शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Crime News: कुटुंबातील २२ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नवघर गावातील वाळीत प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:23 IST

Crime News: पेण तालुक्यातील नवघर गावातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबातील २२ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी रोखले. त्यानंतर या कुटुंबांना अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

अलिबाग : पेण तालुक्यातील नवघर गावातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबातील २२ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी रोखले. त्यानंतर या कुटुंबांना अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. 

रायगड जिल्ह्यात गावामध्ये दोन गटात तंटा निर्माण झाला की एका गटाला वाळीत टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. आजही वाळीत टाकण्याचे प्रकार घडताना दिसतात. पेण तालुक्यातील नवघर गावात देवाच्या पालखी सोहळ्यात तंटा निर्माण झाला होता. यावेळी काही कारणास्तव देवेंद्र कोळी आणि त्याच्या चार कुटुंबांना गावाने वाळीत टाकले होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी या कुटुंबाबरोबर स्नेह संबंध तोडले होते. याबाबत वाळीत कुटुंबांनी प्रशासनाकडे अर्जही केली होती. प्रशासनाने दोन्ही गटात सुलाह करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र तो झालेला नव्हता. त्यानंतर पुन्हा पेण उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला होता. त्यानंतर चार महिने सर्व एकोप्याने राहत होते. मात्र पुन्हा ग्रामस्थांनी या कुटुंबांना वाळीत टाकले होते. त्यामुळे या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी आत्मदहनासाठी चार कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात  घेतले.

पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखलअलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी या कुटुंबाला प्रबोधन करून आत्महत्येचा विचार डोक्यातून काढला. त्रास देणाऱ्याबाबत आपण लेखी तक्रार देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल असेही सांगितले. त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड