शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यातील अटीचा अडसर, जिल्ह्यातील १६ हजार ९७ शेतकरी नुकसानभरपाईपासून राहणार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:54 IST

अलिबाग : सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतक-यांना मिळालेला नाही.

आविष्कार देसाई अलिबाग : सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतक-यांना मिळालेला नाही. याविरोधात सरकारवर चौफेर टीका होत असतानाच आता अवकाळी पाऊस आणि वादळी वा-यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पीक विम्याची अट मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील १६ हजार ९७ शेतकरी सुमारे तीन कोटी ४८ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहणार आहेत.अर्थव्यवस्थेचा कणा असणाºया कृषी क्षेत्रातील शेतकºयांना दिलासा देण्याची तयारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाने केली आहे. यासाठी त्यांनी सरकारच्याच निर्णयाचा आधार घेत निर्णय क्षमतेतील योग्य समय सूचकता त्यांनी दाखवून दिली आहे. त्यांनी तयार केलेल्या अहवालामुळे बाधित शेतकºयांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळण्यातील मार्ग मोकळा झाला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जुलै ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वारे झाले होते. त्यामुळे ३३ टक्क्यापेक्षा अधिक जिराईत पिकांना फटका बसला होता. आपत्तीमुळे १५ तालुक्यातील २४७ गावांतील १६ हजार ९७ शेतकरी बाधित झाले होेते. त्यांचे क्षेत्र हे चार हजार ६४० हेक्टर एवढे होते. शेतीवर आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकºयांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे होते. १६ हजार ९७ शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा काढलेला नाही. झालेल्या पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी सुमारे तीन कोटी ४८ लाख रुपयांची गरज असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाने सांगितले. त्यासाठी त्यांनी अहवालही तयार केला आहे, परंतु ही नुकसानभरपाई देताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाºया विम्याच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम असावी असा निकष अवकाळी पाऊस आणि वादळी वाºयामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी ग्राह्य धरावी, असा सरकारचाच निर्णय आहे.जिल्ह्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन झाल्याने प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभच विमाधारक शेतकºयांना मिळणार नाही. त्यामुळे योजनेचा निकष नुकसानभरपाई देण्यासाठी अडसर ठरत आहे.>योजनेचा लाभ शेतकºयांना मिळणार नाहीजिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये २०१६ साली ३० हजार २७४ शेतकरी समाविष्ट झाले होते. त्याचे क्षेत्र हे २२ हजार १६४.१७७ हेक्टर होते. त्यासाठी एक कोटी ७२ लाख ८७ हजार ७५४ प्रीमियम भरण्यात आला आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन झाले असल्यास तेथे प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ तेथील शेतकºयांना मिळणार नाही. रायगड जिल्ह्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभही आता विमाधारक शेतकºयांना मिळणार नसल्याचे समोर आले आहे.>तीन कोटी ४८ लाखांची गरजअवकाळी पाऊस आणि वादळी वाºयामुळे नुकसान झालेल्या १६ हजार ९७ शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी. यासाठी ढोबळ तीन कोटी ४८ लाख रुपयांची गरज असल्याचा अहवाल तयार केला आहे. यासाठी त्यांनी २००९ च्या सरकारी निर्णयाचा आधार घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना तेवढा, तरी दिलासा देण्याचा प्रयत्न कृषी विभागाने केला आहे, असे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सांगितले.>२०१६मध्ये आपत्तीमुळे १५ तालुक्यांतील २४७ गावांतील १६ हजार ९७ शेतकरी बाधित झाले होेते.कृषी विभागाने तयार केलेला प्रस्तावतालुका गावांची बाधित एकूण बाधित अपेक्षित निधीसंख्या शेतकरी क्षेत्र (हेक्टर) (रुपये लाखात)अलिबाग २२ १०६७ १५२.६७ ११.४५०पेण ५४ ९०३८ २६६०.५७ १९९.५४३मुरुड ०० ०० ०० ००खालापूर १५ १२१ ३९.६० २.९७०कर्जत ०६ २१ ८.९३ ०.६७०पनवेल ३३ ३१४० १०७८.२० ८०.८६५उरण ०० ०० ०० ००माणगाव १७ १२८ ६०.०३ ४.५२३तळा ०९ ३१ २२.३० १.६७३रोहे २९ १४७३ ३८५.६९ २८.९२७पाली ३४ ८३७ १९४.६८ १४.६०१महाड ०३ १० २.५८ ०.१९४पोलादपूर १४ ६३ ५.२४ ०.३९३म्हसळा ०४ ११२ १२.८७ ०.९६५श्रीवर्धन ०७ ५६ १७.३४ १.३०१एकूण २४७ १६,०९७ ४,६४०.९७ ३४८.०७३

टॅग्स :Farmerशेतकरी