शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

रेती लिलाव जाहीर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:40 IST

बांधकाम व्यवसायामध्ये ‘काळे सोने’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या बेकायदा रेती उत्खननावर महसूल विभागाने वक्रदृष्टी केली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील रेतीच्या चोरीमुळे सरकारला कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागायचे.

आविष्कार देसाई अलिबाग : बांधकाम व्यवसायामध्ये ‘काळे सोने’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या बेकायदा रेती उत्खननावर महसूल विभागाने वक्रदृष्टी केली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील रेतीच्या चोरीमुळे सरकारला कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागायचे. त्याला लगाम घालण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांतील रेतीचे लिलाव जाहीर करण्यात आले आहेत. या माध्यमातून तब्बल ३५ कोटी पाच लाख ४४ हजार ७७५ रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा होण्याची महसूल विभागाला अपेक्षा आहे. यातील विशेष बाब म्हणजे रेतीच्या लिलावामुळे रेती माफियांची दुकाने बंद होणार असल्याने त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.रायगड जिल्ह्यासह नवी मुंबई परिसरातील रेती मोठ्या प्रमाणात नवी मुंबई, मुंबई, पुणे परिसरातील काही भागांतील विकासकामांसाठी वापरली जाते. त्याचप्रमाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेती काही प्रमाणात रायगड, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांसाठी वापरली जाते. तिन्ही जिल्ह्यांतील त्यात विशेष करून रायगड पट्ट्यामधील रेतीची प्रत उत्कृष्ट असल्याने तेथील रेतीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. गेल्या काही वर्षांपासून रेतीचे लिलाव झाले नव्हते, अथवा ज्या ज्या वेळी रेतीचे लिलाव जाहीर करण्यात आले. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. रेती माफियांनी संगनमतानेच लिलावाला वाटण्याच्या अक्षता लावल्याचे त्या वेळी बोलले जात होते. त्यामुळे बेकायदा रेती व्यवसायाला चांगलेच उधाण आले. बेकायदा रेती उत्खननामुळे दर वर्षी सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत होता. मात्र, रेती माफियांचे उखळ पांढरे होत होते. महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी यांच्या वरदहस्तामुळे हे शक्य होत असल्याची ओरड सातत्याने होत होती.यावर उपाय म्हणून कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील यांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील चार प्रमुख आणि आठ उपगटांचे लिलाव जाहीर केले आहेत. तिसºयांदा या विभागासाठी रेतीचा लिलाव पुकारण्यात आला आहे. १ फेब्रुवारी ते ३० जून २०१८ या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये अधिकृतपणे यांत्रिक ड्रेझरने रेतीचा उपसा करता येणार आहे. रेतीच्या उपशामुळे बोटी, जहाज यांचा मार्ग सुकर होत असल्याने दरवर्षी नदी आणि खाडीतील गाळ (रेती) काढणे आवश्यक असते, असे रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.लिलाव प्रक्रियेमुळे सरकारच्या तिजोरीमध्ये ३५ कोटी पाच लाख ४४ हजार ७७५ रुपयांचा महसूल पडणार आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यांचा वाटा १८ कोटी ६८ लाख ८९ हजार १६७ आहे. रेती व्यावसायिकांनी अधिकृतपणे व्यवसाय करावा, यासाठीच सरकारने लिलाव प्रक्रिया अवलंबली आहे, त्याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.>सरकारला १८ कोटी ६८ लाख ८९ हजार १६७ रुपयांचा महसूलरायगड-रत्नागिरी हद्दीतील सावित्री नदी/बाणकोट खाडीतील दोन उपगटांच्या माध्यमातून एक लाख १७ हजार ३१९ ब्रास रेती मिळणार असल्याचा अहवाल मेरीटाइम बोर्डाने दिला आहे. त्या माध्यमातून सरकारला १८ कोटी ६८ लाख ८९ हजार १६७ रुपयांचा महसूल मिळणार आहे.रायगड-रत्नागिरी हद्दीतील सावित्री नदी/बाणकोट खाडीतील एका उपगटातून २१ हजार २०१ ब्रास रेतीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीमध्ये तीन कोटी ३७ लाख ७३ हजार १९३ रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग वाघोटण नदी / विजयदुर्ग खाडीतील तीन उपगटांमधून चार लाख २८ हजार १२७ ब्रास रेती मिळणार आहे. त्या माध्यमातून आठ कोटी ५३ लाख ९६ हजार ५४५ रुपयांचा महसूल उपलब्ध होणार आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग वाघोटण नदी / विजयदुर्ग खाडीतील दोन उपगटांमधून दोन लाख २२ हजार ८९७ ब्रास रेती मिळणार आहे. त्यातून चार कोटी ४४ लाख ८५ हजार ८७० रुपये हे सरकारला मिळणार आहेत.

टॅग्स :Raigadरायगड