शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 19:15 IST

सदर पथक अलिबाग,नागाव,चौलहून बोर्ली आणि  काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते

आविष्कार देसाईअलिबाग: काेकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी आज राेखला. अलिबाग तालुक्यातील नागाव आणि मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील नागरिकांच्या राेषाला पथकाला सामाेरे जावे लागले आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्या नंतरच पुढे जा असा पवित्रा त्यांनी घेतल्याने तेथे काही काळ तणाव निर्माण झाल हाेता.

सकाळी 10 वाजता अलिबाग मांडवा जेट्टी येथे राेराे सेवेने आगमन झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठक घेतल्यानंतर ते प्रत्यक्ष पाहणीसाठी निघाले. सुरुवातीला अलिबाग नागाव येथील पडझड झालेल्या एका खासगी शाळेची पाहणी केली. त्यानंतर चाैलकडे पथक जात असतानाच वाटेत विजेचे पाेल बसवण्याचे काम सुरु हाेते. ग्रामस्थांच्या मदतीने महावितरणचे काम करत हाेते. त्यामुळे रस्ता पूर्णतः बंद झाला हाेता. केंद्रीय पथकाचा ताफा चालला आहे. रस्ता माेकळा करा असे पाेलिस अधिकाऱ्यांनी संबंधीतांना सांगितले. तेव्हा ग्रामस्थ नाराज झाले. गेले 15 दिवस गावात लाईट नाही, पाणी नाही असे सांगत गाेंधळ घातला. त्यानंतर प्रांताधिकारी शारदा पाेवार यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर रस्ता माेकळा करण्यात आला. तसेच केंद्रीय पथक नुकसानग्रस्त नारळ सुपारीसह अन्य फळांच्या बागांची पहाणी न करता परस्पर निघुन जात हाेते. त्यावेळी नांदगावमधील बागायतदारांनी त्यांचा रस्ता राेखला आणि आपल्या व्यथा पथकासमाेर मांडल्या.

सदर पथक अलिबाग,नागाव,चौलहून बोर्ली आणि  काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते. नांदगावमधील केवळ बागायतींची पहाणी ते करणार होते. परंतु सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे सदर पथकातील सदस्यांना नियोजित स्थळी वेळेत पोचता आले नाही. त्यामुळे आधीच वाट पाहून कंटाळलेल्या बागायतदारांना डावलून मुरुडकडे रवाना होणाऱ्या या पथकाला नांदगावच्या बागायतदारांनी रस्त्यातच राेखले आणि आपले म्हणणे ऐकण्यास भाग पाडले. रमाकांत खोत यांच्या बागायती जवळ नांदगावचे उपसरपंच अस्लम हलडे,पंकज दळवी विशाल चोरघे,श्रद्धा गद्रे,उदय खोत,सतिश देशपांडे,विलास ठोसर,रमेश चौलकर,सचिन खोत आदींनी पथकाच्या गाड्यांसमोर उभे राहून आपल्या नुकसानीचा पाढाच वाचला. कोकणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. सदर मदत तातडीने देण्यात यावी असेही त्यांनी या वेळी पथकातील सदस्यांना सांगितले. त्यानंतर हे पथक श्रीवर्धनकडे रवाना झाले. 17 जूनला केंद्रीय पथक महाडहून रत्नागिरीकडे प्रयाण करुन दिवसभर तेथील नुकसानीची पाहणी करणार आहे. 18 जून राेजी दापाेलीहून सकाळी लवकर निघून ते मांडवा जेट्टी येथून राे-राे सेवेने मुंबईला रवाना हाेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.केंद्र सरकारने नेमलेल्या या पथकाचे प्रमुख रमेश कुमार गांता ( संयुक्त सचिव) हे आहेत. त्याचबराेबर त्यांच्या पथकामध्ये बी.के.काैल (संचालक, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन.आर.एल.के.प्रसाद (संचालक, उर्जा मंत्रालय नवी दिल्ली), एस.एस.माेदी (उपसचिव, ग्रामिण विकास, मंत्रालय, नवी दिल्ली), आर.पी.सिंग. (संचालक, कृषीमंत्रालय, नागपूर) आणि अनशूमाली श्रीवास्तव ( मुख्यअभियंता, रस्ते,वाहतुक, महामार्ग, मुंबई) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगड