शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

Cyclone Nisarga: मदतीबाबत लवकरच चांगला निर्णय- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 23:31 IST

दिवेआगरमध्ये धनादेशाचे वाटप; रायगड, रत्नागिरीतील नुकसानग्रस्तांना समाधानकारक भरपाई मिळणार

बोर्लीपंचतन : रायगड, रत्नागिरीमध्ये चक्रीवादळाने नुकसानग्रस्त जनतेला समाधानकारक मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शासनाचादेखील यावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, नुकसानग्रस्त व पंचनामे झालेल्या सर्व नागरिकांना शासनाची आर्थिक स्वरूपातील मदत निश्चितपणे पोहोचेलच शिवाय भवितव्याच्या दृष्टीनेदेखील शासन लवकर चांगले निर्णय जाहीर करेल, असे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दिवेआगर येथील चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या सात नागरिकांना मदतीचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आला, या वेळी खा. तटकरे बोलत होते.निसर्ग चक्रीवादळामुळे श्रीवर्धन, मुरूड, म्हसळा, रोहा, महाड, अलिबाग अशा तालुक्यातील घरांचे, बागायतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने शनिवार १३ जून रोजी सायंकाळी मदतीच्या धनादेशाचे वाटप दिवेआगर येथे करण्यात आले. धनादेशाचे वाटप रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार सुनील तटकरे, सरपंच उदय बापट, प्रांताधिकारी अमित शेडगे आदी उपस्थित होते. दीड लाख रुपयांचे चार जणांना तर १५ हजारांचे धनादेश तीन नागरिकांना वाटप करण्यात आले.या वेळी पत्रकारांशी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागातील नागरिकांना मदत देण्याचे शासनाचे निष्कर्ष रायगडमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळातील नुकसानभरपाई देताना मोठ्या प्रमाणावर बदलावे लागत आहेत. त्यादृष्टीने सकारात्मक निर्णय शासन घेत आहे. या निर्णयामध्ये लवकरच अजूनही बदल होऊन शासनाची आर्थिक मदत पोहोचण्याचा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रीवर्धनच्या दौऱ्यावर असताना शासनावर टीका केली की, अनेक दिवस उलटूनही शासनाची मदत नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही, सरकार अपयशी ठरले आहे. याला प्रतिउत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, ही वेळ राजकारण करण्याची नाही, फडणवीसांनी केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे.‘पर्यटन व्यवसायाबाबत पाठपुरावा करणार’पर्यटन व्यवसाय हा सागरी किनारपट्टीतील जनतेचा महत्त्वाचा व्यवसाय असून आधी कोरोनामुळे तर आता चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसाय गेला असून त्यादृष्टीने ज्या नागरिकांनी कर्ज घेतले असेल अशांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी लवकरच पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या उभारणीसाठी विशेष आर्थिक पॅकेज शासनाने देण्याबाबत प्रयत्नशील आहे. चक्रीवादळामुळे ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे व ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्या सर्व नागरिकांना थोडा उशीर होईल, पण शासनाची आर्थिक मदत नक्कीच पोहोचेल असा विश्वास तटकरे त्यांनी व्यक्त केला.मृताच्या कु टुंबीयांना धनादेश वाटपम्हसळा : पांगळोली येथील महम्मद अब्दुल रझाक धनसे (२४) तरुणाचा ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळात अपघाताने मृत्यू झाला.शासन मंजूर मदतीचा चार लाखांचा धनादेश महम्मद यांचे वडील अब्दुल रझाक धनसे यांच्याकडे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.या वेळी त्यांच्या समवेत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अलीशेट कौचाली, निवासी नायब तहसीलदार के.टी. भिंगारे आदी उपस्थित होते.पालकमंत्र्यांच्या हस्ते वादळग्रस्तांना धनादेशांचे वाटपतळा : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आर्थिक धनादेशाचे वाटप करण्यात आले. बुधवार ३ रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तळा तालुक्याला मोठा फटका बसला.नागरिकांनी साठविलेले वर्षभराचा अन्न धान्याचासाठा घरावरील छप्पर उडून गेल्याने वाया गेला. तसेच चक्रीवादळात शेती उध्वस्त होऊन काहींचे घर कोसळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.तालुक्यातील अशा नागरिकांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आर्थिक धनादेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसीलदार ए. एम.कनशेट्टी, नगराध्यक्षा रेश्मा मुंढे आदी उपस्थित होते.साडेपाच लाखांच्या आर्थिक मदतीचे वाटपरोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीतील मधुकर कृष्णा शिंदे १ लाख ५६ हजार, अमित नारायण पवार ३० हजार २००, विलास तुकाराम कोल्हटकर १ लाख ६० हजार, सुरेंद्र जनार्दन साठेकर १ लाख ६० हजार, ज्योती जनार्दन धुमाळ ८४ हजार ६०० असे एकूण ५ लाख ९० हजार ८०० रुपयांच्या मदतीचे धनादेश रविवारी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.या वेळी प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, कृषी अधिकारी अशोक महामुनी, विस्तार अधिकारी महारुद्र फरतडे उपस्थित होते.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळsunil tatkareसुनील तटकरे