शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

चक्रीवादळामुळे रायगडमध्ये कोट्यवधींचे झाले नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:11 IST

ठिकठिकाणी पंचनामे सुरू; मुंबई-ठाण्यासह नाशिक, पुण्यातही दणका

लोकमत न्युज नेटवर्कअलिबाग : निसर्ग चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्याच्या मुरुड समुद्रकिनारी धडकल्याने याचा फटका हा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्याला बसला आहे. या वादळाने खासगी आणि शासकीय मालमत्तेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यानंतर पोलीस प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेले झाडे काढून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले आहेत.

चक्रीवादळामुळे मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील मोबाईल नेटवर्क बंद पडले होते, तर वीजप्रवाह पूर्ण बंद करण्यात आला होता. अलिबाग तालुक्यातील उमटे येथील दशरथ वाघमारे (५८) महावितरणचा पोल पडून, तर श्रीवर्धन मध्ये भिंत पडून एक असे दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच शेतातही पावसामुळे पाणी साचले.

या वादळाचा रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नाशिकसह पुणे आणि नगर जिल्ह्यातील काही भागातही जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जिल्ह्यात ‘निसर्ग’चा प्रभाव कमी झाला असला तरी पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरीत गेल्या २४ तासात सरासरी ९३.४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड, दापोली, चिपळूण व मंडणगड या तालुक्यांमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १०८ मि.मी पाऊस झाला.

नाशिक जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पेठ, नांदगाव वगळता उर्वरित १३ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. इगतपुरी, सिन्नरमार्गे पुढे मार्गस्थ झालेल्या या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा या दोन्ही तालुक्यांना बसला असून, सरासरी ११० मिलीमीटर पावसाची नोंद झााली आहे. यामुळे ५६ जनावारे दगावली आहेत, तर १९१ हेक्टरवरील पिकांचेही नुकसान झाले.अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात एकाचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे दगावली. साडेसातशेपेक्षा जास्त घरांना हानी पोहोचली आहे, तर ६३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. पुणे जिल्ह्यात १६०० घरे, ५७ अंगणवाडी, ३१ शाळा आणि ४ ग्रामपंचायत इमारतींचे नुकसान झाले आहे. याशिवाय ४०२ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.१८,८८७नागरिक स्थलांतरितच्मुरुडला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईलाही फटका बसला. निसर्ग वादळामुळे वारा वाहत असताना, पाऊस पडत असताना ९ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. १९६ ठिकाणी झाडे कोसळली. तर २० ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. यावेळी ३५ ठिकाणी तात्पुरते निवारे म्हणून महापालिकेच्या शाळा उघडण्यात आल्या.च्समुद्र किनारी राहत असलेल्या १८ हजार ८८७ नागरिकांना येथे स्थलांतरित करण्यात आले होते. आता या नागरिकांचे स्क्रिनिंग केल्यानंतर त्यांना घरी जाऊ दिले जात आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळतील त्यांना आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ