. यामुळे अदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळवून देण्यात ते उत्सुक असणार आहेत. यामुळे रायगडमध्ये दोन मंत्रिपद मिळतील, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :mahad-acमहाडShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019