शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दिशादर्शक नसल्याने प्रवासी बोटींची चुकते वाट; मोरा, रेवस बंदरांत बोट गाळात रुतण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 07:22 IST

नाविकांना धुक्यामुळे बोटी भरकटण्याची भीती

मधुकर ठाकूर 

उरण : मोरा, रेवस सागरी मार्गावरील दिशादर्शक सिग्नल यंत्रणा मागील अनेक वर्षांपासून ठप्प आहे. त्यातच सकाळपासूनच धुके पसरलेले असल्याने या मार्गावर प्रवासी बोटी भरकटतात. त्यामुळे मुंबई जलवाहतूक संस्थेकडून दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.

मोरा आणि रेवस मार्गांवर दररोज हजारो प्रवासी करतात. या सागरी मार्गावरून भाऊचा धक्का, मुंबई येथून मुंबई जलवाहतूक संस्थेच्या लाँचेस प्रवासी वाहतूक करत आहेत. याआधी मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांच्या दरम्यान दिशादर्शक सिग्नल यंत्रणा कार्यरत होती. समुद्रातच लाल आणि हिरव्या रंगाचे दिवे असलेले सिग्नल देण्यात येत होते. त्यामुळे प्रवासी बोटी बिनदिक्कतपणे योग्य दिशेने अचूक मार्गाक्रमण करीत असत.

नाविकांना धुक्यामुळे बोटी भरकटण्याची भीती

मागील काही वर्षांपासून मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांतून दिशादर्शक सिग्नल यंत्रणा बंद पडली आहे. 

सकाळी पडणारे दाट धुके व रात्रीच्या प्रवासात प्रवासी वाहतूक करणाऱ्या लाँचेसच्या नाविकांना बंदरांचा अंदाज येत नाही.

या दोन्ही बंदरांतून प्रवासी वाहतूक करताना प्रवासी लाँचेस दिशादर्शक नसल्याने भरकटतात किंवा नेमक्या मार्गाचा अंदाज येत नसल्याने गाळात रूतून बसतात.

प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे 

मोरा बंदरातील दिशादर्शक यंत्रणा कार्यान्वित असल्याचा दावा करतानाच स्वच्छतागृहांबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली.

नाविक दिशादर्शक सिग्नलचा व साचलेल्या गाळाचा अंदाज घेऊन बंदरात प्रवाशांना घेऊन पोहोचत असत. शिवाय मोरा आणि रेवस बंदरांतील जेट्टीवर उंच ठिकाणी लाल दिव्यांच्या सिग्नलची व्यवस्थाही केली जात होती.

बंदर विभागाचे दुर्लक्ष

दोन्ही बंदरांतील चॅनल आणि जेट्टीवर दिशादर्शक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी सातत्याने बंदर विभागाकडे केली जात आहे.

मात्र, अधिकारी त्याकडे दुर्लक्षच करत असल्याची खंत मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव शराफत मुकादम यांनी व्यक्त केली. 

कदाचित अधिकारी एखाद्या दुर्घटना घडण्याची वाट पाहत असावेत, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांत स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. 

त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषत: महिलांची कुचंबणा होत असल्याच्या समस्येकडेही शराफत मुकादम यांनी लक्ष वेधले आहे. 

टॅग्स :Raigadरायगड