शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळामुळे रायगडमध्ये कोट्यवधींचे झाले नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:11 IST

ठिकठिकाणी पंचनामे सुरू; मुंबई-ठाण्यासह नाशिक, पुण्यातही दणका

लोकमत न्युज नेटवर्कअलिबाग : निसर्ग चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्याच्या मुरुड समुद्रकिनारी धडकल्याने याचा फटका हा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्याला बसला आहे. या वादळाने खासगी आणि शासकीय मालमत्तेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यानंतर पोलीस प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेले झाडे काढून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले आहेत.

चक्रीवादळामुळे मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील मोबाईल नेटवर्क बंद पडले होते, तर वीजप्रवाह पूर्ण बंद करण्यात आला होता. अलिबाग तालुक्यातील उमटे येथील दशरथ वाघमारे (५८) महावितरणचा पोल पडून, तर श्रीवर्धन मध्ये भिंत पडून एक असे दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच शेतातही पावसामुळे पाणी साचले.

या वादळाचा रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नाशिकसह पुणे आणि नगर जिल्ह्यातील काही भागातही जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जिल्ह्यात ‘निसर्ग’चा प्रभाव कमी झाला असला तरी पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरीत गेल्या २४ तासात सरासरी ९३.४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड, दापोली, चिपळूण व मंडणगड या तालुक्यांमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १०८ मि.मी पाऊस झाला.

नाशिक जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पेठ, नांदगाव वगळता उर्वरित १३ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. इगतपुरी, सिन्नरमार्गे पुढे मार्गस्थ झालेल्या या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा या दोन्ही तालुक्यांना बसला असून, सरासरी ११० मिलीमीटर पावसाची नोंद झााली आहे. यामुळे ५६ जनावारे दगावली आहेत, तर १९१ हेक्टरवरील पिकांचेही नुकसान झाले.अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात एकाचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे दगावली. साडेसातशेपेक्षा जास्त घरांना हानी पोहोचली आहे, तर ६३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. पुणे जिल्ह्यात १६०० घरे, ५७ अंगणवाडी, ३१ शाळा आणि ४ ग्रामपंचायत इमारतींचे नुकसान झाले आहे. याशिवाय ४०२ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.१८,८८७नागरिक स्थलांतरितच्मुरुडला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईलाही फटका बसला. निसर्ग वादळामुळे वारा वाहत असताना, पाऊस पडत असताना ९ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. १९६ ठिकाणी झाडे कोसळली. तर २० ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. यावेळी ३५ ठिकाणी तात्पुरते निवारे म्हणून महापालिकेच्या शाळा उघडण्यात आल्या.च्समुद्र किनारी राहत असलेल्या १८ हजार ८८७ नागरिकांना येथे स्थलांतरित करण्यात आले होते. आता या नागरिकांचे स्क्रिनिंग केल्यानंतर त्यांना घरी जाऊ दिले जात आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळतील त्यांना आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ