शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कर्जतमध्ये रंगला ‘सायकल कट्टा’; डोंबिवली ते गोवा ममता परदेशी यांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 00:34 IST

प्रवासाला निघण्यापूर्वी रूट मॅप तसेच कोणकोणती गावे लागतात त्यातील कोणत्या गावात राहण्याची, खाण्याची सोया होऊ शकते याची माहिती घेतली होती.

कर्जत : आजपर्यंत तुम्ही मुंबई- गोवा असा प्रवास विमानाने, बोटीने, खाजगी वाहनाने अथवा जास्तीत जास्त मोटारसायकलने केला असेल मात्र डोंबिवलीच्या ममता परदेशी या महिलेने चक्क सायकलवरून डोंबिवली ते गोवा असा ५९० किलोमीटरचा प्रवास केला. एवढेच काय तर डोंबिवली ते हिमालय असे १७,९०० किलोमीटरचा खडतर प्रवास यशस्वी रित्या पूर्ण केला. या सारख्याच मीरा वैद्य, शशांक वैद्य तसेच रुपेश, अनंत, तुषार या सायकलस्वारांशी गप्पा मारण्यासाठी सायकल पटू प्रकाश पटवर्धन आणि संतोष दगडे यांनी ‘सायकल कट्टा’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी कर्जत मालवाडी येथील रॉयल कॅम्पमध्ये करण्यात आले होते.

सुरवातीला प्रशांत ननावरे यांनी या कार्यक्रमाचा हेतू , उद्दिष्ट सांगितले. सायकल चालविल्याने शरीराला तर व्यायाम तर मिळतोच आणि शक्य असेल तिथे मोटारसायकल ऐवजी सायकलने गेल्यास इंधनाची परिणामी पैशाची बचत होते. गाड्यांच्या धुरातून होणारे प्रदूषण ही रोखले जाते. बाहेरच्या अनेक देशात सायकलवरून कामाला जाणारे लोक आहेत असेही त्यांनी सांगितले. तेथे त्यासाठी सायकल ट्रॅक सुद्धा आहेत. त्यामुळे आपणही जास्तीत जास्त सायकलचा वापर केला पाहिजे असे मत व्यक्त के ले.

निवेदक कपिल केळकर यांनी ममता परदेशी यांचा डोंबिवली ते गोवा आणि हिमालय या प्रवासाबाबत ममता यांना बोलते केले. यावेळी ममता यांनी मी कधीच यापूर्वी गोव्याला गेले नव्हते. मात्र सायकल चालवायची आवड होती आणि आपण काय तरी वेगळे करायचे या जिद्दीने सायकल वरून गोव्याला जायचे ठरवले. त्यासाठी दररोज सायकलिंगचा सराव केला. लग्न झालेले असल्याने संसार,पती, मुलगा या सर्वांची संमती घेऊन सर्वात प्रथम एप्रिल २०१५ ला डोंबिवली येथील प्राचीन मंदिर आहे तेथून दर्शन घेऊन पहाटे ५.३० सर्वांचा निरोप घेत गोव्याच्या प्रवासाला एकटीनेच सायकलवरून सुरवात केली.

प्रवासाला निघण्यापूर्वी रूट मॅप तसेच कोणकोणती गावे लागतात त्यातील कोणत्या गावात राहण्याची, खाण्याची सोया होऊ शकते याची माहिती घेतली होती. त्यामुळे प्रवास करतांना फारशा अडचणी आल्या नाहीत. दिवसाला १०० ते १३० तीस किलोमीटर अंतर पार करत पाच दिवसात सुखरूप गोवा गाठले. त्यानंतर डोंबिवली ते कोल्हापूर असे सायकलिंग केले आणि त्यानंतर ३१ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत डोंबिवली ते हिमालय असा तब्बल १७,९०० किलो मीटरचे अंतर पार करत सायकलवरून धाडसी प्रवास केला. मात्र यावेळेस माझ्या बरोबर५४ वर्षांचे रमाकांत महाडिक (अप्पा )हे सायकल पटू होते. या अशा बर्फाळ प्रदेशात सायकलिंग करतांना त्यांची मोठी मदत झाली. काही ठिकाणी तर सायकल उचलून घेऊन अवघड रस्ते पार करावे लागले.

आता या पुढे सह्याद्री पर्वतातील सर्व गड किल्ल्यांना सायकलवरून भेट देणार असल्याचा मनोदय व्यक्त केला .याच प्रमाणे मीरा वैद्य ,शशांक वैद्य यांनीहि मध्य प्रदेश अन्य लांबचे खडतर प्रवास केल्याचे सांगितले. तसेच रुपेश, अनंत, तुषार, अमित घुमरे या सायकलस्वारांनीही आपले थरारक प्रवास वर्णन उपस्थितांसमोर कथन केले.

टॅग्स :RaigadरायगडCyclingसायकलिंग