शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 19:15 IST

सदर पथक अलिबाग,नागाव,चौलहून बोर्ली आणि  काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते

आविष्कार देसाईअलिबाग: काेकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी आज राेखला. अलिबाग तालुक्यातील नागाव आणि मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील नागरिकांच्या राेषाला पथकाला सामाेरे जावे लागले आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्या नंतरच पुढे जा असा पवित्रा त्यांनी घेतल्याने तेथे काही काळ तणाव निर्माण झाल हाेता.

सकाळी 10 वाजता अलिबाग मांडवा जेट्टी येथे राेराे सेवेने आगमन झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठक घेतल्यानंतर ते प्रत्यक्ष पाहणीसाठी निघाले. सुरुवातीला अलिबाग नागाव येथील पडझड झालेल्या एका खासगी शाळेची पाहणी केली. त्यानंतर चाैलकडे पथक जात असतानाच वाटेत विजेचे पाेल बसवण्याचे काम सुरु हाेते. ग्रामस्थांच्या मदतीने महावितरणचे काम करत हाेते. त्यामुळे रस्ता पूर्णतः बंद झाला हाेता. केंद्रीय पथकाचा ताफा चालला आहे. रस्ता माेकळा करा असे पाेलिस अधिकाऱ्यांनी संबंधीतांना सांगितले. तेव्हा ग्रामस्थ नाराज झाले. गेले 15 दिवस गावात लाईट नाही, पाणी नाही असे सांगत गाेंधळ घातला. त्यानंतर प्रांताधिकारी शारदा पाेवार यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर रस्ता माेकळा करण्यात आला. तसेच केंद्रीय पथक नुकसानग्रस्त नारळ सुपारीसह अन्य फळांच्या बागांची पहाणी न करता परस्पर निघुन जात हाेते. त्यावेळी नांदगावमधील बागायतदारांनी त्यांचा रस्ता राेखला आणि आपल्या व्यथा पथकासमाेर मांडल्या.

सदर पथक अलिबाग,नागाव,चौलहून बोर्ली आणि  काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते. नांदगावमधील केवळ बागायतींची पहाणी ते करणार होते. परंतु सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे सदर पथकातील सदस्यांना नियोजित स्थळी वेळेत पोचता आले नाही. त्यामुळे आधीच वाट पाहून कंटाळलेल्या बागायतदारांना डावलून मुरुडकडे रवाना होणाऱ्या या पथकाला नांदगावच्या बागायतदारांनी रस्त्यातच राेखले आणि आपले म्हणणे ऐकण्यास भाग पाडले. रमाकांत खोत यांच्या बागायती जवळ नांदगावचे उपसरपंच अस्लम हलडे,पंकज दळवी विशाल चोरघे,श्रद्धा गद्रे,उदय खोत,सतिश देशपांडे,विलास ठोसर,रमेश चौलकर,सचिन खोत आदींनी पथकाच्या गाड्यांसमोर उभे राहून आपल्या नुकसानीचा पाढाच वाचला. कोकणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. सदर मदत तातडीने देण्यात यावी असेही त्यांनी या वेळी पथकातील सदस्यांना सांगितले. त्यानंतर हे पथक श्रीवर्धनकडे रवाना झाले. 17 जूनला केंद्रीय पथक महाडहून रत्नागिरीकडे प्रयाण करुन दिवसभर तेथील नुकसानीची पाहणी करणार आहे. 18 जून राेजी दापाेलीहून सकाळी लवकर निघून ते मांडवा जेट्टी येथून राे-राे सेवेने मुंबईला रवाना हाेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.केंद्र सरकारने नेमलेल्या या पथकाचे प्रमुख रमेश कुमार गांता ( संयुक्त सचिव) हे आहेत. त्याचबराेबर त्यांच्या पथकामध्ये बी.के.काैल (संचालक, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन.आर.एल.के.प्रसाद (संचालक, उर्जा मंत्रालय नवी दिल्ली), एस.एस.माेदी (उपसचिव, ग्रामिण विकास, मंत्रालय, नवी दिल्ली), आर.पी.सिंग. (संचालक, कृषीमंत्रालय, नागपूर) आणि अनशूमाली श्रीवास्तव ( मुख्यअभियंता, रस्ते,वाहतुक, महामार्ग, मुंबई) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगड