शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

CoronaVirus News in raigad: पीर खिंडीतील फकिरासाठी अवतरले ‘फरिश्ते’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 01:06 IST

पीर खिंडीतील दाऊद बाबांना चिंता लागली होती ती आज बाबांच्या दरगाहमध्ये तेलाविना दिवा कसा पेटवायचा, नवनाथांच्या मंदिरामध्ये अगरबत्ती कोठून आणायची, अशा विंवचनेत असतानाच बाबांच्या समोर चार व्यक्ती प्रकटल्या.

आविष्कार देसाईअलिबाग : लॉकडाउनमुळे कोणताच भाविक दरगाहकडे फिरकत नव्हता. अन्नधान्यांची चणचण तर भासत होतीच; परंतु पीर खिंडीतील दाऊद बाबांना चिंता लागली होती ती आज बाबांच्या दरगाहमध्ये तेलाविना दिवा कसा पेटवायचा, नवनाथांच्या मंदिरामध्ये अगरबत्ती कोठून आणायची, अशा विंवचनेत असतानाच बाबांच्या समोर चार व्यक्ती प्रकटल्या. त्यांच्या हातामध्ये किराणा सामानाच्या पिशव्या होत्या. दाऊद बाबांनी एक कटाक्ष टाकत त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, ‘आवो बेटा... शायद उपरवालेने दिया जलाने के लिए फरिश्ते भेजे है...’ बाबांचे हे वाक्य ऐकताच त्या व्यक्तींचे डोळे पाण्याने डबडबले... त्यांनी दाऊद बाबांच्या पुढ्यात किराणा सामानाच्या पिशव्या ठेवल्या... बाबांनी मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत... ‘खूश रहो, आबाद रहो’, असा आशीर्वाद दिला.कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाउन सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वार अशा सर्वच प्रार्थनास्थळांनाही टाळे लागले आहे. त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी, आराधनेसाठी कोणीच फिरकत नसल्याचे दिसते. अलिबाग तालुक्यातील पीर खिंडीतील डोंगरावर पीर बाबा यांचा दरगाह आहे. तेथील दाऊद बाबा (डेव्हिड) नावाची ८५ वर्षीय व्यक्ती येथे गेली ४० वर्षे सेवा करत आहे. सध्या लॉकडाउनचा त्यांनाही फटका बसला आहे. अन्नधान्याची चणचण भासत असल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली होती. ही बाब कुठ्यांची गोठी गावचे पोलीसपाटील जगन्नाथ पाटील यांनी अलिबाग-बागमळा परिसरातील लवेश नाईक, अलिबाग शहरातील नौशाद पटेल, संकल्प पाटील यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यानंतर या तरुणांनी एक-दोन महिने पुरेल एवढे आवश्यक सर्व किराणा सामान थेट त्यांनी दाऊद बाबांकडे पोहोचवले. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून निराधार, मजूर, विधवा महिला, वयोवृद्ध अशा नागरिकांना मदतीचा हात लवेश नाईक, नौशाद पटले यांनी दिला आहे.मास्क, सॅनिटायझर, किराणा मालाचे वाटप ते करत आहेत. ज्यांना मदत लागेल त्यांच्यासाठी ते धावत आहेत. आता मात्र त्यांचा खिसाही रिकामा झाला आहे. नागरिकांनी अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन लवेश यांनी केले आहे.आज जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण झालेले आहेत. अशा प्रसंगी लवेश आणि नौशाद यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य माणूसपण जपणारे तरच आहेच. शिवाय प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे, एवढे मात्र निश्चित आहे.>दाऊद बाबा हे काही वर्षांपूर्वी मद्रासवरून अलिबागमध्ये आले होते. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांनी सुरुवातीला सरकारी कंपनीमध्ये काम केले. त्यानंतर ते येथील पीर बाबांच्या दरगाहमध्ये आले होते.तेव्हापासून ते येथेच राहतात, असे नौशाद पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गेली ४० वर्षे ते दरगाहजवळ एक छोटीशी खोली आहे, तेथेच राहतात. डोंगरावर वीज नाही फक्त दोन विहिरी आहेत.त्याचे पिण्यासाठी पाणी वापरतात. दर गुरुवारी मुस्लीम बांधव या ठिकाणी दर्शनासाठी येतात. त्यामुळे दाऊद बाबांची गुजराण सुरू होती.लॉकडाउनमुळे त्यांच्यावर संकट कोसळले होते, असेही नौशाद यांनी स्पष्ट केले. आम्हाला त्यांना मदत करता आली यातच आमचे समाधान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.>आम्हाला जेव्हा कळले की, बामणगाव येथील डोंगरावर पीर बाबांच्या दरगाहमध्ये सेवा करणाºया दाऊद बाबांना मदत हवी आहे.आम्ही तातडीने तेथे पोहोचलो. बाबांच्या दरगाहमध्ये तेलाविना दिवा कसा पेटवायचा, नवनाथांच्या मंदिरामध्ये अगरबत्ती कशी लावायची, अशा विवंचेनत दाऊद बाबा होते.आता तुम्ही आलात सर्व प्रश्न सुटले आहेत. उपर वालेने तुम्हे भेजा हैं, असे दाऊद बाबांनी सांगताच आम्हाला गहिवरून आले, असे लवेश नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस