शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

coronavirus: चाकरमान्यांच्या कुटुंबीयांचे गुरांच्या गोठ्या विलगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 02:43 IST

महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतींमध्ये ५ मे ते ९ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबई, सुरत, पुणे या शहरातून चाकरमानी कुटुंब आपल्या गावी दाखल झाले. मात्र, यातील एका कुटुंबाला विलगीकरण करताना चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये दहा दिवस ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाली.

- दीपक साळुंखेबिरवाडी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसह गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, बडोदा येथील चाकरमान्यांनी आपल्या मूळ गावी येणे पसंत केले. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर या नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतीमधील शहरातून गावी आलेल्या चाकरमानी कुटुंबीयांचे विलगीकरण चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी या कुटुंबीयांना रायगड जिल्हा परिषद शाळा कातुर्डे नंबर १ येथील विलगीकरण कक्षामध्ये हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतींमध्ये ५ मे ते ९ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबई, सुरत, पुणे या शहरातून चाकरमानी कुटुंब आपल्या गावी दाखल झाले. मात्र, यातील एका कुटुंबाला विलगीकरण करताना चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये दहा दिवस ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाली. कातुर्डे ग्रामपंचायतींमध्ये एकूण २६ चाकरमानी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील विविध शहरातून आपल्या मूळ गावी परतले असून, काहींना त्यांच्या निवासस्थानी होम क्वारंटाइन करण्यात आले. तर काहींना रायगड जिल्हा परिषद शाळा कातुर्डे येथील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. या नागरिकांची वैद्यकीय तपासणी महाड तालुक्यातील पाचाड प्राथमिक आरोग्यकेंद्रात करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कोविड-१९ केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता महाड तालुक्यातील कोतुर्डे ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक ज्ञानेश्वर आंभोरे यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता विविध शहरातून दाखल झालेल्या चाकरमानी नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव विलगीकरण कक्ष तसेच त्यांच्या निवासस्थानी होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र, गुरांच्या गोठ्यामध्ये कुटुंबीयांचे विलगीकरण? या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. तर बिरवाडी राजिप कन्याशाळा येथील विलगीकरण कक्षामधील शौचालय नादुरुस्त असल्याने या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ घाडगे यांच्याजवळ संपर्क साधला असता शौचालय दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून नागरिकांची गैरसोय तत्काळ दूर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या- गोगावलेमहाड तालुक्यातील ग्रामीण भागात दाखल होणाऱ्या चाकरमानी कुटुंबीयांच्या व्यवस्थेबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधला असता गावांमध्ये दाखल होणाºया त्यांच्या निवासस्थानीच होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ज्यांच्या घरी जागेचा अभाव असेल अशा कुटुंबीयांकरिता शाळांमधून विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत.त्यांच्या भोजनाची व्यवस्था त्याच्या कुटुंबीयांमार्फत करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, याबाबतच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असेदेखील गोगावले यांनी सूचित केले आहे.महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतीमधील शहरातून गावी आलेल्या चाकरमानी कुटुंबीयांचे विलगीकरण चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी या कुटुंबीयांना रायगड जिल्हा परिषद शाळा कातुर्डे नंबर १ येथील विलगीकरण कक्षांमध्ये हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.पाणी जातेय वायामहाड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना बिरवाडी कन्याशाळा येथील विलगीकरण कक्षातील पाणीपुरवठा करणारा नळ नादुरुस्त असल्याने रोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे.महाडमधील २९५ शाळा अत्यावश्यक सेवेसाठी वापरणारमहाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण ३१३ शाळांपैकी २९५ शाळा या अत्यावश्यक सेवेकरिता वापरात आणण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती महाड पंचायत समिती यांच्यामार्फत देण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या सात शाळा पूर्णपणे नादुरुस्त झाल्या आहेत. अवकाळी वादळी पावसामुळे नादुरुस्त झालेल्या शाळांमध्ये दासगाव मराठी, बिरवाडी २, कांबळे उर्दू, वाकी बुद्रुक, जुई येथील दोन शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड