शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Crime News: कुटुंबातील २२ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नवघर गावातील वाळीत प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:23 IST

Crime News: पेण तालुक्यातील नवघर गावातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबातील २२ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी रोखले. त्यानंतर या कुटुंबांना अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

अलिबाग : पेण तालुक्यातील नवघर गावातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबातील २२ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी रोखले. त्यानंतर या कुटुंबांना अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. 

रायगड जिल्ह्यात गावामध्ये दोन गटात तंटा निर्माण झाला की एका गटाला वाळीत टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. आजही वाळीत टाकण्याचे प्रकार घडताना दिसतात. पेण तालुक्यातील नवघर गावात देवाच्या पालखी सोहळ्यात तंटा निर्माण झाला होता. यावेळी काही कारणास्तव देवेंद्र कोळी आणि त्याच्या चार कुटुंबांना गावाने वाळीत टाकले होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी या कुटुंबाबरोबर स्नेह संबंध तोडले होते. याबाबत वाळीत कुटुंबांनी प्रशासनाकडे अर्जही केली होती. प्रशासनाने दोन्ही गटात सुलाह करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र तो झालेला नव्हता. त्यानंतर पुन्हा पेण उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला होता. त्यानंतर चार महिने सर्व एकोप्याने राहत होते. मात्र पुन्हा ग्रामस्थांनी या कुटुंबांना वाळीत टाकले होते. त्यामुळे या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी आत्मदहनासाठी चार कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात  घेतले.

पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखलअलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी या कुटुंबाला प्रबोधन करून आत्महत्येचा विचार डोक्यातून काढला. त्रास देणाऱ्याबाबत आपण लेखी तक्रार देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल असेही सांगितले. त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड