शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Cyclone Tauktae : रायगड जिल्ह्यातील 661 गावे अंधारात, पाच हजार हेक्टरवरील पीक जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 19:03 IST

Cyclone Tauktae : सुमारे पाच हजार हेक्टरवरील आंबा, नारळ आणि भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे12 विद्युत जनित्र कोलमडून पडल्याने जिल्ह्यातील 661 गावांमध्ये अंधार असल्याने एक लाख सहा हजार नागरिक प्रभावित झाले आहेत.

रायगड : तौक्ते वादळामुळे जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. विजेच्या खांबाची हानी झाल्याने अद्यापही 661 गावे अंधरात आहेत. सुमारे पाच हजार हेक्टरवरील आंबा, नारळ आणि भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ही प्राथमिक माहिती असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नुकसानी आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी जिल्ह्यात थैमान घालत ते सायंकाळी गुजरात राज्याकडे सरकले. तत्पूर्वी वादळामुळे जिल्ह्यात विविध स्तरावर हानी झाली आहे. वादळामुळे जिल्ह्यातील चार नागरिकांचा जीव गेला आहे, तर सात नागरिक जखमी झाले. 6026 घरांची अंशता पडझड झाली, तर 10 घरे पूर्णतः उध्वस्त झाली. 168 उच्च दाब खांबाचे तर 426 कमी दाबाच्या खांबाचे नुकसान झाले. 12 विद्युत जनित्र कोलमडून पडल्याने जिल्ह्यातील 661 गावांमध्ये अंधार असल्याने एक लाख सहा हजार नागरिक प्रभावित झाले आहेत.

या कालावधीत मासेमारी नौकांना समुद्रामध्ये मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे बहुतांश नौका या किनारी होत्या. वादळामुळे 10 बोटींचे तर 12 मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे.गेल्या तीन दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे फळ झांडाचे कमी परंतू फळांचे नुकसान झाल्याने बागायतदार हवालदील झाले आहेत.

नुकसानीचे पंचनामे सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे किती रुपयांचे नुकसान झाले हे पंचनामे पूर्ण झाल्यावरच कळणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, पंचनामे करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळRaigadरायगड