शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

पर्यायी रस्त्यासाठी खासदारांना दासगाव ग्रामस्थांचे साकडे; महाड, पोलादपूर दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 23:58 IST

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

दासगाव :   मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तेजीत सुरू आहे. दासगाव विभागातील जवळपास ७ वाड्यांतील आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना धोका पत्करून राष्ट्रीय महामार्गावरून ये - जा करावी लागणार आहे. या वाड्यातील नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे महामार्गालगत पर्यायी रस्ता मिळण्यासाठी एक निवेदन दिले. महाड, पोलादपूर दौऱ्यामध्ये यासंदर्भात खासदार तटकरे यांनी दासगावमध्ये थांबून येथील नागरिकांच्या या समस्येबाबत चर्चा करत पर्यायी रस्त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. चौपदरीकरणाचा आडाखडा तयार करून महामार्गासाठी जमिनी भूसंपदीत करण्यात आल्या. कामही सुरू झाले. मात्र, अनेक ठिकाणी नवीन आणि जुन्या वसाहतींसाठी अंतर्गत मार्गाचे नियोजन करण्यात आलेले दिसून येत नाही. अशाच प्रकारे दासगाव गावहद्दीत गणेशनगर, जाधववाडी, चर्मकारवाडी, न्हावी कोंड, बामणे कोंड, आदिवासी वाडी, वांद्रे कोंड आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग दिसून येत नव्हता. या वाड्यातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरूनच धोका पत्करून ये- जा करावी लागणार आहे. त्यामुळे रिहान फैरोज खान देशमुख (प्रदेश युवा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस) आणि विनय जयंता पुरारकर (दासगाव खादीपट्टा विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी या ठिकाणच्या नागरिकांशी पुढे होणाऱ्या गैरसोयीबद्दल चर्चा केली आणि पर्यायी रस्त्यासाठी येथील ग्रामस्थांचे निवेदन खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पोच केले. महाड- पोलादपूर दौऱ्यामध्ये खासदारांनी दासगाव या ठिकाणी थांबून या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी ग्रामस्थ नथुराम निबरे, पांडुरंग निवाते आणि किशोर जाधव यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ठिकाणच्या अडचणींसंदर्भात खासदार तटकरे यांच्याकडे चर्चा केली. मागणी रास्त असल्याने आपण यामध्ये जातीने लक्ष घालू, असे सांगत खासदारांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांना या ठिकाणचे निरीक्षण करण्यास सांगत हा विषय मार्गी लावण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले.

सोमवारी महामार्ग विभागाचे अधिकारी श्रीकांत बांगर आणि अमोल माडकर यांनी या ठिकाणची पाहणी करून पर्यायी मार्ग संदर्भात आडाखडा तयार करून वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचे अश्वासन दिले.मात्र हा पर्यायी मार्ग झाला तर या वाड्यांतील नागरिकांची पर्यायी रस्त्याची समासाय दूर होणार आहे.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे