शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

coronavirus: कोरोनाचा फैलाव थांबता थांबेना, राज्यातील या जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 15:58 IST

शहरी भागांसोबत ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याने शासन आणि प्रशासनासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमुंबईलगत असलेल्या रायगड जिल्ह्यातली कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे शहरी भागांसोबत ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याने शासन आणि प्रशासनासमोर गंभीर आव्हानकोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय

अलिबाग  - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावाने सध्या राज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये आणि जिल्ह्यांत गंभीर रूप धारण केले आहे. दरम्यान मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढतच असून, मुंबईलगत असलेल्या रायगड जिल्ह्यातली कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरी भागांसोबत ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याने शासन आणि प्रशासनासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रायगड जिल्ह्यात १५ ते २४ जुलैदरम्यान १० दिवस लॉकडाऊन लागू राहणार आहे. या दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रायगड जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे सात हजार ५५१ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी चार हजार २९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ हजार २६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत जिल्ह्यात २१२ जणांचा मृ्त्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड