शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कर्जतमध्ये रंगला ‘सायकल कट्टा’; डोंबिवली ते गोवा ममता परदेशी यांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 00:34 IST

प्रवासाला निघण्यापूर्वी रूट मॅप तसेच कोणकोणती गावे लागतात त्यातील कोणत्या गावात राहण्याची, खाण्याची सोया होऊ शकते याची माहिती घेतली होती.

कर्जत : आजपर्यंत तुम्ही मुंबई- गोवा असा प्रवास विमानाने, बोटीने, खाजगी वाहनाने अथवा जास्तीत जास्त मोटारसायकलने केला असेल मात्र डोंबिवलीच्या ममता परदेशी या महिलेने चक्क सायकलवरून डोंबिवली ते गोवा असा ५९० किलोमीटरचा प्रवास केला. एवढेच काय तर डोंबिवली ते हिमालय असे १७,९०० किलोमीटरचा खडतर प्रवास यशस्वी रित्या पूर्ण केला. या सारख्याच मीरा वैद्य, शशांक वैद्य तसेच रुपेश, अनंत, तुषार या सायकलस्वारांशी गप्पा मारण्यासाठी सायकल पटू प्रकाश पटवर्धन आणि संतोष दगडे यांनी ‘सायकल कट्टा’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी कर्जत मालवाडी येथील रॉयल कॅम्पमध्ये करण्यात आले होते.

सुरवातीला प्रशांत ननावरे यांनी या कार्यक्रमाचा हेतू , उद्दिष्ट सांगितले. सायकल चालविल्याने शरीराला तर व्यायाम तर मिळतोच आणि शक्य असेल तिथे मोटारसायकल ऐवजी सायकलने गेल्यास इंधनाची परिणामी पैशाची बचत होते. गाड्यांच्या धुरातून होणारे प्रदूषण ही रोखले जाते. बाहेरच्या अनेक देशात सायकलवरून कामाला जाणारे लोक आहेत असेही त्यांनी सांगितले. तेथे त्यासाठी सायकल ट्रॅक सुद्धा आहेत. त्यामुळे आपणही जास्तीत जास्त सायकलचा वापर केला पाहिजे असे मत व्यक्त के ले.

निवेदक कपिल केळकर यांनी ममता परदेशी यांचा डोंबिवली ते गोवा आणि हिमालय या प्रवासाबाबत ममता यांना बोलते केले. यावेळी ममता यांनी मी कधीच यापूर्वी गोव्याला गेले नव्हते. मात्र सायकल चालवायची आवड होती आणि आपण काय तरी वेगळे करायचे या जिद्दीने सायकल वरून गोव्याला जायचे ठरवले. त्यासाठी दररोज सायकलिंगचा सराव केला. लग्न झालेले असल्याने संसार,पती, मुलगा या सर्वांची संमती घेऊन सर्वात प्रथम एप्रिल २०१५ ला डोंबिवली येथील प्राचीन मंदिर आहे तेथून दर्शन घेऊन पहाटे ५.३० सर्वांचा निरोप घेत गोव्याच्या प्रवासाला एकटीनेच सायकलवरून सुरवात केली.

प्रवासाला निघण्यापूर्वी रूट मॅप तसेच कोणकोणती गावे लागतात त्यातील कोणत्या गावात राहण्याची, खाण्याची सोया होऊ शकते याची माहिती घेतली होती. त्यामुळे प्रवास करतांना फारशा अडचणी आल्या नाहीत. दिवसाला १०० ते १३० तीस किलोमीटर अंतर पार करत पाच दिवसात सुखरूप गोवा गाठले. त्यानंतर डोंबिवली ते कोल्हापूर असे सायकलिंग केले आणि त्यानंतर ३१ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत डोंबिवली ते हिमालय असा तब्बल १७,९०० किलो मीटरचे अंतर पार करत सायकलवरून धाडसी प्रवास केला. मात्र यावेळेस माझ्या बरोबर५४ वर्षांचे रमाकांत महाडिक (अप्पा )हे सायकल पटू होते. या अशा बर्फाळ प्रदेशात सायकलिंग करतांना त्यांची मोठी मदत झाली. काही ठिकाणी तर सायकल उचलून घेऊन अवघड रस्ते पार करावे लागले.

आता या पुढे सह्याद्री पर्वतातील सर्व गड किल्ल्यांना सायकलवरून भेट देणार असल्याचा मनोदय व्यक्त केला .याच प्रमाणे मीरा वैद्य ,शशांक वैद्य यांनीहि मध्य प्रदेश अन्य लांबचे खडतर प्रवास केल्याचे सांगितले. तसेच रुपेश, अनंत, तुषार, अमित घुमरे या सायकलस्वारांनीही आपले थरारक प्रवास वर्णन उपस्थितांसमोर कथन केले.

टॅग्स :RaigadरायगडCyclingसायकलिंग