शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी रस्त्यासाठी खासदारांना दासगाव ग्रामस्थांचे साकडे; महाड, पोलादपूर दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 23:58 IST

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

दासगाव :   मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तेजीत सुरू आहे. दासगाव विभागातील जवळपास ७ वाड्यांतील आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना धोका पत्करून राष्ट्रीय महामार्गावरून ये - जा करावी लागणार आहे. या वाड्यातील नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे महामार्गालगत पर्यायी रस्ता मिळण्यासाठी एक निवेदन दिले. महाड, पोलादपूर दौऱ्यामध्ये यासंदर्भात खासदार तटकरे यांनी दासगावमध्ये थांबून येथील नागरिकांच्या या समस्येबाबत चर्चा करत पर्यायी रस्त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. चौपदरीकरणाचा आडाखडा तयार करून महामार्गासाठी जमिनी भूसंपदीत करण्यात आल्या. कामही सुरू झाले. मात्र, अनेक ठिकाणी नवीन आणि जुन्या वसाहतींसाठी अंतर्गत मार्गाचे नियोजन करण्यात आलेले दिसून येत नाही. अशाच प्रकारे दासगाव गावहद्दीत गणेशनगर, जाधववाडी, चर्मकारवाडी, न्हावी कोंड, बामणे कोंड, आदिवासी वाडी, वांद्रे कोंड आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग दिसून येत नव्हता. या वाड्यातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरूनच धोका पत्करून ये- जा करावी लागणार आहे. त्यामुळे रिहान फैरोज खान देशमुख (प्रदेश युवा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस) आणि विनय जयंता पुरारकर (दासगाव खादीपट्टा विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी या ठिकाणच्या नागरिकांशी पुढे होणाऱ्या गैरसोयीबद्दल चर्चा केली आणि पर्यायी रस्त्यासाठी येथील ग्रामस्थांचे निवेदन खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पोच केले. महाड- पोलादपूर दौऱ्यामध्ये खासदारांनी दासगाव या ठिकाणी थांबून या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी ग्रामस्थ नथुराम निबरे, पांडुरंग निवाते आणि किशोर जाधव यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ठिकाणच्या अडचणींसंदर्भात खासदार तटकरे यांच्याकडे चर्चा केली. मागणी रास्त असल्याने आपण यामध्ये जातीने लक्ष घालू, असे सांगत खासदारांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांना या ठिकाणचे निरीक्षण करण्यास सांगत हा विषय मार्गी लावण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले.

सोमवारी महामार्ग विभागाचे अधिकारी श्रीकांत बांगर आणि अमोल माडकर यांनी या ठिकाणची पाहणी करून पर्यायी मार्ग संदर्भात आडाखडा तयार करून वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचे अश्वासन दिले.मात्र हा पर्यायी मार्ग झाला तर या वाड्यांतील नागरिकांची पर्यायी रस्त्याची समासाय दूर होणार आहे.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे