शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

बिरवाडीत डम्पिंग ग्राउंडवर गुरांचा मृत्यू; शेतकऱ्यांनी गुरे मोकाट सोडू नयेत, पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 23:38 IST

महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडवर गेल्या दोन दिवसांपासून गुरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडवर गेल्या दोन दिवसांपासून गुरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अवसर मोल, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस कर्मचारी रवि पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या पाहणीनंतर पोलिसांनी, शेतकऱ्यांनी आपली गुरे मोकाट सोडू नयेत, असे आवाहन केले आहे.

कुंभारवाडा या ठिकाणी बिरवाडी ग्रामपंचायतीच्या मालकीचे गुरचरण असून, याला लागूनच ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राउंड आहे. या डम्पिंग ग्राउंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून गुरे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी महाड एमआयडीसी पोलिसांना देताच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थ शेतकºयांनी आपली गुरे मोकाट सोडू नये, असे आवाहन केले आहे. तर आसनपोई येथील शेतकरी हनुमंत पवार यांनी गुरांचा होणारा मृत्यू हा चिंतेचा विषय असून, महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकबंदी केल्यानंतरही कचºयामध्ये प्लास्टिक येते कुठून? असा प्रश्न उपस्थित करून या घटनेची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ व पशुवैद्यकीय अधिकाºयांना कळवून या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

जनावरांचे शव अर्धवट जाळलेल्या अवस्थेत

महाड एमआयडीसीमधील कारखान्यांच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारा रासायनिक सलज प्रक्रियेकरिता न पाठवता ते बिरवाडी ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडवर ओतल्याने चारा समजून जनावराने खाल्ल्याने जनावरे दगावली आहेत. दगावलेल्या जनावरांचे शव अर्धवट जाळलेल्या अवस्थेत आढळल्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आक्षेप जीवन नागरी पर्यावरण संस्थेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक स्वाई यांनी या घटनेनंतर घेतला आहे.

ग्रामपंचायतीने कारवाई करावी

बिरवाडी परिसरातील शेतकºयांची गाय, बैल, म्हैस अशी जनावरे अनेक दिवसांपासून बेपत्ता होण्याच्या घटना घडत आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या गुरचरण शेजारी असणाºया डम्पिंग ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडले. या घटनेची गंभीर दखल घेत बिरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बिरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लक्ष्मण पवार यांनी केली आहे. जनावरे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याने या ठिकाणी वायुप्रदूषण व जलप्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस