शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

पर्यटनस्थळांवर गर्दी : जिल्ह्यात दीड लाख वाहने दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 04:17 IST

रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाच लाख वाहने असून पैकी ५० हजार वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाच लाख वाहने असून पैकी ५० हजार वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. भरीस भर म्हणून वीकेण्ड आणि नाताळ सणानिमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे तब्बल दीड लाख जादा वाहने जिल्ह्यात दाखल झाली होती.आतापर्यंत सुमारे सात लाख पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यांची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असणाऱ्या कामांमुळे जिल्ह्यात मोठी वाहतूककोंडी होण्याची शक्यता होती. परंतु जिल्हा वाहतूक पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे यंदा कुठेही फारशी कोंडी न झाल्याने प्रवाशांसह पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातील पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांकडे धाव घेतली होती. पर्यटक खासगी वाहने घेऊन येत आहेत. २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत तब्बल दीड लाख वाहने रायगड जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहेत. त्यामुळे रायगडातील पर्यटन स्थळे फुलून गेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही आकडेवारी सुमारे २७ टक्क्यांनी अधिक आहे.आतापर्यंत सुमारे सात लाख पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यांची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे. रायगड जिल्हा औद्योगिकीकरणासाठीही ओळखला जात असल्याने अवजड वाहनांचीही सतत वर्दळ असते. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते अरुंद झाले आहेत, त्यातच काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो.पाच दिवसांत ६७७ जणांवर कारवाईगेल्या पाच दिवसांमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाºया ६७७ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामध्ये तब्बल लाखभर रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.नाताळातील पर्यटनाचा हंगाम संपला की लगेचच थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी होणाºया वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.२९, ३०, ३१ डिसेंबर २०१८ आणि १ जानेवारी २०१९ अशा चार दिवस पोलिसांना सलग काम करावे लागणार असल्याने पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरणार आहे.वाहतुकीवरील ताण वाढणार हे गृहीत धरूनच नियोजन करण्यात आले होते. वाहतूक विभागाचे ७६ कर्मचारी थंडी, वाºयाची पर्वा न करता वाहतूक नियंत्रित करीत होते. वाहतुकीमध्ये कोणताच अडथळा येऊ नये यासाठी चार फेज करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने जिते-पेण- वडखळ या हेवी ट्रॅफिकच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दुसरा फेज लोणरे ते माणगाव असा आहे. श्रीवर्धनहून पुण्याकडे जाणाºया वाहनांना हा फेज सोयीस्कर असा करण्यात आला आहे. तिसरा फेज खोपोली-शिळफाटा- पाली-वाकण आणि चौथा फेज हा अलिबाग-मुरुड असा होता. त्यामध्ये वाहतूक पोलिसांच्या मोबाइल बाइक तैनात होत्या.- सुरेश वराडे, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक विभाग

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई