शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

अपघातातील मृत्यूचे प्रमाण ६४ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:00 IST

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे (जुना) महामार्ग आणि गोवा राष्ट्रीय महामार्ग या तीनही राष्ट्रीय महामार्गावरील वाहन अपघात

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे (जुना) महामार्ग आणि गोवा राष्ट्रीय महामार्ग या तीनही राष्ट्रीय महामार्गावरील वाहन अपघात आणि त्यातील अपघाती मृत्यू आणि जखमींचे प्रमाण ही चिंतेची समस्या गेल्या काही वर्षांपासून होती. गतवर्षी अपघाताचे प्रमाण ६८ टक्के होते. यंदा जिल्ह्यातील वाहन अपघात-मृत्यू प्रमाण कमी होऊन ६४ टक्क्यांवर आले असून चार टक्क्यांनी अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात रायगड वाहतूक पोलिसांना यश आले आहे.जानेवारी ते जून या कालावधीत जिल्ह्यात २०१३ मध्ये एकूण ७३७ वाहन अपघातात १७७ मृत्यू झाले होते. याच सहा महिन्यात २०१४ मध्ये ६७५ अपघातात १६० मृत्यू, २०१५ मध्ये ७२९ अपघातात १८६ मृत्यू, २०१६ मध्ये ६७९ अपघातात २०० मृत्यू तर चालू वर्षीत २०१७ मध्ये याच सहा महिन्यांच्या कालावधीत ४७१ वाहन अपघातात १२८ मृत्यू असे अपघात व मृत्यू प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. यंदा २०१३ च्या तुलनेत हे प्रमाण ६४ टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. २०१४ मध्ये अपघाताचे प्रमाण ६९ टक्के, २०१५ ला ६४ टक्के तर २०१६ ला ६८ टक्के अपघाताचे प्रमाण आहे.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१७ मध्ये अपघातांचे प्रमाण ४८ वर आले, परिणामी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होवून १४ वर आले आहे. जखमीं प्रवाशांच्या संख्येतही घट झाली आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर याच सहा महिन्यांच्या कालावधीत २०१३ मध्ये ५४ अपघातात १३ मृत्यू, २०१४ मध्ये ५८ अपघातात १२ मृत्यू, २०१५ मध्ये ६४ अपघातात २५ मृत्यू, २०१६ मध्ये ४९ अपघातात २३ मृत्यू तर चालू वर्षी याच कालावधीत २०१७ मध्ये ४१ वाहन अपघातामध्ये १६ मृत्यू असे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे.अत्यंत धोकादायक आणि सातत्याने अपघात घडणारा महामार्ग म्हणून सर्वत्र चर्चेत राहिलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर याच सहा महिन्याच्या कालावधीत २०१३ मध्ये २७७ अपघातात ७५ मृत्यू, २०१४ मध्ये २६७ अपघातात ५३ मृत्यू, २०१५ मध्ये २४४ अपघातात ६२ मृत्यू, २०१६ मध्ये २८७ अपघातात ७९ मृत्यू तर याच सहा महिन्यांच्या कालावधीत २०१७ मध्ये १८६ अपघातात ३७ मृत्यू असे अपघात-मृत्यू प्रमाण कमी करण्यात विक्रमी यश आले आहे. अपघात प्रमाण कमी करण्याकरिता रायगड वाहतूक शाखेने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने अमलात आणल्याने हे यश साध्य करता आले आहे. यामध्ये जानेवारी ते १७ जुलै २०१७ या कालावधीत मद्यपी चालकांच्या विरुद्ध एकूण १ हजार ११९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील टोलनाक्यांवर मद्यपी चालक आणि विना हेल्मेट दुचाकी चालक यांच्यावरील कारवाईत एकूण १०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करून एकूण ६६२ गुन्हे केवळ जून व जुलै या दोन महिन्यात दाखल करण्यात आले आहेत.जून २०१७ एका महिन्यात ५ हजार ३८ गुन्हे दाखल जून २०१७ या केवळ एका महिन्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे ६१, ओव्हर लोडिंगचे ०२, धोकादायक ओव्हरटेकचे ११६, जादा प्रवासी वाहतुकीचे १७५, लेन कटिंगचे ११, विना सिटबेल्टचे ४२९, विना टेल लाइटचे ०४, अनधिकृत नंबर प्लेटचे ०५, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे २२०, मद्यप्राशन करून गाडी चालविणे ३०१, विना हेल्मेट ५२७, गाडीला काळ््या काचा २५ असे विविध स्वरूपाचे ५ हजार ३८ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून विक्रमी तब्बल १५ लाख ११ हजार ५०० रुपये दंडवसुली करण्याची कामगिरी वाहतूक पोलिसांनी केली आहे.व्याख्याने घेऊन प्रबोधनरायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी महामार्गावरील समस्या अत्यंत गांभीर्याने विचारात घेवून रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे आणि त्यांच्या वाहतूक पोलीस पथकाबरोबर याबाबत संवाद साधला. रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात १५० व्याख्याने घेऊन संदर्भातील प्रबोधन के ले. ही मोहीममहत्त्वपूर्ण ठरली आहे.हेल्मेटचा वापर कराजिल्ह्यातील टोलनाक्यांवर मद्यपी चालक आणि विना हेल्मेट दुचाकी चालक यांच्यावरील कारवाईत एकूण १०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.