शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाने चिंता; सरकार लॉकडाऊन करणार नाही, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 01:33 IST

आदिती तटकरे। स्थानिक स्वराज्य संस्था लॉकडाऊन करू शकतात

अलिबाग : अनलॉकनंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे सरकार लॉकडाऊन करणार नाही. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी आणि नागरिक यांना विश्वासात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था लॉकडाऊन करु शकतात, असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

अलिबाग येथील राजस्व सभागृहात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिक विविध ठिकाणी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यावेळी कोणतीच दक्षता घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे व्यावसायिक, दुकानदार यांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. सरकार आता लॉकडाऊन करणार नाही. स्थानिक पातळीवर नगराध्यक्ष हे व्यापारी, व्यावसायिक, नागरिक यांना विश्वासात घेऊन तसा निर्णय घेऊ शकतात, असे तटकरे यांनी सांगितले. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कच वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, यासाठी अलिबाग-वरसोली आणि श्रीवर्धन-दिवेआगर येथे शाक्स उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे एमटीडीसी रिसार्ट, जमिनी या भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहेत. अग्रो टुरिजमचा व्यवसाय करताना आता त्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. नारळ आणि सुपारीच्या बागांना अद्याप नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. कारण निकषानुसार हेक्टरी देण्यात येणारी मदत ही तुटपुंजी असणार आहे. यासाठी झाडांमागे त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले.नियमांचे पालन करणे गरजेचेजेएसडब्ल्यू कंपनीमधील कोरोनाबाधित व्यक्तीची माहिती लपविली जात असल्यास याबाबत त्यांना निर्देश देण्यात येतील, तसेच त्यांनी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस