शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळामुळे रायगडमध्ये कोट्यवधींचे झाले नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:11 IST

ठिकठिकाणी पंचनामे सुरू; मुंबई-ठाण्यासह नाशिक, पुण्यातही दणका

लोकमत न्युज नेटवर्कअलिबाग : निसर्ग चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्याच्या मुरुड समुद्रकिनारी धडकल्याने याचा फटका हा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्याला बसला आहे. या वादळाने खासगी आणि शासकीय मालमत्तेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यानंतर पोलीस प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेले झाडे काढून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले आहेत.

चक्रीवादळामुळे मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील मोबाईल नेटवर्क बंद पडले होते, तर वीजप्रवाह पूर्ण बंद करण्यात आला होता. अलिबाग तालुक्यातील उमटे येथील दशरथ वाघमारे (५८) महावितरणचा पोल पडून, तर श्रीवर्धन मध्ये भिंत पडून एक असे दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच शेतातही पावसामुळे पाणी साचले.

या वादळाचा रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नाशिकसह पुणे आणि नगर जिल्ह्यातील काही भागातही जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जिल्ह्यात ‘निसर्ग’चा प्रभाव कमी झाला असला तरी पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरीत गेल्या २४ तासात सरासरी ९३.४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड, दापोली, चिपळूण व मंडणगड या तालुक्यांमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १०८ मि.मी पाऊस झाला.

नाशिक जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पेठ, नांदगाव वगळता उर्वरित १३ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. इगतपुरी, सिन्नरमार्गे पुढे मार्गस्थ झालेल्या या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा या दोन्ही तालुक्यांना बसला असून, सरासरी ११० मिलीमीटर पावसाची नोंद झााली आहे. यामुळे ५६ जनावारे दगावली आहेत, तर १९१ हेक्टरवरील पिकांचेही नुकसान झाले.अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात एकाचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे दगावली. साडेसातशेपेक्षा जास्त घरांना हानी पोहोचली आहे, तर ६३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. पुणे जिल्ह्यात १६०० घरे, ५७ अंगणवाडी, ३१ शाळा आणि ४ ग्रामपंचायत इमारतींचे नुकसान झाले आहे. याशिवाय ४०२ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.१८,८८७नागरिक स्थलांतरितच्मुरुडला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईलाही फटका बसला. निसर्ग वादळामुळे वारा वाहत असताना, पाऊस पडत असताना ९ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. १९६ ठिकाणी झाडे कोसळली. तर २० ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. यावेळी ३५ ठिकाणी तात्पुरते निवारे म्हणून महापालिकेच्या शाळा उघडण्यात आल्या.च्समुद्र किनारी राहत असलेल्या १८ हजार ८८७ नागरिकांना येथे स्थलांतरित करण्यात आले होते. आता या नागरिकांचे स्क्रिनिंग केल्यानंतर त्यांना घरी जाऊ दिले जात आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळतील त्यांना आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ