शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

बांडगुळांमुळे आंबा उत्पादनाला फटका"

By admin | Updated: April 19, 2017 00:47 IST

आंबा हे कोकणातील महत्त्वाचे फळ पीक आहे. कोकण विभागात १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड के लेलीआहे.

जयंत धुळप , अलिबागआंबा हे कोकणातील महत्त्वाचे फळ पीक आहे. कोकण विभागात १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड के लेलीआहे. त्यापैकी सुमारे ४० ते ५० टक्के जुनी व अवाढव्य वाढलेली झाडे आहेत, त्याचबरोबर या झाडांवर वेगवेगळ्या प्रकारचे कीडरोग आणि बांडगुळे देखील वाढत आहेत. आंबा कलमांचे बांडगुळापासून संरक्षण केले नाही तर कलमांची अपेक्षित वाढ होत नाही. तसेच बागेवरील किडींचा देखील वेळीच बंदोबस्त केला नाही तर हातातोंडाशी आलेले आंबा पीक जाण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. परिणामी आंबा उत्पादनवाढीसाठी बांडगूळ निर्मूलन अत्यावश्यक असल्याचा सल्ला अलिबाग उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप ढवळे यांनी दिला आहे.आंबा पिकावर जवळपास वेगवेगळ्या १८५ किडी आढळून आल्या असल्या तरी यापैकी केवळ १० ते १२ किडी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये तुडतुडे, पिठ्या ढेकूण, खोडकिडा शेंडा पोखरणारी अळी,फळमाशी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत १ डिसेंबर २०१६ पासून ‘आंबा पीक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प’ (हॉर्टसॅप)सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे नियमित निरीक्षणे घेऊन कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी सल्ला देण्याचे काम करण्यात येत आहे. बांडगूळ म्हणजे आंब्याच्या झाडावर वाढणारी सपुष्प अर्धपरोपजीवी वनस्पती आहे. ही अर्धपरोपजीवी वनस्पती असल्याप्रमाणेच अन्य द्विदल, बहूवर्षायू फळपिके आणि जंगली झाडांवर परिणाम करते. बांडगुळाची वाढ आंब्याच्या फांदीवर झाल्याने आंब्याच्या झाडाने मुळांवाटे शोषण केलेले तयार अन्नरस बांडगुळ वाढीसाठी वापरले जातात. परिणामी मुख्य झाडाची वाढ मंदावते. झाडावर अनेक बांडगुळे आल्याने आंब्याचे झाड कमकुवत होते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.बांडगुळाची वाढ झाडावर झाल्यावर बांडगुळाला फुले आणि फळे मोठ्या प्रमाणात येतात. ही फळे गोड आणि चिकट असतात. या फळातील बिया पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत प्रसार पावतात आणि फांदीच्या बेचक्यात आणि पृष्ठभागावरील बिया पुढील पावसाळी हंगामात अंकूरण पावतात आणि नवीन बांडगुळांची वाढ होते.आंब्याप्रमाणेच काजू, सीताफळ, पपनस, लिंबू, पेरू, बोर या फळपिकांवर तसेच साग,आसाणा, शेवर, आपटा, बाभूळ, बेल, वड, पिंपळ, शिवण, कडिपत्ता, करंज, रिठा, बेहेडा, अर्जुन आणि अन्य अनेक जंगली झाडांवर बांडगूळ नैसर्गिकरीत्या वाढते आणि त्याचा प्रसार फळबागांत पक्ष्यांमार्फत होतो.बागेभोवती वाढणाऱ्या जंगली झाडांवरील बांडगुळे वेळोवेळी नष्ट करणे अनिवार्य आहे. अमर कोयत्याच्या साहाय्याने आंब्यावरील आणि अन्य फळ पिकावरील बांडगुळे काढून टाकणे आवश्यक आहे. तरच आंब्यावर याचा परिणाम होणार नाही.बांडगुळांच्या निर्मूलनासाठी जागरूकताकोकणातील आंब्याच्या लागवडीखालील १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३० हजार क्षेत्रावरील आंब्याची कलमे ही नवीन आहेत. परिणामी त्यावर बांडगुळाचा प्रादुर्भाव नाही. कोकणातील एकूण आंबा क्षेत्रातील ५ ते १० टक्के क्षेत्रातील दुर्लक्षित आंबा झाडांवर बांडगुळांची शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कोकणातील ६० टक्के आंबा बागायत ही ‘कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग’या पध्दतीत आहे. केवळ ४० टक्के आंबा बागायतदार हे स्वत: मालक आहेत. परिणामी आंबा उत्पादनाकरिता या दोन्ही पद्धतीत बांडगूळ निर्मूलनाची काळजी मोठ्या प्रमाणात घेतली जाते, अशी माहिती कोकणातील नामांकित आंबा संशोधक गणपतीपुळे येथील आंबा उत्पादक कृतिशील शेतकरी डॉ.विवेक भिडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.