शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अपघातातील मृत्यूचे प्रमाण ६४ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:00 IST

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे (जुना) महामार्ग आणि गोवा राष्ट्रीय महामार्ग या तीनही राष्ट्रीय महामार्गावरील वाहन अपघात

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे (जुना) महामार्ग आणि गोवा राष्ट्रीय महामार्ग या तीनही राष्ट्रीय महामार्गावरील वाहन अपघात आणि त्यातील अपघाती मृत्यू आणि जखमींचे प्रमाण ही चिंतेची समस्या गेल्या काही वर्षांपासून होती. गतवर्षी अपघाताचे प्रमाण ६८ टक्के होते. यंदा जिल्ह्यातील वाहन अपघात-मृत्यू प्रमाण कमी होऊन ६४ टक्क्यांवर आले असून चार टक्क्यांनी अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात रायगड वाहतूक पोलिसांना यश आले आहे.जानेवारी ते जून या कालावधीत जिल्ह्यात २०१३ मध्ये एकूण ७३७ वाहन अपघातात १७७ मृत्यू झाले होते. याच सहा महिन्यात २०१४ मध्ये ६७५ अपघातात १६० मृत्यू, २०१५ मध्ये ७२९ अपघातात १८६ मृत्यू, २०१६ मध्ये ६७९ अपघातात २०० मृत्यू तर चालू वर्षीत २०१७ मध्ये याच सहा महिन्यांच्या कालावधीत ४७१ वाहन अपघातात १२८ मृत्यू असे अपघात व मृत्यू प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. यंदा २०१३ च्या तुलनेत हे प्रमाण ६४ टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. २०१४ मध्ये अपघाताचे प्रमाण ६९ टक्के, २०१५ ला ६४ टक्के तर २०१६ ला ६८ टक्के अपघाताचे प्रमाण आहे.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१७ मध्ये अपघातांचे प्रमाण ४८ वर आले, परिणामी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होवून १४ वर आले आहे. जखमीं प्रवाशांच्या संख्येतही घट झाली आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर याच सहा महिन्यांच्या कालावधीत २०१३ मध्ये ५४ अपघातात १३ मृत्यू, २०१४ मध्ये ५८ अपघातात १२ मृत्यू, २०१५ मध्ये ६४ अपघातात २५ मृत्यू, २०१६ मध्ये ४९ अपघातात २३ मृत्यू तर चालू वर्षी याच कालावधीत २०१७ मध्ये ४१ वाहन अपघातामध्ये १६ मृत्यू असे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे.अत्यंत धोकादायक आणि सातत्याने अपघात घडणारा महामार्ग म्हणून सर्वत्र चर्चेत राहिलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर याच सहा महिन्याच्या कालावधीत २०१३ मध्ये २७७ अपघातात ७५ मृत्यू, २०१४ मध्ये २६७ अपघातात ५३ मृत्यू, २०१५ मध्ये २४४ अपघातात ६२ मृत्यू, २०१६ मध्ये २८७ अपघातात ७९ मृत्यू तर याच सहा महिन्यांच्या कालावधीत २०१७ मध्ये १८६ अपघातात ३७ मृत्यू असे अपघात-मृत्यू प्रमाण कमी करण्यात विक्रमी यश आले आहे. अपघात प्रमाण कमी करण्याकरिता रायगड वाहतूक शाखेने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने अमलात आणल्याने हे यश साध्य करता आले आहे. यामध्ये जानेवारी ते १७ जुलै २०१७ या कालावधीत मद्यपी चालकांच्या विरुद्ध एकूण १ हजार ११९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील टोलनाक्यांवर मद्यपी चालक आणि विना हेल्मेट दुचाकी चालक यांच्यावरील कारवाईत एकूण १०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करून एकूण ६६२ गुन्हे केवळ जून व जुलै या दोन महिन्यात दाखल करण्यात आले आहेत.जून २०१७ एका महिन्यात ५ हजार ३८ गुन्हे दाखल जून २०१७ या केवळ एका महिन्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे ६१, ओव्हर लोडिंगचे ०२, धोकादायक ओव्हरटेकचे ११६, जादा प्रवासी वाहतुकीचे १७५, लेन कटिंगचे ११, विना सिटबेल्टचे ४२९, विना टेल लाइटचे ०४, अनधिकृत नंबर प्लेटचे ०५, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे २२०, मद्यप्राशन करून गाडी चालविणे ३०१, विना हेल्मेट ५२७, गाडीला काळ््या काचा २५ असे विविध स्वरूपाचे ५ हजार ३८ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून विक्रमी तब्बल १५ लाख ११ हजार ५०० रुपये दंडवसुली करण्याची कामगिरी वाहतूक पोलिसांनी केली आहे.व्याख्याने घेऊन प्रबोधनरायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी महामार्गावरील समस्या अत्यंत गांभीर्याने विचारात घेवून रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे आणि त्यांच्या वाहतूक पोलीस पथकाबरोबर याबाबत संवाद साधला. रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात १५० व्याख्याने घेऊन संदर्भातील प्रबोधन के ले. ही मोहीममहत्त्वपूर्ण ठरली आहे.हेल्मेटचा वापर कराजिल्ह्यातील टोलनाक्यांवर मद्यपी चालक आणि विना हेल्मेट दुचाकी चालक यांच्यावरील कारवाईत एकूण १०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.