शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: निसर्ग चक्रिवादळात नुकसान झालेल्यांना झाडाप्रमाणे भरपाईचा अध्यादेश लवकरच, सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 01:15 IST

येत्या मंगळवारपर्यंत याबाबतचा शासकीय अध्यादेश निघणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना मोठी मदत प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे.

मुरुड : निसर्ग चक्रीवादळामुळेरायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. नारळ-सुपारीच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्याच्या इच्छेप्रमाणे सुपारी व नारळाच्या प्रत्येक झाडामागे मोठे आर्थिक साहाय्य करण्याचा राज्य शासनाचा प्रामाणिक हेतू असून, येत्या मंगळवारपर्यंत याबाबतचा शासकीय अध्यादेश निघणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना मोठी मदत प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे.नांदगाव ग्रामपंचायतमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे प्राप्त झालेली रक्कम नागरिकांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली की नाही, याबाबतचा आढावा घेण्यासाठी खा.सुनील तटकरे आले होते. यावेळी नांदगाव ग्रामपंचायत सरपंच वैशाली पवार, उपसरपंच अस्लम हलडे, काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तटकरे यांनी कृषी विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे एक हेक्टरमध्ये नारळाची १५० झाडे तर सुपारीची १,३५० झाडे असतात, असे निकष आहेत, परंतु आम्ही हा निकष पाळणार नाही. शेतकºयांनी झाडांची सांगितलेली संख्याच आम्ही विचारात घेणार आहोत. जास्तीतजास्त रक्कम वादळग्रस्तांना मिळावी, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. नारळ-सुपारी व कोकम या पिकाचा रोजगार भूमी लागवड योजनेत समावेश केल्याने शेतकºयांना लागवडीसाठी येणारा खर्च व नवीन रोपेसुद्धा प्राप्त होणार आहेत. वादळग्रस्त भागात जेवढ्या दिवस वी ज नाही, तिथे सरासरी बिल स्वीकारले जाणार नाही. जेवढा वापर तेवढेच बिल ग्राहकाला गेले पाहिजे, या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.तहसीलदारांनी तातडीने कार्यवाही करावीखा.सुनील तटकरे यांनी नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील नुकसानग्रस्त नागरिकांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा झाली पाहिजे यासाठी तहसीलदारांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. केंद्र शासन राज्य शासनाला मदत करीत नाही, केंद्राची महाराष्ट्राकडे नेहमीच वक्रदृष्टी असते, अशी टीका यावेळी त्यांनी केली आहे. तीन महिन्यांचे वीजबिल एकदाच आल्याने लोकांना खूप त्रास झाला आहे. यासाठी सदरची रक्कम हप्त्याहप्त्याने भरण्याची सूट देण्यात आली आहे. वीजबिल मोठ्या रकमेचे आले असेल, तर पाहणी करून बिल त्वरित सुधारून देण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळी सुनील तटकरे यांनी सांगितले.माध्यमिक हायस्कूलला मदतीचे धोरण : माध्यमिक हायस्कूल अनुदानीत असो वा विना अनुदानित असो, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून अर्थ विभागाकडे प्रस्ताव सादर होताच, जास्तीतजास्त दोन लाख रुपये मदत मिळणार आहे. हे पैसे जिल्हा परिषदेमार्फत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगडsunil tatkareसुनील तटकरे