शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

CoronaVirus News in Raigad : रायगडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाची हेळसांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 23:32 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा लोंढा येत असल्याने कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे.

- आविष्कार देसाई।अलिबाग : जिल्ह्यामध्ये खोपोली वगळता अन्यत्र कोठेही शवदाहिनीची व्यवस्थाच नाही. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची हेळसांड होत असल्याने मृतांच्या नातेवाइकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृतदेहाची विल्हेवाट लावणे हा आपत्ती व्यवस्थापनाचा भाग असल्याने जिल्हा प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची मागणी आहे.रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा लोंढा येत असल्याने कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईमधील रुग्णालयांची क्षमता संपल्याने आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातच उपचार करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अलिबागच्या सरकारी रुग्णालयामध्ये मंगळवारी दुपारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता. मृताच्या नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाच अंत्यविधीला मृताचे शरीर कोणत्या वाहनातून न्यायचे, असा प्रश्न पडला होता. सरकारी रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका उभ्या होत्या. मृताच्या नातेवाइकांनी तसेच मित्रांनी रुग्णवाहिका चालक-मालकांशी संपर्क साधला. मात्र, कोणीच मृतदेह नेण्यास तयार नव्हते. त्यामुळे बºयाच कालावधीपर्यंत मृतदेहासह नातेवाइकांना ताटकळत बसावे लागले होते. जिल्हा रुग्णालयाकडेही कसलीच व्यवस्था नसल्याने हाल झाले. काही कालावधीनंतर एक रुग्णवाहिका मिळाल्याने प्रश्न सुटला. नियमाने रुग्णवाहिकेतून मृतदेह नेता येत नाही, असे कारण सांगण्यात आले. मात्र, एरवी अशाच रुग्णवाहिकेतून मृतदेह नेल्याच्या घटना घडल्याचे कोणी नाकारू शकणार नाही.‘रुग्णालयांकडे शवदाहिनीची व्यवस्था नाही’- दीड महिन्यापूर्वी उरण आणि पेण येथील रुग्णांवर अलिबागच्या सरकारी रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला होता; परंतु कोरोनाच्या भीतीमुळेकोणीच पुढे येण्यास तयार नव्हते. त्यामुळे साध्या टेम्पो रिक्षातून मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला होता. आता तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे संकट वाढण्याची शक्यता असल्याने याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.जिल्हा सरकारी रुग्णालयांकडे शवदाहिनीची व्यवस्था नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्याचप्रमाणे याच ठिकाणी जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. अलिबाग नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच शवदाहिनी घेण्यात येणार आहे.-प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबागरायगड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही वाहन तात्पुरत्या स्वरुपात शववाहिनीसाठी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या पुढे अशी अडचण येणार नाही.-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसalibaugअलिबाग