शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Corona Vaccination: जिल्ह्यात फक्त तीन हजार काेराेना लस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 1:20 AM

बहुतांश लसीकरण केंद्रे शुक्रवारी सायंकाळपर्यंत बंद हाेण्याची चिन्हे; काही ठिकाणी नागरिक रिकाम्या हाती परतले

- निखिल म्हात्रेअलिबाग : मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत असले तरी जिल्ह्यात फक्त तीन हजार काेराेना लसींचा साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद पडणार आहेत. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये काही प्रमाणातच साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे लसीकरणाला नागरिकांनी फारसा उत्साह दाखवल्याचे दिसून आले नाही. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अन्य लसीकरण केंद्राची झाली हाेती. काही ठिकाणी तर नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागले आहे.रायगड जिल्ह्यात सुरुवातीला कोव्हॅक्सिन आणि नंतर कोविशिल्ड अशा दोन्ही प्रकारच्या लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यानंतर अगदी सुरुवातीला या कोविड लसीकरण मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर मात्र या लसीकरणाबाबत लोकांमध्ये विश्‍वास वाढल्याने प्रतिसाद वाढला. लसीच्या मागणीप्रमाणे पुरवठा वाढला होता; परंतु लस घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने लसीकरण केंद्रांची संख्यादेखील वाढवण्यात आली.जिल्ह्यात एकूण ८४ लसीकरण केंद्र असून त्यापैकी ५९ लसीकरण केंद्र सुरू आहेत तर २५ केंद्र लसीच्या कमतरतेमुळे बंद आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ३३ हजार १०९ जणांचे सलीकरण पूर्ण झाले आहे. तर ३ हजार ७८० डोस शिल्लक आहेत. मात्र, ते ही आजच्या लसीकरणात संपतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली. लसीकरणाचा वेगही मंदावला. त्यामुळे सुरुवातीला ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर मिळणारी लस लगेच मिळेनाशी झाली. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना लसीकरणासाठी पुढील तारीख मिळू लागली.सरकार, प्रशासन सतर्क जिल्ह्यात काेराेनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डाेके वर काढले आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ३५ हजार ६७० आराेग्यसेवक आणि फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली आहे. ४५ वर्षांच्या पुढे असणारे २३ हजार ९५७ नागरिक आहेत. ५५ हजार ७३१ ज्येष्ठ नागरिकांनीही लस घेतली आहे. जिल्हा साठवण केंद्रातील लसीचे वितरण झाले आहे. मिळालेल्या अहवालानुसार अनेक लसीकरण केंद्रांवरील लस संपली आहे. जेथे शिल्लक आहे तेथे एक दिवस पुरेल इतकाच साठा आहे. आम्ही नवीन लसीची मागणी केली आहे. ती उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण वेगाने सुरू होईल.- डॉ. गजानन गुंजकर,जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण२५ केंद्रे बंद आराेग्य विभागाने सुरुवातीला ८० केंद्रांपैकी ५० केंद्रे बंद झाल्याचे सांगितले हाेते. त्यानंतर आज जिल्हा प्रशासनाने नव्याने आकडेवारी जाहीर करत फक्त २५ केंद्र बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे समन्वयाचा अभाव असल्याचे समाेर आले आहे. मात्र, विश्र्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील लस संपली असल्याचे सांगितले आहे.ग्रामीण भागात तुटवडाजिल्हा मुख्य लस साठवण केंद्रातील लसींचा साठा संपला आहे. अनेक केंद्रांवरील विशेषतः ग्रामीण भागातील लसीकरण लसीअभावी थांबवण्यात आले आहे. तर ज्या केंद्रांवर लस शिल्लक आहे तेथे एक ते दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यासाठी आतापर्यंत १ लाख ३९ हजार १०९ जणांना लस देण्यात आली. तर १३ हजार ५८९ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. शहरी भागात बऱ्यापैकी लसीकरण झाले असले तरी ग्रामीण रायगडमधील नागरिक अजूनही लसीच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस