शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

फडणवीस धादांत खोटे बोलणारे उपमुख्यमंत्री - कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा घणाघात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2024 16:51 IST

लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील कॉग्रेंसची भुमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी (१६) उलव्यातील समाजमंदिरातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

मधुकर ठाकूर, उरण : मान -अपमानाची जोखड बाजूला सारून आणि एक दिलाने काम करुन महाविकास आघाडीचे मावळ उमेदवार संजोग वाघेरे-पाटील व रायगड लोकसभा मतदारसंघातील अनंत गीते यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली असल्याची माहिती रायगड जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील कॉग्रेंसची भुमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी (१६) उलव्यातील समाजमंदिरातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर जिल्ह्यातील पक्षाच्या विविध  विभागांचे कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.जागा वाटपावरून काही ठिकाणी पक्षात नाराजी असली तरीही देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवून ते टिकवण्यासाठी व संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करण्यासाठी कॉग्रेस महायुतीच्या सर्वच उमेदवारांसाठी एकदिलाने काम करीत आहे.मावळ, रायगड या दोन्ही लोकसभा मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील व अनंत गीते यांच्या विजयासाठी कॉग्रेसचे पदाधिकारी निवडणूकीत कामाला लागले असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका वेगळी असणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना महेंद्र घरत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर धादांत खोटे बोलणारे उपमुख्यमंत्री अशी खोचक टीका केली.

नारायण राणे यांना अद्यापही उमेदवारीसाठी झटावे लागत आहे.तर विविध प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सरकारमध्ये सामील होणार की, जेलमध्ये जाणार अशी धमकी मिळताच ते निमूटपणे सरकारमध्ये सामील झाले असल्याची टीकाही महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेतून केली.निवडणूकांचे निकाल जाहीर होताच ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआय यांच्या चौकशीच्या भीतीने भाजपात दाखल झालेले विविध राजकीय पक्षांचे बहुतांश नेते, पुढारी पुन्हा माघारी पक्षात सामील होतील अशी भविष्यवाणीही घरत यांनी केली.

ना खाऊंगा , ना खाने दूंगा नारा देणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव अटळ आहे.भडकती महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी , कामगार आदींच्या प्रश्नांवर केंद्र सरकार मुग गिळून गप्प बसले आहे. केंद्र सरकारच्या या हिटलरशाही व मनमानी कारभाराला आता जनता पार कंटाळली आहे.त्यामुळे देशभरात मोदी विरोधात लाट उसळली आहे.त्याचा सर्वाधिक फायदा विरोधकांनाच होणार असल्याने केंद्रात इंडिया आघाडीचेच सरकार स्थापन होईल असा दावा करतानाच हुकूमशाही पद्धतीच्या राजवटीला उलथून टाकण्याचे आवाहन  कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे , काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, काँग्रेसच्या रायगड महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर , महिला तालुका अध्यक्षा रेखा घरत तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :uran-acउरणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Raigadरायगड