शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मृत्यूचे प्रमाण ६४ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:00 IST

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे (जुना) महामार्ग आणि गोवा राष्ट्रीय महामार्ग या तीनही राष्ट्रीय महामार्गावरील वाहन अपघात

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे (जुना) महामार्ग आणि गोवा राष्ट्रीय महामार्ग या तीनही राष्ट्रीय महामार्गावरील वाहन अपघात आणि त्यातील अपघाती मृत्यू आणि जखमींचे प्रमाण ही चिंतेची समस्या गेल्या काही वर्षांपासून होती. गतवर्षी अपघाताचे प्रमाण ६८ टक्के होते. यंदा जिल्ह्यातील वाहन अपघात-मृत्यू प्रमाण कमी होऊन ६४ टक्क्यांवर आले असून चार टक्क्यांनी अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात रायगड वाहतूक पोलिसांना यश आले आहे.जानेवारी ते जून या कालावधीत जिल्ह्यात २०१३ मध्ये एकूण ७३७ वाहन अपघातात १७७ मृत्यू झाले होते. याच सहा महिन्यात २०१४ मध्ये ६७५ अपघातात १६० मृत्यू, २०१५ मध्ये ७२९ अपघातात १८६ मृत्यू, २०१६ मध्ये ६७९ अपघातात २०० मृत्यू तर चालू वर्षीत २०१७ मध्ये याच सहा महिन्यांच्या कालावधीत ४७१ वाहन अपघातात १२८ मृत्यू असे अपघात व मृत्यू प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. यंदा २०१३ च्या तुलनेत हे प्रमाण ६४ टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. २०१४ मध्ये अपघाताचे प्रमाण ६९ टक्के, २०१५ ला ६४ टक्के तर २०१६ ला ६८ टक्के अपघाताचे प्रमाण आहे.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१७ मध्ये अपघातांचे प्रमाण ४८ वर आले, परिणामी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होवून १४ वर आले आहे. जखमीं प्रवाशांच्या संख्येतही घट झाली आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर याच सहा महिन्यांच्या कालावधीत २०१३ मध्ये ५४ अपघातात १३ मृत्यू, २०१४ मध्ये ५८ अपघातात १२ मृत्यू, २०१५ मध्ये ६४ अपघातात २५ मृत्यू, २०१६ मध्ये ४९ अपघातात २३ मृत्यू तर चालू वर्षी याच कालावधीत २०१७ मध्ये ४१ वाहन अपघातामध्ये १६ मृत्यू असे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे.अत्यंत धोकादायक आणि सातत्याने अपघात घडणारा महामार्ग म्हणून सर्वत्र चर्चेत राहिलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर याच सहा महिन्याच्या कालावधीत २०१३ मध्ये २७७ अपघातात ७५ मृत्यू, २०१४ मध्ये २६७ अपघातात ५३ मृत्यू, २०१५ मध्ये २४४ अपघातात ६२ मृत्यू, २०१६ मध्ये २८७ अपघातात ७९ मृत्यू तर याच सहा महिन्यांच्या कालावधीत २०१७ मध्ये १८६ अपघातात ३७ मृत्यू असे अपघात-मृत्यू प्रमाण कमी करण्यात विक्रमी यश आले आहे. अपघात प्रमाण कमी करण्याकरिता रायगड वाहतूक शाखेने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने अमलात आणल्याने हे यश साध्य करता आले आहे. यामध्ये जानेवारी ते १७ जुलै २०१७ या कालावधीत मद्यपी चालकांच्या विरुद्ध एकूण १ हजार ११९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील टोलनाक्यांवर मद्यपी चालक आणि विना हेल्मेट दुचाकी चालक यांच्यावरील कारवाईत एकूण १०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करून एकूण ६६२ गुन्हे केवळ जून व जुलै या दोन महिन्यात दाखल करण्यात आले आहेत.जून २०१७ एका महिन्यात ५ हजार ३८ गुन्हे दाखल जून २०१७ या केवळ एका महिन्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे ६१, ओव्हर लोडिंगचे ०२, धोकादायक ओव्हरटेकचे ११६, जादा प्रवासी वाहतुकीचे १७५, लेन कटिंगचे ११, विना सिटबेल्टचे ४२९, विना टेल लाइटचे ०४, अनधिकृत नंबर प्लेटचे ०५, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे २२०, मद्यप्राशन करून गाडी चालविणे ३०१, विना हेल्मेट ५२७, गाडीला काळ््या काचा २५ असे विविध स्वरूपाचे ५ हजार ३८ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून विक्रमी तब्बल १५ लाख ११ हजार ५०० रुपये दंडवसुली करण्याची कामगिरी वाहतूक पोलिसांनी केली आहे.व्याख्याने घेऊन प्रबोधनरायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी महामार्गावरील समस्या अत्यंत गांभीर्याने विचारात घेवून रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे आणि त्यांच्या वाहतूक पोलीस पथकाबरोबर याबाबत संवाद साधला. रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात १५० व्याख्याने घेऊन संदर्भातील प्रबोधन के ले. ही मोहीममहत्त्वपूर्ण ठरली आहे.हेल्मेटचा वापर कराजिल्ह्यातील टोलनाक्यांवर मद्यपी चालक आणि विना हेल्मेट दुचाकी चालक यांच्यावरील कारवाईत एकूण १०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.