शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

coronavirus: रायगड जिल्ह्यात गंभीर रुग्ण १२ टक्क्यांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:45 IST

Raigad coronavirus: कोरोना विषाणूची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला काही प्रमाणात यश आले असले तरी दमा, हायपर टेंन्शन, हृदयविकाराच्या आजारांनी डोके वर काढले आहे.

अलिबाग : कोरोना विषाणूची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला काही प्रमाणात यश आले असले तरी दमा, हायपर टेंन्शन, हृदयविकाराच्या आजारांनी डोके वर काढले आहे. दिवसाला सात ते आठ गंभीर स्वरूपाचे रुग्ण उपचार करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत.कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. कोरोना रुग्णांसाठी सध्या १ हजार १९१ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याने ११२ ऑक्सिजन बेडचा वापर होत आहे. त्यामुळे कोरोनासाठीचे ७० टक्के बेड रिकामे राहिले आहेत. इतर गंभीर आजारांमध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीच्या विकारांनी सध्या डोके वर काढले आहे. ताणतणाव, चुकीचा आहार आणि आरामदायी जीवनशैली यांच्यामुळे आज समाजात हृदयविकाराची समस्या झपाट्याने वाढत चालली आहे.  विशेषतः सध्याच्या परिस्थितीत, कोरोनाच्या साथीच्या निमित्ताने कोणती औषधे घ्यावीत, रोग कसा टाळावा, त्याची लक्षणे अशा माहितीची देवाण-घेवाण प्रचंड प्रमाणात होत आहे. अशा प्रसंगी, हृदयविकाराची खरी लक्षणे ओळखणे, उच्च रक्तदाबाचा धोका कोणता आणि त्यामध्ये कोरोनाचा संबंध कसा येतो, याविषयी खरी माहिती रुग्णांना मिळणे आवश्यक आहे.सततच्या बदलत्या हवामानामुळे थंडी-तापासह, घसादुखी आणि खोकला यांची तक्रार करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते. हे आजार गंभीर नसले तरी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची लागण इतरांनाही होऊन रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती असल्याचे डॉक्टर सांगतात. खासगी दवाखान्यांपासून मोठ्या रुग्णालयांपर्यंत सर्वच ठिकाणी तापाचे रुग्ण आहेत. त्वचाविकारांची संख्याही वाढली असून मिश्र हवामानाचा परिणाम त्वचेवर होत आहे. उन्हाच्या तडाख्यानंतर घटणारे हवामान हा कालावधी नेहमीच संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराचा ठरतो. मात्र यंदा अजूनही अपेक्षित थंडी न पडल्याने हवामानाच्या या बदलत्या वेळापत्रकामुळे रोगराई वाढली आहे. घसादुखी, खोकला यांसारखे आजार सामान्य असल्याने घाबरून जाऊ नये, मात्र केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ला घ्यावा.- डाॅ. राजीव तंबाळे, वैद्यकीय अधिकारी दररोज ३० ऑक्सिजन सिलिंडरचा वापरमधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना दररोज ३० ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाबरोबर आता इतर गंभीर आजाराच्या रुग्णामध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याने आता डाॅक्टरांवरही अधिक भार येऊ लागला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड