शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

विम्याच्या नूतनीकरणाबाबत वाहनधारकांमध्ये उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 02:04 IST

महामार्ग वाहतूक पोलिसांकडून कारवाई : तीन महिन्यांत ७६ केसेसमधून १,७४,८00 रुपये दंड वसूल

सिकंदर अनवारे 

दासगाव : कोणतेही छोटे किंवा मोठे वाहन असो त्याचा विमा असणे गरजेचे आहे. अपघातानंतर विम्यामुळे वाहनांची भरपाई व जखमी किंवा मृत्यू अशा सर्वांना याचा लाभ मिळतो. आज शेकडो वाहने विनाविमा काढत फिरत असल्याचे महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांच्या तपासणी कारवाई दरम्यान उघडकीस आले आहे.

नवीन वाहन असो, अगर जुने त्याच्या किमतीप्रमाणे त्याचा विमा काढला जातो. मात्र, वाहतुकीच्या नियमानुसार विमा असणे गजरेचे आहे. नसेल तर वाहतूक नियमांचे उल्लंघन असून कारवाईस पात्र ठरतो. कोणत्याही वेळी कोणत्याही वाहनाचे काही घडू शकते. कोणत्याही वाहनाचा अपघात होत असेल तर त्यानंतर विम्याचा फायदा वाहनमालक व अपघातामध्ये जखमी किंवा मृत्यू असलेल्या कुटुंबाला होतो. संपूर्ण भारतात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. ठिकठिकाणी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात वाहनांची तपासणी केली जात असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. मात्र, नवीन कायद्याची अंमलबजावणी अद्याप महाराष्ट्रात झालेली नाही. आजही जुन्या कायद्याप्रमाणेच दंड वसूल केले जात आहेत.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल ते कोकणाच्या तळापर्यंत आठ महामार्ग वाहतूक पोलीस शाखा उभारण्यात आल्या आहेत. सध्या या शाखांवर प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. यामध्ये वाहनांना बसवण्यात आलेल्या काळ्या काचा, सीटबेल्ट न घालणे, वाहनांचा विमा न काढणे, पीयूसी नसणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ड्रेस अशा अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रत्येक दिवशी या पोलीस शाखांमध्ये कारवाई केली जात असून, लाखो रुपये वाहनचालकांकडून दंड वसूल केला जात आहे. एवढे होत असताना वाहनचालकांमध्ये आजही काही सुधारणा होत असल्याचे दिसून येत नाही. काही वाहनचालक वाहन कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. सध्या महामार्ग वाहतूक शाखा पोलिसांच्या कारवाई दरम्यान गेल्या तीन महिन्यांच्या वाहनांच्या तपासणीमध्ये ७६ वाहन विनाविमा सापडली. यांच्याकडून प्रत्येकी २३०० रुपयांप्रमाणे १,७४,८०० रुपये एवढा दंड वसूल केला आहे.कोणत्याही वाहनाचा विमा हा महत्त्वाचा आहे. अपघातानंतर वाहनाचे होणारे नुकसान व जखमी व मृत व्यक्तीस लाभ देण्यास विमा कंपनीच जबाबदार राहते. अगर वाहनाचा विमा नसेल तर अपघातग्रस्त वाहनमालकाला मृत्यू अगर जखमी व्यक्तीस कोर्ट ठरवून देईल तेवढी रक्कम अदा करावी लागते. यामध्ये जर अपघात करणाºया वाहनमालकाची ऐपत नसेल तर मात्र मृत्यू किंवा जखमी व्यक्तीच्या कुटुंबीयास मदत मिळत नाही, त्यामुळे कायद्याने वाहनाचा विमा असणे गरजेचे आहे. 

टॅग्स :RaigadरायगडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस