शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

बांडगुळांमुळे आंबा उत्पादनाला फटका"

By admin | Updated: April 19, 2017 00:47 IST

आंबा हे कोकणातील महत्त्वाचे फळ पीक आहे. कोकण विभागात १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड के लेलीआहे.

जयंत धुळप , अलिबागआंबा हे कोकणातील महत्त्वाचे फळ पीक आहे. कोकण विभागात १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड के लेलीआहे. त्यापैकी सुमारे ४० ते ५० टक्के जुनी व अवाढव्य वाढलेली झाडे आहेत, त्याचबरोबर या झाडांवर वेगवेगळ्या प्रकारचे कीडरोग आणि बांडगुळे देखील वाढत आहेत. आंबा कलमांचे बांडगुळापासून संरक्षण केले नाही तर कलमांची अपेक्षित वाढ होत नाही. तसेच बागेवरील किडींचा देखील वेळीच बंदोबस्त केला नाही तर हातातोंडाशी आलेले आंबा पीक जाण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. परिणामी आंबा उत्पादनवाढीसाठी बांडगूळ निर्मूलन अत्यावश्यक असल्याचा सल्ला अलिबाग उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप ढवळे यांनी दिला आहे.आंबा पिकावर जवळपास वेगवेगळ्या १८५ किडी आढळून आल्या असल्या तरी यापैकी केवळ १० ते १२ किडी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये तुडतुडे, पिठ्या ढेकूण, खोडकिडा शेंडा पोखरणारी अळी,फळमाशी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत १ डिसेंबर २०१६ पासून ‘आंबा पीक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प’ (हॉर्टसॅप)सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे नियमित निरीक्षणे घेऊन कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी सल्ला देण्याचे काम करण्यात येत आहे. बांडगूळ म्हणजे आंब्याच्या झाडावर वाढणारी सपुष्प अर्धपरोपजीवी वनस्पती आहे. ही अर्धपरोपजीवी वनस्पती असल्याप्रमाणेच अन्य द्विदल, बहूवर्षायू फळपिके आणि जंगली झाडांवर परिणाम करते. बांडगुळाची वाढ आंब्याच्या फांदीवर झाल्याने आंब्याच्या झाडाने मुळांवाटे शोषण केलेले तयार अन्नरस बांडगुळ वाढीसाठी वापरले जातात. परिणामी मुख्य झाडाची वाढ मंदावते. झाडावर अनेक बांडगुळे आल्याने आंब्याचे झाड कमकुवत होते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.बांडगुळाची वाढ झाडावर झाल्यावर बांडगुळाला फुले आणि फळे मोठ्या प्रमाणात येतात. ही फळे गोड आणि चिकट असतात. या फळातील बिया पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत प्रसार पावतात आणि फांदीच्या बेचक्यात आणि पृष्ठभागावरील बिया पुढील पावसाळी हंगामात अंकूरण पावतात आणि नवीन बांडगुळांची वाढ होते.आंब्याप्रमाणेच काजू, सीताफळ, पपनस, लिंबू, पेरू, बोर या फळपिकांवर तसेच साग,आसाणा, शेवर, आपटा, बाभूळ, बेल, वड, पिंपळ, शिवण, कडिपत्ता, करंज, रिठा, बेहेडा, अर्जुन आणि अन्य अनेक जंगली झाडांवर बांडगूळ नैसर्गिकरीत्या वाढते आणि त्याचा प्रसार फळबागांत पक्ष्यांमार्फत होतो.बागेभोवती वाढणाऱ्या जंगली झाडांवरील बांडगुळे वेळोवेळी नष्ट करणे अनिवार्य आहे. अमर कोयत्याच्या साहाय्याने आंब्यावरील आणि अन्य फळ पिकावरील बांडगुळे काढून टाकणे आवश्यक आहे. तरच आंब्यावर याचा परिणाम होणार नाही.बांडगुळांच्या निर्मूलनासाठी जागरूकताकोकणातील आंब्याच्या लागवडीखालील १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३० हजार क्षेत्रावरील आंब्याची कलमे ही नवीन आहेत. परिणामी त्यावर बांडगुळाचा प्रादुर्भाव नाही. कोकणातील एकूण आंबा क्षेत्रातील ५ ते १० टक्के क्षेत्रातील दुर्लक्षित आंबा झाडांवर बांडगुळांची शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कोकणातील ६० टक्के आंबा बागायत ही ‘कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग’या पध्दतीत आहे. केवळ ४० टक्के आंबा बागायतदार हे स्वत: मालक आहेत. परिणामी आंबा उत्पादनाकरिता या दोन्ही पद्धतीत बांडगूळ निर्मूलनाची काळजी मोठ्या प्रमाणात घेतली जाते, अशी माहिती कोकणातील नामांकित आंबा संशोधक गणपतीपुळे येथील आंबा उत्पादक कृतिशील शेतकरी डॉ.विवेक भिडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.