शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

coronavirus: शासनाच्या अटींमुळे मिळकतीपेक्षा खर्चच दुप्पट, माथेरानमधील व्यावसायिक चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 00:41 IST

राज्य शासनाने ८ जुलैपासून राज्यात पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा दिलासा मोठ्या शहरातील व्यावसायिकांना नक्कीच मिळणार आहे. मात्र, छोट्या पर्यटन क्षेत्रातील लोकांना मात्र त्याचा फटकाच बसणार आहे.

माथेरान : राज्य शासनाने पर्यटन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून, अटीशर्तींवर पर्यटन सुरू केले जाऊ शकते, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, ३३ टक्के च जागेचा वापर व्हावा व त्याचबरोबर इतर अटींमुळे मिळकत कमी व खर्चच जास्त अशी अवस्था माथेरानमधील व्यावसायिकांची होणार असल्याने पर्यटन सुरू होऊनही त्याचा काहीच फायदा छोट्या व्यावसायिकांना होणार नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे.राज्य शासनाने ८ जुलैपासून राज्यात पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा दिलासा मोठ्या शहरातील व्यावसायिकांना नक्कीच मिळणार आहे. मात्र, छोट्या पर्यटन क्षेत्रातील लोकांना मात्र त्याचा फटकाच बसणार आहे. ज्या नियम व अटी शासनाने व्यावसायिकांना घातल्या आहेत, त्या खूपच खर्चिक आहेत. माथेरानसारख्या पर्यटनस्थळी महिन्यातून फक्त वीकेंडलाच पर्यटन व्यवसाय मिळत असल्याने, हा सर्व खर्च करून व्यवसाय करणे म्हणजे पांढरा हत्तीच पाळण्यासारखा आहे.आधीच पर्यटन हंगाम हातचा निघून गेल्यामुळे कंबर खचलेल्या माथेरानकरांना एकीकडे कोरोनाशी दोन हात करावे लागत असताना, आता हा खर्च करून व्यवसाय सुरू करावा का? या चिंतेने ग्रासले आहे. एवढे करूनही एखादा कोरोनाग्रस्त पर्यटक येऊन येथे विषाणू सोडून गेल्यास, त्याचा फटकाही येथील स्थानिकांनाच बसणार आहे.हॉटेल व्यवसाय चार महिन्यांनंतर सुरू करणे किंवा नेमका पावसाच्या काळातच सुरू करणे म्हणजे एक दिव्यच आहे. आधीच परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात निघून गेल्यामुळे सर्वच हॉटेल व्यावसायिकांना कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार आहे व येथील आजूबाजूच्या आदिवासी वाडीतील लोकही शेतीची कामे सुरू झाल्यामुळे माथेरानकडे फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे शासनाच्या अटीशर्तींचे पालन करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना अडचणीचे ठरणार आहे. त्यातच प्रशासनाची कोणतीही मदत येथील व्यावसायिकांना मिळत नसल्याने, व्यवसाय सुरू होताच शासकीय कर, पाण्याची बिले, वीजबिले व शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार हॉटेल व्यवसाय सुरू आहे का? हे पाहण्यासाठी चार महिने गायब असलेला अधिकारी लगेच येणार आहे. त्यामुळेच माथेरानमधील लहान-मोठे उद्योजक हा निर्णय कसा घ्यावा, या चिंतेत आहेत.स्थानिकांत द्विधा परिस्थितीहॉटेल व्यवसाय नेमका पावसाच्या काळातच सुरू करणे म्हणजे एक दिव्यच आहे. व्यवसाय सुरू केल्यास थोडे-फार कमाईचे साधन सुरू होणार व पर्यटक आले, तर कोरोनाच्या प्रसाराचे संकट, त्यामुळे येथील स्थानिकांच्या मनात निर्णयामुळे द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMatheranमाथेरानtourismपर्यटन