शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

दिशादर्शक नसल्याने प्रवासी बोटींची चुकते वाट; मोरा, रेवस बंदरांत बोट गाळात रुतण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 07:22 IST

नाविकांना धुक्यामुळे बोटी भरकटण्याची भीती

मधुकर ठाकूर 

उरण : मोरा, रेवस सागरी मार्गावरील दिशादर्शक सिग्नल यंत्रणा मागील अनेक वर्षांपासून ठप्प आहे. त्यातच सकाळपासूनच धुके पसरलेले असल्याने या मार्गावर प्रवासी बोटी भरकटतात. त्यामुळे मुंबई जलवाहतूक संस्थेकडून दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.

मोरा आणि रेवस मार्गांवर दररोज हजारो प्रवासी करतात. या सागरी मार्गावरून भाऊचा धक्का, मुंबई येथून मुंबई जलवाहतूक संस्थेच्या लाँचेस प्रवासी वाहतूक करत आहेत. याआधी मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांच्या दरम्यान दिशादर्शक सिग्नल यंत्रणा कार्यरत होती. समुद्रातच लाल आणि हिरव्या रंगाचे दिवे असलेले सिग्नल देण्यात येत होते. त्यामुळे प्रवासी बोटी बिनदिक्कतपणे योग्य दिशेने अचूक मार्गाक्रमण करीत असत.

नाविकांना धुक्यामुळे बोटी भरकटण्याची भीती

मागील काही वर्षांपासून मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांतून दिशादर्शक सिग्नल यंत्रणा बंद पडली आहे. 

सकाळी पडणारे दाट धुके व रात्रीच्या प्रवासात प्रवासी वाहतूक करणाऱ्या लाँचेसच्या नाविकांना बंदरांचा अंदाज येत नाही.

या दोन्ही बंदरांतून प्रवासी वाहतूक करताना प्रवासी लाँचेस दिशादर्शक नसल्याने भरकटतात किंवा नेमक्या मार्गाचा अंदाज येत नसल्याने गाळात रूतून बसतात.

प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे 

मोरा बंदरातील दिशादर्शक यंत्रणा कार्यान्वित असल्याचा दावा करतानाच स्वच्छतागृहांबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली.

नाविक दिशादर्शक सिग्नलचा व साचलेल्या गाळाचा अंदाज घेऊन बंदरात प्रवाशांना घेऊन पोहोचत असत. शिवाय मोरा आणि रेवस बंदरांतील जेट्टीवर उंच ठिकाणी लाल दिव्यांच्या सिग्नलची व्यवस्थाही केली जात होती.

बंदर विभागाचे दुर्लक्ष

दोन्ही बंदरांतील चॅनल आणि जेट्टीवर दिशादर्शक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी सातत्याने बंदर विभागाकडे केली जात आहे.

मात्र, अधिकारी त्याकडे दुर्लक्षच करत असल्याची खंत मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव शराफत मुकादम यांनी व्यक्त केली. 

कदाचित अधिकारी एखाद्या दुर्घटना घडण्याची वाट पाहत असावेत, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांत स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. 

त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषत: महिलांची कुचंबणा होत असल्याच्या समस्येकडेही शराफत मुकादम यांनी लक्ष वेधले आहे. 

टॅग्स :Raigadरायगड