शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

बिरवाडीत डम्पिंग ग्राउंडवर गुरांचा मृत्यू; शेतकऱ्यांनी गुरे मोकाट सोडू नयेत, पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 23:38 IST

महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडवर गेल्या दोन दिवसांपासून गुरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडवर गेल्या दोन दिवसांपासून गुरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अवसर मोल, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस कर्मचारी रवि पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या पाहणीनंतर पोलिसांनी, शेतकऱ्यांनी आपली गुरे मोकाट सोडू नयेत, असे आवाहन केले आहे.

कुंभारवाडा या ठिकाणी बिरवाडी ग्रामपंचायतीच्या मालकीचे गुरचरण असून, याला लागूनच ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राउंड आहे. या डम्पिंग ग्राउंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून गुरे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी महाड एमआयडीसी पोलिसांना देताच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थ शेतकºयांनी आपली गुरे मोकाट सोडू नये, असे आवाहन केले आहे. तर आसनपोई येथील शेतकरी हनुमंत पवार यांनी गुरांचा होणारा मृत्यू हा चिंतेचा विषय असून, महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकबंदी केल्यानंतरही कचºयामध्ये प्लास्टिक येते कुठून? असा प्रश्न उपस्थित करून या घटनेची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ व पशुवैद्यकीय अधिकाºयांना कळवून या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

जनावरांचे शव अर्धवट जाळलेल्या अवस्थेत

महाड एमआयडीसीमधील कारखान्यांच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारा रासायनिक सलज प्रक्रियेकरिता न पाठवता ते बिरवाडी ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडवर ओतल्याने चारा समजून जनावराने खाल्ल्याने जनावरे दगावली आहेत. दगावलेल्या जनावरांचे शव अर्धवट जाळलेल्या अवस्थेत आढळल्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आक्षेप जीवन नागरी पर्यावरण संस्थेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक स्वाई यांनी या घटनेनंतर घेतला आहे.

ग्रामपंचायतीने कारवाई करावी

बिरवाडी परिसरातील शेतकºयांची गाय, बैल, म्हैस अशी जनावरे अनेक दिवसांपासून बेपत्ता होण्याच्या घटना घडत आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या गुरचरण शेजारी असणाºया डम्पिंग ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडले. या घटनेची गंभीर दखल घेत बिरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बिरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लक्ष्मण पवार यांनी केली आहे. जनावरे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याने या ठिकाणी वायुप्रदूषण व जलप्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस