शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

पर्यटनस्थळांवर गर्दी : जिल्ह्यात दीड लाख वाहने दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 04:17 IST

रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाच लाख वाहने असून पैकी ५० हजार वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाच लाख वाहने असून पैकी ५० हजार वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. भरीस भर म्हणून वीकेण्ड आणि नाताळ सणानिमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे तब्बल दीड लाख जादा वाहने जिल्ह्यात दाखल झाली होती.आतापर्यंत सुमारे सात लाख पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यांची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असणाऱ्या कामांमुळे जिल्ह्यात मोठी वाहतूककोंडी होण्याची शक्यता होती. परंतु जिल्हा वाहतूक पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे यंदा कुठेही फारशी कोंडी न झाल्याने प्रवाशांसह पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातील पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांकडे धाव घेतली होती. पर्यटक खासगी वाहने घेऊन येत आहेत. २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत तब्बल दीड लाख वाहने रायगड जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहेत. त्यामुळे रायगडातील पर्यटन स्थळे फुलून गेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही आकडेवारी सुमारे २७ टक्क्यांनी अधिक आहे.आतापर्यंत सुमारे सात लाख पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यांची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे. रायगड जिल्हा औद्योगिकीकरणासाठीही ओळखला जात असल्याने अवजड वाहनांचीही सतत वर्दळ असते. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते अरुंद झाले आहेत, त्यातच काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो.पाच दिवसांत ६७७ जणांवर कारवाईगेल्या पाच दिवसांमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाºया ६७७ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामध्ये तब्बल लाखभर रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.नाताळातील पर्यटनाचा हंगाम संपला की लगेचच थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी होणाºया वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.२९, ३०, ३१ डिसेंबर २०१८ आणि १ जानेवारी २०१९ अशा चार दिवस पोलिसांना सलग काम करावे लागणार असल्याने पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरणार आहे.वाहतुकीवरील ताण वाढणार हे गृहीत धरूनच नियोजन करण्यात आले होते. वाहतूक विभागाचे ७६ कर्मचारी थंडी, वाºयाची पर्वा न करता वाहतूक नियंत्रित करीत होते. वाहतुकीमध्ये कोणताच अडथळा येऊ नये यासाठी चार फेज करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने जिते-पेण- वडखळ या हेवी ट्रॅफिकच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दुसरा फेज लोणरे ते माणगाव असा आहे. श्रीवर्धनहून पुण्याकडे जाणाºया वाहनांना हा फेज सोयीस्कर असा करण्यात आला आहे. तिसरा फेज खोपोली-शिळफाटा- पाली-वाकण आणि चौथा फेज हा अलिबाग-मुरुड असा होता. त्यामध्ये वाहतूक पोलिसांच्या मोबाइल बाइक तैनात होत्या.- सुरेश वराडे, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक विभाग

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई