शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

माणगावमध्ये राष्ट्रवादीचा मोर्चा , शेतक-यांचे प्रश्न व महागाई विरोधात असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:10 IST

शेतक-यांचे विविध प्रश्न व महागाई विरोधात माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवार, ४ आॅक्टोबर रोजी सकाळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत व तालुकाअध्यक्ष प्रभाकर उभारे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तहसील

माणगाव : शेतक-यांचे विविध प्रश्न व महागाई विरोधात माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवार, ४ आॅक्टोबर रोजी सकाळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत व तालुकाअध्यक्ष प्रभाकर उभारे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार ऊर्मिला पाटील यांना निवेदन देण्यात आले.सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकºयांची सरसकट कर्जमाफीची १०० टक्के अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी. शेतकºयांना शेतीमालाचा उत्पादन खर्च व अधिक ५० टक्के नफा मिळून हमीभाव द्यावा, कृषिमालाची खरेदी करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, रब्बी हंगामासाठी शेतकºयांना पीककर्ज तातडीने देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा बुधवारी माणगावात काढण्यात आला. सकाळी ११.३० वाजता निजामपूर रोड येथून तालुका राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरु वात झाली. हा मोर्चा माणगाव बाजारपेठेतून कचेरी रोड मार्गे तहसील कार्यालयाकडे आणण्यात आला.तहसील कार्यालयाजवळ मोर्चाला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले की, पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या आदेशाने १ आॅक्टोबरपासून पक्षाच्या वतीने सर्वत्र मोर्चाचे आयोजन केले गेले आहे. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भाजपा सरकारने जनतेला १५ लाख रुपये आपल्या खात्यावर जमा होतील, अशी आशा दाखवली. कोणाच्याही खात्यावर गेल्या साडेतीन वर्षांत एक रुपयाही जमा झालेला नाही. लोकहिताची कामे करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. शेतकरी संपावर गेल्यावर या सरकारने शेतकºयांच्या कर्जमाफीची घोषणा केली; परंतु प्रत्यक्षात अजूनही शेतकºयांची कर्जमाफी झालेली नाही.तालुकाध्यक्ष प्रभाकर उभारे यांनी रॉकेल, पेट्रोल, डिझेल, गॅस या साºया गोष्टी महाग झाल्या आहेत. भाजीपाल्याचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे गोरगरीब जनता आज नाराज झालेली पाहायला मिळते. शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, अशी भयानक परिस्थिती या सरकारने देशाची व राज्याची करून ठेवली असल्याचे सांगितले. या मोर्चात जिल्हा अल्पसंख्याकांचे अध्यक्ष मुक्तार वेळासकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश लाड, नगराध्यक्ष आनंद यादव, जिल्हा ओ.बी.सी. सेलचे अध्यक्ष गणेश पवार, जेष्ठ नेते राजाभाऊ रणपिसे, महादेव बक्कम, दत्तात्रेय पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी