शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

ठाम निर्धाराने चाकरमानी तरुणांना गवसली भविष्याची वाट; अथक प्रयत्नाने साकारले शेततळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 12:06 AM

लहूळसे येथील माळरानावर फु लवणार नंदनवन; शेती करण्याचा निर्णय

प्रकाश कदम 

पोलादपूर : लॉकडाऊनमधून काही तरुण मुंबईहून आपल्या गावी आले. मात्र, आता पुढे काय? हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता. न डगमगता त्यांनी काही अनुभवी, ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला घेतला आणि त्यांना त्यांचे भविष्य समजले. या दोन तरुणांनी आपल्या लहूळसे गावात आपल्याच पडीक जमिनीत कृषीच्या योजनांचा वापर करून शेतीचे नंदनवन करण्याचा निधार केले आणि ते कामाला लागले.२२ वर्षांचा तरुण विजय रिंगे आणि त्याला समर्थपणे साथ देणारा योगेश रिंगे या दोन तरुणांनी एकत्र येऊन मागेल त्याला शेततळे या योजनेचा फायदा घेऊन आजोबा-पणजोबांची शंभर वर्ष जुनी शेती जी कधीही वापरात नव्हती, त्या जमिनीत शेततळे केले.या पाण्याच्या जोरावर पुढे दहा एकरावर शेती करण्याचा निणय या तरु णांनी घेतला आहे.

शेती आणि आजची पिढी यांचा संबंध फारच कमी. आज कोणीही शेती करण्यास तयार होत नाही. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे शेतीला तरुणांकडून पसंती दिली जात आहे. तर यात भविष्यही पाहिले जात आहे. यामुळे नक्कीच शेती व्यवसायला नवी उभारी मिळेल. हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली विजय रिंगे आणि योगेश रिंगे या दोन तरुणांना पुढील वाटचालीचा माग मिळाला आहे. शेत तळ्यातील पाण्यावर सुमारे दहा एकर जमिनीमध्ये हळद हरभरा, भुईमूग ही पिके घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांना गावातील धर्मेश रिंगे, भरत रिंगे, बाबू रिंगे आदी शेतकऱ्यांची साथ मिळत आहे. तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी सहायक पूनम क्षीरसागर सर्वांचे मार्गदर्शन घेऊन पिवळं सोनं पिकवण्याचा ठाम निर्धार आहे. योगेश रिंगे विजय रिंगे यांसारख्या तरुणांनी लॉकडाऊनमध्ये हातावर हात ठेवून गप्प न बसता, मोठ्या प्रयत्नाने साहित्याची जमवाजमव करून शेततळे उभे केले.कोकणातील साºया तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. वेळेचा सदुपयोग कसा करायचा, त्यातून गावातील तरुण कसा फायदा घेता येईल, याचा एक आदर्श पाठ या तरुणांनी घालून दिला आहे.शंभर वर्षांत जे जमलं नाही, ते एका महिन्यात झालेलहूळसे गाव हे महाबळेश्वरच्या पायथ्याशी सावित्री नदीच्या उगम स्थानी पोलादपूर तालुक्यातील प्रथम गाव. उन्हाळ्यात या गावाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सतत भेडसावत असतो, तरीही काही तरुणांनी एकत्र येऊन हा शाश्वत शेतीचा उपक्रम हाती घेतला आहे. देवळे ग्रामपंचायतीच्या वतीने सेंद्रिय शेती गट अगोदरच अस्तित्वात आहे, त्याचाही फायदा मिळणार आहे. गेली १०० वर्षे पडीक असणारी शेतीही यंदापासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे माळरान हिरवेगार झाले असून, या तरु णांनी जवळपास एका महिन्यातच हे काम करून दाखवलं.

टॅग्स :Raigadरायगड