शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
3
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
4
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
5
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
6
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
7
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
8
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
9
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
10
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
11
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
12
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
13
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
14
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
15
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
16
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
17
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
18
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
19
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
20
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

दिघी पोर्ट कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:45 PM

दिघी पोर्ट व्यवस्थापनाकडून कामगारांना नेहमीच सापत्न वागणूक दिली जात आहे. आता दिघी पोर्ट प्रशासनाने ७५ कामगारांचे दोन महिन्यांचे फरकबिल व दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) थकवून ठेवले आहे.

बोर्ली पंचतन : दिघी पोर्ट व्यवस्थापनाकडून कामगारांना नेहमीच सापत्न वागणूक दिली जात आहे. आता दिघी पोर्ट प्रशासनाने ७५ कामगारांचे दोन महिन्यांचे फरकबिल व दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) थकवून ठेवले आहे. याविरोधात कामगारांनी गुरुवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.दिघी पोर्टमध्ये एकूण १३० स्थानिक कामगार गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहेत. व्यवस्थापनाकडून कामगारांना दिवाळी बोनस १४ नोव्हेंबरपर्यंत बँक खात्यामध्ये जमा होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ ५५ कामगारांना फरकबिल आणि बोनस देण्यात आला. या संदर्भात दिघी पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तायडे यांच्याकडे कामगारांनी विचारणा केली असता, त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर दिघी पोर्ट मुख्य कार्यालय मुंबई येथील संपर्क साधला असता, जे कर्मचारी भारतीय कामगार सेनामध्ये सभासद आहेत, त्यांना बोनस आणि फरकबिल देण्यात आले असून उर्वरित ७५ कामगारांना बोनस वा फरकबिल जमा झाले नसल्याने कामगारांना सांगण्यात आल्याने त्यांची घोर निराशाच झाली आहे.कामगारांचे पगार उशिराने देणे तसेच पगारवाढीचा फरक थकवून ठेवणे यासाठी २१ ते २४ मे २०१८ या चार दिवसांमध्ये कामगारांनी पोर्टचे काम पूर्णपणे बंद ठेवले होते. यावर दिघी पोर्ट व्यवस्थापनाने काही थकित रक्कम कामगारांच्या अकाउंटमध्ये २५ मे रोजी जमा केले आणि उर्वरित ५0 टक्के फरकाची रक्कम गणपतीत जमा होईल, असे आश्वासन दिले.व्यवस्थापनाचा निषेधगणपती, दिवाळी झाली तरी फरकाची रक्कम दिघी पोर्ट प्रशासनाने अदा केलेली नाही. अखेर कामगारांनी एकजुटीने दिघी पोर्टच्या विरोधात दंड थोपटले आहेत. फरकबिल व सानुग्रह अनुदान मिळाल्याखेरीज आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड