शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस धादांत खोटे बोलणारे उपमुख्यमंत्री - कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा घणाघात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2024 16:51 IST

लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील कॉग्रेंसची भुमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी (१६) उलव्यातील समाजमंदिरातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

मधुकर ठाकूर, उरण : मान -अपमानाची जोखड बाजूला सारून आणि एक दिलाने काम करुन महाविकास आघाडीचे मावळ उमेदवार संजोग वाघेरे-पाटील व रायगड लोकसभा मतदारसंघातील अनंत गीते यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली असल्याची माहिती रायगड जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील कॉग्रेंसची भुमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी (१६) उलव्यातील समाजमंदिरातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर जिल्ह्यातील पक्षाच्या विविध  विभागांचे कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.जागा वाटपावरून काही ठिकाणी पक्षात नाराजी असली तरीही देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवून ते टिकवण्यासाठी व संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करण्यासाठी कॉग्रेस महायुतीच्या सर्वच उमेदवारांसाठी एकदिलाने काम करीत आहे.मावळ, रायगड या दोन्ही लोकसभा मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील व अनंत गीते यांच्या विजयासाठी कॉग्रेसचे पदाधिकारी निवडणूकीत कामाला लागले असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका वेगळी असणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना महेंद्र घरत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर धादांत खोटे बोलणारे उपमुख्यमंत्री अशी खोचक टीका केली.

नारायण राणे यांना अद्यापही उमेदवारीसाठी झटावे लागत आहे.तर विविध प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सरकारमध्ये सामील होणार की, जेलमध्ये जाणार अशी धमकी मिळताच ते निमूटपणे सरकारमध्ये सामील झाले असल्याची टीकाही महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेतून केली.निवडणूकांचे निकाल जाहीर होताच ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआय यांच्या चौकशीच्या भीतीने भाजपात दाखल झालेले विविध राजकीय पक्षांचे बहुतांश नेते, पुढारी पुन्हा माघारी पक्षात सामील होतील अशी भविष्यवाणीही घरत यांनी केली.

ना खाऊंगा , ना खाने दूंगा नारा देणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव अटळ आहे.भडकती महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी , कामगार आदींच्या प्रश्नांवर केंद्र सरकार मुग गिळून गप्प बसले आहे. केंद्र सरकारच्या या हिटलरशाही व मनमानी कारभाराला आता जनता पार कंटाळली आहे.त्यामुळे देशभरात मोदी विरोधात लाट उसळली आहे.त्याचा सर्वाधिक फायदा विरोधकांनाच होणार असल्याने केंद्रात इंडिया आघाडीचेच सरकार स्थापन होईल असा दावा करतानाच हुकूमशाही पद्धतीच्या राजवटीला उलथून टाकण्याचे आवाहन  कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे , काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, काँग्रेसच्या रायगड महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर , महिला तालुका अध्यक्षा रेखा घरत तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :uran-acउरणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Raigadरायगड