शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 19:15 IST

सदर पथक अलिबाग,नागाव,चौलहून बोर्ली आणि  काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते

आविष्कार देसाईअलिबाग: काेकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी आज राेखला. अलिबाग तालुक्यातील नागाव आणि मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील नागरिकांच्या राेषाला पथकाला सामाेरे जावे लागले आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्या नंतरच पुढे जा असा पवित्रा त्यांनी घेतल्याने तेथे काही काळ तणाव निर्माण झाल हाेता.

सकाळी 10 वाजता अलिबाग मांडवा जेट्टी येथे राेराे सेवेने आगमन झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठक घेतल्यानंतर ते प्रत्यक्ष पाहणीसाठी निघाले. सुरुवातीला अलिबाग नागाव येथील पडझड झालेल्या एका खासगी शाळेची पाहणी केली. त्यानंतर चाैलकडे पथक जात असतानाच वाटेत विजेचे पाेल बसवण्याचे काम सुरु हाेते. ग्रामस्थांच्या मदतीने महावितरणचे काम करत हाेते. त्यामुळे रस्ता पूर्णतः बंद झाला हाेता. केंद्रीय पथकाचा ताफा चालला आहे. रस्ता माेकळा करा असे पाेलिस अधिकाऱ्यांनी संबंधीतांना सांगितले. तेव्हा ग्रामस्थ नाराज झाले. गेले 15 दिवस गावात लाईट नाही, पाणी नाही असे सांगत गाेंधळ घातला. त्यानंतर प्रांताधिकारी शारदा पाेवार यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर रस्ता माेकळा करण्यात आला. तसेच केंद्रीय पथक नुकसानग्रस्त नारळ सुपारीसह अन्य फळांच्या बागांची पहाणी न करता परस्पर निघुन जात हाेते. त्यावेळी नांदगावमधील बागायतदारांनी त्यांचा रस्ता राेखला आणि आपल्या व्यथा पथकासमाेर मांडल्या.

सदर पथक अलिबाग,नागाव,चौलहून बोर्ली आणि  काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते. नांदगावमधील केवळ बागायतींची पहाणी ते करणार होते. परंतु सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे सदर पथकातील सदस्यांना नियोजित स्थळी वेळेत पोचता आले नाही. त्यामुळे आधीच वाट पाहून कंटाळलेल्या बागायतदारांना डावलून मुरुडकडे रवाना होणाऱ्या या पथकाला नांदगावच्या बागायतदारांनी रस्त्यातच राेखले आणि आपले म्हणणे ऐकण्यास भाग पाडले. रमाकांत खोत यांच्या बागायती जवळ नांदगावचे उपसरपंच अस्लम हलडे,पंकज दळवी विशाल चोरघे,श्रद्धा गद्रे,उदय खोत,सतिश देशपांडे,विलास ठोसर,रमेश चौलकर,सचिन खोत आदींनी पथकाच्या गाड्यांसमोर उभे राहून आपल्या नुकसानीचा पाढाच वाचला. कोकणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. सदर मदत तातडीने देण्यात यावी असेही त्यांनी या वेळी पथकातील सदस्यांना सांगितले. त्यानंतर हे पथक श्रीवर्धनकडे रवाना झाले. 17 जूनला केंद्रीय पथक महाडहून रत्नागिरीकडे प्रयाण करुन दिवसभर तेथील नुकसानीची पाहणी करणार आहे. 18 जून राेजी दापाेलीहून सकाळी लवकर निघून ते मांडवा जेट्टी येथून राे-राे सेवेने मुंबईला रवाना हाेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.केंद्र सरकारने नेमलेल्या या पथकाचे प्रमुख रमेश कुमार गांता ( संयुक्त सचिव) हे आहेत. त्याचबराेबर त्यांच्या पथकामध्ये बी.के.काैल (संचालक, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन.आर.एल.के.प्रसाद (संचालक, उर्जा मंत्रालय नवी दिल्ली), एस.एस.माेदी (उपसचिव, ग्रामिण विकास, मंत्रालय, नवी दिल्ली), आर.पी.सिंग. (संचालक, कृषीमंत्रालय, नागपूर) आणि अनशूमाली श्रीवास्तव ( मुख्यअभियंता, रस्ते,वाहतुक, महामार्ग, मुंबई) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगड