शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

सुनावणीनंतर महामुंबई सेझचा अंतिम निकाल राखून ठेवला; ॲड. दत्तात्रेय नवाळे यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 20:11 IST

सुनावणीनंतर महामुंबई सेझचा अंतिम निकाल राखून ठेवला अशी माहिती दत्तात्रेय नवाळे यांनी दिली. 

मधुकर ठाकूर 

उरण : महामुंबई सेझ कंपनीबाबत बुधवारी घेण्यात आलेल्या अंतिम सुनावणीनंतर राज्याचे मुख्य सचिव आणि संबंधित मंत्री, मंत्रालयाशी चर्चा करूनच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल असे आश्वासन देत जिल्हाधिकाऱ्यांनी महामुंबई सेझ प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती ॲड. दत्तात्रेय नवाळे यांनी दिली.

महामुंबई सेझला सन २००६ मध्ये महाराष्ट्र शासनाने उरण, पनवेल व पेण तालुक्यातील ४५ गावांमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्याकरीता जमीन मिळकती साठे कराराने १० हजार हेक्टर जमीन विकत घेण्याची परवानगी दिली होती. परंतु जमीन, मिळकती विकत घेण्यास महामुंबई सेझ कंपनी असमर्थ ठरली होती.

विकास आयुक्त उद्योग यांच्या आदेशानुसार कंपनीतर्फे खरेदी करण्यात आलेल्या व शासनातर्फे भूसंपादित करण्यात आलेल्या भूखंडावर १५ वर्षाच्या आतमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास कंपनीने विकत घेतलेल्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांना त्याच किमतीला परत कराव्यात असे आदेश दिले होते.

कंपनी विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यास असमर्थ ठरल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे नोव्हेंबर २०२१ पासून एकूण ५२३ अर्ज दाखल केले आहेत. या विषयी सन २०२२ च्या उन्हाळी अधिवेशनामध्ये ॲड. आशिष शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यावेळचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सदरची सुनावणी तीन महिन्यामध्ये संपवून निकाल दिला जाईल व शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनी परत देण्यात येतील असे उत्तर दिले होते.त्याची अंतिम १५ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या दालनात पार पडली.या सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. दत्तात्रेय नवाळे, ॲड.वृषाली पाटील,ॲड.कृणाल नवाळे,ॲड.निलेश पाटील यांनी जोरदार युक्तिवाद केला.तर महामुंबई सेझ कंपनीतर्फे ॲड. बारटक्के यांनीही बाजू मांडली.दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर राज्याचे मुख्य सचिव आणि संबंधित मंत्री, मंत्रालयाशी चर्चा करूनच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल असे आश्वासन देत जिल्हाधिकाऱ्यांनी महामुंबई सेझ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबतचा निर्णय राखून ठेवला.अशी माहिती ॲड. दत्तात्रेय नवाळे यांनी दिली.

दरम्यान याआधी विधानसभेच्या सभागृहात विरोधात असलेले आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.आता विरोधात असलेले सत्तेत आले आहेत. त्यामुळे सत्तेत आलेले सत्ताधारी शेतकऱ्यांबाबत कोणता निर्णय घेतात याकडे रायगडातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असल्याची प्रतिक्रिया ॲड. दत्तात्रेय नवाळे यांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण