शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

CoronaVirus News in raigad: पीर खिंडीतील फकिरासाठी अवतरले ‘फरिश्ते’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 01:06 IST

पीर खिंडीतील दाऊद बाबांना चिंता लागली होती ती आज बाबांच्या दरगाहमध्ये तेलाविना दिवा कसा पेटवायचा, नवनाथांच्या मंदिरामध्ये अगरबत्ती कोठून आणायची, अशा विंवचनेत असतानाच बाबांच्या समोर चार व्यक्ती प्रकटल्या.

आविष्कार देसाईअलिबाग : लॉकडाउनमुळे कोणताच भाविक दरगाहकडे फिरकत नव्हता. अन्नधान्यांची चणचण तर भासत होतीच; परंतु पीर खिंडीतील दाऊद बाबांना चिंता लागली होती ती आज बाबांच्या दरगाहमध्ये तेलाविना दिवा कसा पेटवायचा, नवनाथांच्या मंदिरामध्ये अगरबत्ती कोठून आणायची, अशा विंवचनेत असतानाच बाबांच्या समोर चार व्यक्ती प्रकटल्या. त्यांच्या हातामध्ये किराणा सामानाच्या पिशव्या होत्या. दाऊद बाबांनी एक कटाक्ष टाकत त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, ‘आवो बेटा... शायद उपरवालेने दिया जलाने के लिए फरिश्ते भेजे है...’ बाबांचे हे वाक्य ऐकताच त्या व्यक्तींचे डोळे पाण्याने डबडबले... त्यांनी दाऊद बाबांच्या पुढ्यात किराणा सामानाच्या पिशव्या ठेवल्या... बाबांनी मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत... ‘खूश रहो, आबाद रहो’, असा आशीर्वाद दिला.कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाउन सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वार अशा सर्वच प्रार्थनास्थळांनाही टाळे लागले आहे. त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी, आराधनेसाठी कोणीच फिरकत नसल्याचे दिसते. अलिबाग तालुक्यातील पीर खिंडीतील डोंगरावर पीर बाबा यांचा दरगाह आहे. तेथील दाऊद बाबा (डेव्हिड) नावाची ८५ वर्षीय व्यक्ती येथे गेली ४० वर्षे सेवा करत आहे. सध्या लॉकडाउनचा त्यांनाही फटका बसला आहे. अन्नधान्याची चणचण भासत असल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली होती. ही बाब कुठ्यांची गोठी गावचे पोलीसपाटील जगन्नाथ पाटील यांनी अलिबाग-बागमळा परिसरातील लवेश नाईक, अलिबाग शहरातील नौशाद पटेल, संकल्प पाटील यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यानंतर या तरुणांनी एक-दोन महिने पुरेल एवढे आवश्यक सर्व किराणा सामान थेट त्यांनी दाऊद बाबांकडे पोहोचवले. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून निराधार, मजूर, विधवा महिला, वयोवृद्ध अशा नागरिकांना मदतीचा हात लवेश नाईक, नौशाद पटले यांनी दिला आहे.मास्क, सॅनिटायझर, किराणा मालाचे वाटप ते करत आहेत. ज्यांना मदत लागेल त्यांच्यासाठी ते धावत आहेत. आता मात्र त्यांचा खिसाही रिकामा झाला आहे. नागरिकांनी अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन लवेश यांनी केले आहे.आज जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण झालेले आहेत. अशा प्रसंगी लवेश आणि नौशाद यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य माणूसपण जपणारे तरच आहेच. शिवाय प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे, एवढे मात्र निश्चित आहे.>दाऊद बाबा हे काही वर्षांपूर्वी मद्रासवरून अलिबागमध्ये आले होते. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांनी सुरुवातीला सरकारी कंपनीमध्ये काम केले. त्यानंतर ते येथील पीर बाबांच्या दरगाहमध्ये आले होते.तेव्हापासून ते येथेच राहतात, असे नौशाद पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गेली ४० वर्षे ते दरगाहजवळ एक छोटीशी खोली आहे, तेथेच राहतात. डोंगरावर वीज नाही फक्त दोन विहिरी आहेत.त्याचे पिण्यासाठी पाणी वापरतात. दर गुरुवारी मुस्लीम बांधव या ठिकाणी दर्शनासाठी येतात. त्यामुळे दाऊद बाबांची गुजराण सुरू होती.लॉकडाउनमुळे त्यांच्यावर संकट कोसळले होते, असेही नौशाद यांनी स्पष्ट केले. आम्हाला त्यांना मदत करता आली यातच आमचे समाधान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.>आम्हाला जेव्हा कळले की, बामणगाव येथील डोंगरावर पीर बाबांच्या दरगाहमध्ये सेवा करणाºया दाऊद बाबांना मदत हवी आहे.आम्ही तातडीने तेथे पोहोचलो. बाबांच्या दरगाहमध्ये तेलाविना दिवा कसा पेटवायचा, नवनाथांच्या मंदिरामध्ये अगरबत्ती कशी लावायची, अशा विवंचेनत दाऊद बाबा होते.आता तुम्ही आलात सर्व प्रश्न सुटले आहेत. उपर वालेने तुम्हे भेजा हैं, असे दाऊद बाबांनी सांगताच आम्हाला गहिवरून आले, असे लवेश नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस