शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

Coronavirus: लॉकडाउनमुळे अडकले ४१ हजार स्थलांतरित मजूर; स्वच्छतागृहाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 01:55 IST

कम्युनिटी किचनमधून जेवणाची सोय

आविष्कार देसार्ई 

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने उद्योग सुरू आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध प्रस्तावित प्रकल्पांचे काम सुरू आहे. एवढ्या मोठ्या संख्येने डेव्हलपमेंट सुरू असल्यामुळे हाताला काम नसण्याचा प्रश्नच येत नाही. याच कारणासाठी विविध राज्यांतील कामगार, मजूर लाखोंच्या संख्येने या ठिकाणी रोजगारासाठी आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउनमुळे तब्बल ४१ हजार ९१ स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. प्रशासनाने कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यातील नऊ हजार मजुरांची खाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र निवारा शेडमध्ये राहणाऱ्यांच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.

राज्याच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबई-पुण्यातील नागरिक हे रायगड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. त्यातील काही कोरोनाबाधित असल्याने त्यांचा संसर्ग जिल्ह्यातील नागरिकांना झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा पनवेल महापालिका क्षेत्राला बसला आहे. या ठिकाणी ४ मेपर्यंत १०२ रुग्ण आढळले आहेत. तसेच पनवेल ग्रामीणमध्ये २४ आणि उर्वरित रायगड जिल्ह्यामध्ये २० असे एकूण १४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याच कारणांनी पनवेल तालुका रेड झोनमध्ये टाकण्यात आला आहे. परंतु रायगड जिल्हा आॅरेंज झोनमध्ये टाकण्यात आला आहे.

परराज्यातील ४१ हजार ९१ मजूर जिह्यात अडकून पडले आहेत. त्यांच्या हाताचे कामही गेले आहे आणि त्यांना त्यांच्या गावीदेखील जाता येत नाही. अशा सर्व स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्याचे काम रायगडच्या जिल्हा प्रशासनाने केले आहे. पनवेल तालुक्यातील तीन ठिकाणी ९९ स्थलांतरित मजुरांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली आहे. खालापूर, पेण येथे प्रत्येकी दोन ठिकाणी आणि पोलादपूर येथील एका ठिकाणी अशी मिळून १५४ मजुरांना निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने गैरसोय होत असल्याचे मनोज निषाद याने सांगितले.स्वयंसेवी संस्थांची मदतनऊ हजार नागरिकांच्या दररोजच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर ३२ हजार ९१ नागरिकांना अन्नधान्याची पाकिटे वाटण्यात आली आहेत. त्यामध्ये २३१ मेट्रिक टन धान्याचा समावेश आहे. सरकारी मदतीबरोबरच विविध कंपन्या, स्वयंसेवी संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. कोणत्याही मजुरांना आर्थिक मदत करण्यात आलेली नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाचे जिल्हा चिटणीस विशाल दौंडकर यांनी दिली.जिल्ह्याच्या ५२ ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी एक हजार ६९२ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे ठेवण्यात येत असलेल्यांची आरोग्याची नियमित तपासणी करण्यात येते, तर कोरोना पॉझिटिव्ह आढळणाºयांना तातडीने पनवेल येथील रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईतील विविध सरकारी रुग्णालयांत पाठवण्यात येत आहे.- डॉ. प्रमोद गवई, जिल्हाशल्य चिकित्सक, रायगड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस