शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनमध्ये वाढला कोरोनाचा वेग, जनतेने सहकार्य करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 09:30 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात करोनाबाधितांचा आकडा वाढलेला आहे. गेल्या चार महिन्यांत लोकांना कोरोनाचा विसर पडलेला दिसून आला.

श्रीवर्धन :  गेल्या चार महिन्यांच्या कालावधीनंतर श्रीवर्धन तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना हद्दपार होतोय असे वाटत असतानाच अचानक गेल्या दोन दिवसांत श्रीवर्धनमधील बाधितांची संख्या दोन आकड्यांवर पोहोचली आहे.    गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात करोनाबाधितांचा आकडा वाढलेला आहे. गेल्या चार महिन्यांत लोकांना कोरोनाचा विसर पडलेला दिसून आला.             धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव, लग्नकार्य सर्वत्र सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाला. लग्नसमारंभ, हळदी समारंभ येथे लोकांनी अवाजवी गर्दी केली. राजकीय सभा, संमेलन, ग्रामपंचायत निवडणुकीची धावपळ यात सर्वत्र कोरोनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. श्रीवर्धन शहर व ग्रामीण भागात बाधित रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात गेल्यावर्षी रुग्णांचे प्रमाण जास्त होते. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचारासाठी सर्व आधुनिक सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधितांसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. ऑक्सिजन सिलिंडर, अत्याधुनिक रुग्णवाहिका व डॉक्टरांची टीम तयार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांकडून विविध ठिकाणी कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आजपर्यंत श्रीवर्धन तालुक्यात ४६१ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जनतेने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेतल्यास आगामी काळामध्ये श्रीवर्धनमधील परिस्थिती धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊन केल्यास मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना पुन्हा एकदा उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे. अंशतः सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद करण्याची वेळ तालुका प्रशासनवर येऊ शकते. 

जनतेकडून कोरोनाकडे दुर्लक्षआम्हाला काहीच होत नाही, कोरोना झाला तर काय फरक पडतो ? आम्हाला लक्षणे नाहीत अशी विविध कारणे देत लोकांकडून राजरोसपणे नियमांचे उल्लंघन केले जाते. मास्क न वापरणे, जाणीवपूर्वक सोशल डिस्टन्सचा अवलंब करण्याय टाळाटाळ करणे, स्वतःची व इतरांची काळजी न घेणे अशा बाबी सर्रासपणे केल्या जात आहेत. चौकाचौकांत विनाकारण गर्दी केली जात आहे. हॉटेल, सार्वजनिक स्थळे या ठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसून येते. मच्छी मार्केट, किराणा दुकाने कुठेही नियमांचे पालन केले जात नाही. खासगी व सार्वजनिक वाहतूक सर्वत्र सहजासहजी नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

श्रीवर्धनमध्ये जनतेने कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर , सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा जनतेने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे.-सचिन गोसावी, तहसीलदार, श्रीवर्धन

कोरोना वाढीचा वेग लक्षात घेता सर्व जनतेने नियमांचे पालन करणे अगत्याचे आहे .घराच्या बाहेर पडताना कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याविषयी दृढनिश्चय करून निघावे.- समीर केळकर, रहिवासी, श्रीवर्धन 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaigadरायगडdocterडॉक्टरTahasildarतहसीलदारhospitalहॉस्पिटल