शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

CoronaVirus : रायगड जिल्ह्यातील आठ तालुके ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 00:30 IST

जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळीच उपाययोजना केल्यामुळेच हे जसे शक्य झाले आहे, तसेच वेळोवेळी केलेल्या सूचनांचे स्थानिकांनी पालन केल्यानेच सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

अलिबाग : कोरोनाचा शिरकाव हा मोठ्या संख्येने शहरीभागांमध्ये झाला आहे, तर ग्रामीण भागाला कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, तर उर्वरित पाच तालुक्यांत कोरोनाचा प्रकोप दिसून येतो. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळीच उपाययोजना केल्यामुळेच हे जसे शक्य झाले आहे, तसेच वेळोवेळी केलेल्या सूचनांचे स्थानिकांनी पालन केल्यानेच सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. मात्र, अलिबागमध्ये चार पोलिसांना होम क्वॉरंटाइन केल्याने अलिबागकरांच्या मनात धडकी भरली आहे.लॉकडाउन करण्यात आलेल्या घटनेला एक महिना उलटून गेला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन खंबीरपणे उभे राहिले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नागरिकांनीही त्यांना साथ दिली आहे. त्यांच्या एकत्रित परिणामामुळे अलिबाग, पेण, खालापूर, रोहो, मुरुड, पाली, माणगाव, म्हसळा या तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ शकलेला नाही. तर पनवेल, उरण, कर्जत, श्रीवर्धन आणि पोलादपूर या पाच तालुक्यांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा पनवेल महापालिका आणि पनवेल ग्रामीण क्षेत्राला बसला असल्याचे दिसून येते. या विभागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. २४ एप्रिलपर्यंत ६२ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये ४४, पनवेल ग्रामीणमध्ये-८, श्रीवर्धन-५, उरण-४, पोलादपूर-२ आणि कर्जत-१ असा समावेश आहे. दोघांना मृत्यूने कवटाळले आहे. तर १९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ४३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.रायगड जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. बाहेरून येणाऱ्या वाहनांचेही निर्जंतुकीकरण करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत आहे. बाहेरून येणाºया नागरिकांची माहिती तातडीने प्रशासनाला कळवण्याचे आवाहन करण्यात आल्याने नागरिक चांगलेच सर्तक झालेले आहेत. त्यामुळे पोलीस, जिल्हा प्रशासनातील नियंत्रण कक्षातील फोन सातत्याने खणखणत आहेत. आतापर्यंत तब्बल अडीच हजारांहून अधिक नागरिकांना होम क्वॉरंटाइन केले आहे. त्यांच्याकडे असणाºया मोबाइल जीपीएसच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. होम क्वॉरंटाइन केलेल्यांपैकी कोणी घराबाहेर पडल्याचे नियंत्रण कक्षाला कळताच तातडीने संबंधिताला चेतावनी देणारा फोन जात आहे. त्यामुळे आपल्यावर नजर ठेवलीजात असल्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर बºयापैकी चाप लागल्याचे दिसून येत आहे.>श्रीवर्धनमध्ये पाच जणांना लागणअलिबाग, पेण, खालापूर, रोहो, मुरुड, पाली, माणगाव, म्हसळा या तालुक्यांमध्ये अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. श्रीवर्धनमधील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने सर्वच प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली. रायगड पोलिसांनी संबंधित वाहनचालकाचा शोध घेतला आणि त्याला मुंबईतून ताब्यात घेतले होते. यातील गंभीर बाब म्हणजे हा वाहनचालकच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने रायगड पोलीसदल चांगलेच हादरून गेले आहे. संबंधित वाहनचालकाला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या इमारतीमधील एका खोलीत ठेवण्यात आले होते.>चालकाला पकडणारे क्वॉरंटाइनवाहनचालकाला पकडणारे दोन पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचारी यांना होम क्वॉरंटाइन करावे लागले आहे. संबंधित पोलीस कोणाच्या संपर्कात आले होते का, याकडेही गंभीरतेने पाहणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलिबाग कोरोनापासून मुक्त होता. मात्र, पोलीस आता क्वॉरंटाइन झाल्याने शहरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या