शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाने चिंता; सरकार लॉकडाऊन करणार नाही, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 01:33 IST

आदिती तटकरे। स्थानिक स्वराज्य संस्था लॉकडाऊन करू शकतात

अलिबाग : अनलॉकनंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे सरकार लॉकडाऊन करणार नाही. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी आणि नागरिक यांना विश्वासात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था लॉकडाऊन करु शकतात, असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

अलिबाग येथील राजस्व सभागृहात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिक विविध ठिकाणी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यावेळी कोणतीच दक्षता घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे व्यावसायिक, दुकानदार यांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. सरकार आता लॉकडाऊन करणार नाही. स्थानिक पातळीवर नगराध्यक्ष हे व्यापारी, व्यावसायिक, नागरिक यांना विश्वासात घेऊन तसा निर्णय घेऊ शकतात, असे तटकरे यांनी सांगितले. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कच वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, यासाठी अलिबाग-वरसोली आणि श्रीवर्धन-दिवेआगर येथे शाक्स उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे एमटीडीसी रिसार्ट, जमिनी या भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहेत. अग्रो टुरिजमचा व्यवसाय करताना आता त्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. नारळ आणि सुपारीच्या बागांना अद्याप नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. कारण निकषानुसार हेक्टरी देण्यात येणारी मदत ही तुटपुंजी असणार आहे. यासाठी झाडांमागे त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले.नियमांचे पालन करणे गरजेचेजेएसडब्ल्यू कंपनीमधील कोरोनाबाधित व्यक्तीची माहिती लपविली जात असल्यास याबाबत त्यांना निर्देश देण्यात येतील, तसेच त्यांनी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस