शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सेझग्रस्त शेतकऱ्यांचा ५ मार्चला निघणार धडक मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 23:32 IST

उरण, पेण, पनवेल तालुक्यातील शेतकरी येणार एकत्र

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : महामुंबई सेझ प्रकल्प उभारण्यासाठी १५ वर्षांपूर्वी उरण, पेण, पनवेल तालुक्यातील ४५ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याच्या मागणीसाठी सेझग्रस्त शेतकऱ्यांचा ५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरच धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

एसईझेड कंपनीने सन २००५ मध्ये उरण, पेण, पनवेल तालुक्यातील ४५ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी मिळकती शासनामार्फत संपादित केल्या आहेत; परंतु त्या संपादन करण्यात आलेल्या १० हजार हेक्टर जमिनीवर १५ वर्षांनंतरही महामुंबई प्रकल्प उभारू शकले नाहीत. महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्र रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल आणि उरण या तीन तालुक्यातील ४५ गावांतील संपादनाखाली जमिनींचा एक जमीन घोटाळा आहे. बेकायदेशीर संमती निवाडे घोषित करून जमिनीच्या सातबाराच्या उताऱ्यावर मे. मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र लि. यांच्या नावाची कब्जेदार सदरी नोंद करण्यात आली आहे. या बेकायदेशीररीत्या केलेल्या नोंदी रद्द करून मूळ शेतकऱ्यांच्या नावे नोंदी पूर्ववत न झाल्याने व त्या जमीन मिळकती परत मागण्याकरिता ५ मार्च रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना १६ फेब्रुवारी २०२१ रोजी निवेदन दिले असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष ॲड. दत्तात्रेय नवाळे यांनी दिली.

४५ गावे एकत्रया मोर्चाच्या तयारीसाठी पेण तालुक्यातील शिर्की येथे नुकतीच बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर उरण तालुक्यातील चिरनेर व तालुक्यातील ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत. या मोर्चाला डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे. या मोर्चात पेण, पनवेल आणि उरण या तीन तालुक्यातील ४५ गावांतील सेझग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती ॲड. दत्तात्रेय नवाळे यांनी दिली. 

टॅग्स :Farmerशेतकरी