शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

विम्याच्या नूतनीकरणाबाबत वाहनधारकांमध्ये उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 02:04 IST

महामार्ग वाहतूक पोलिसांकडून कारवाई : तीन महिन्यांत ७६ केसेसमधून १,७४,८00 रुपये दंड वसूल

सिकंदर अनवारे 

दासगाव : कोणतेही छोटे किंवा मोठे वाहन असो त्याचा विमा असणे गरजेचे आहे. अपघातानंतर विम्यामुळे वाहनांची भरपाई व जखमी किंवा मृत्यू अशा सर्वांना याचा लाभ मिळतो. आज शेकडो वाहने विनाविमा काढत फिरत असल्याचे महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांच्या तपासणी कारवाई दरम्यान उघडकीस आले आहे.

नवीन वाहन असो, अगर जुने त्याच्या किमतीप्रमाणे त्याचा विमा काढला जातो. मात्र, वाहतुकीच्या नियमानुसार विमा असणे गजरेचे आहे. नसेल तर वाहतूक नियमांचे उल्लंघन असून कारवाईस पात्र ठरतो. कोणत्याही वेळी कोणत्याही वाहनाचे काही घडू शकते. कोणत्याही वाहनाचा अपघात होत असेल तर त्यानंतर विम्याचा फायदा वाहनमालक व अपघातामध्ये जखमी किंवा मृत्यू असलेल्या कुटुंबाला होतो. संपूर्ण भारतात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. ठिकठिकाणी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात वाहनांची तपासणी केली जात असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. मात्र, नवीन कायद्याची अंमलबजावणी अद्याप महाराष्ट्रात झालेली नाही. आजही जुन्या कायद्याप्रमाणेच दंड वसूल केले जात आहेत.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल ते कोकणाच्या तळापर्यंत आठ महामार्ग वाहतूक पोलीस शाखा उभारण्यात आल्या आहेत. सध्या या शाखांवर प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. यामध्ये वाहनांना बसवण्यात आलेल्या काळ्या काचा, सीटबेल्ट न घालणे, वाहनांचा विमा न काढणे, पीयूसी नसणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ड्रेस अशा अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रत्येक दिवशी या पोलीस शाखांमध्ये कारवाई केली जात असून, लाखो रुपये वाहनचालकांकडून दंड वसूल केला जात आहे. एवढे होत असताना वाहनचालकांमध्ये आजही काही सुधारणा होत असल्याचे दिसून येत नाही. काही वाहनचालक वाहन कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. सध्या महामार्ग वाहतूक शाखा पोलिसांच्या कारवाई दरम्यान गेल्या तीन महिन्यांच्या वाहनांच्या तपासणीमध्ये ७६ वाहन विनाविमा सापडली. यांच्याकडून प्रत्येकी २३०० रुपयांप्रमाणे १,७४,८०० रुपये एवढा दंड वसूल केला आहे.कोणत्याही वाहनाचा विमा हा महत्त्वाचा आहे. अपघातानंतर वाहनाचे होणारे नुकसान व जखमी व मृत व्यक्तीस लाभ देण्यास विमा कंपनीच जबाबदार राहते. अगर वाहनाचा विमा नसेल तर अपघातग्रस्त वाहनमालकाला मृत्यू अगर जखमी व्यक्तीस कोर्ट ठरवून देईल तेवढी रक्कम अदा करावी लागते. यामध्ये जर अपघात करणाºया वाहनमालकाची ऐपत नसेल तर मात्र मृत्यू किंवा जखमी व्यक्तीच्या कुटुंबीयास मदत मिळत नाही, त्यामुळे कायद्याने वाहनाचा विमा असणे गरजेचे आहे. 

टॅग्स :RaigadरायगडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस