शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
5
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
6
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
7
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
8
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
9
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
10
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
11
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
12
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
13
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
14
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
15
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
16
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
17
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
18
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
19
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
20
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातील निर्माल्यापासून बनवणार कंपोस्ट खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:29 IST

सिडकोने केली विसर्जन घाटावर व्यवस्था; तयार खत उद्यान, तसेच परिसरातील वृक्ष संवर्धनासाठी वापरणार

कळंबोली : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवातील निर्माल्य स्वतंत्र जमा करण्याची व्यवस्था कळंबोली आणि कामोठे येथील विसर्जन तलावावर करण्यात आली आहे. आतापर्यंत तीन टन निर्माल्य जमा केले असल्याची माहिती सिडकोच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यापासून कंपोस्ट खतनिर्मिती करण्यात येणार आहे. यातून तयार झालेल्या खताचा वापर उद्यान त्याचबरोबर झाडांकरिता करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.कळंबोली, कामोठे वसाहतीत दरवर्षी साडेसात हजार घरगुती व सार्वजनिक गणपती बसविले जातात, त्यामध्ये कामोठे येथे ४१५७ व कळंबोलीत ३३८० इतक्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या परिसरात दीड दिवसांच्या घरगुती गणपतीची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्याशिवाय गौरी-गणपतीचा आकडाही मोठा आहे. मूर्तींबरोबर निर्माल्यही जलाशयात विसर्जित करण्यात येत असे. त्यामुळे पाणी दूषित होऊन जलचरांवर परिणाम होत होता. या कारणाने निर्माल्य पाण्यात टाकू नये, असे आवाहन विविध पर्यावरण, त्याचबरोबर सामाजिक संस्थाकडून करण्यात येऊ लागले.दोन वर्षांपूर्वी पनवेल शहरात कृत्रिम तलाव करून यावर चांगला तोडगा काढला होता. तरी सिडकोमध्ये मात्र अशी व्यवस्था करण्यात आलेली नाही; परंतु गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही प्रशासनाने निर्माल्याकरिता खास व्यवस्था केली आहे. एकूण पाच निर्माल्य कलश आणि सात व्हॅन, ११ लिटरच्या सहा आणि इतर मोठ्या दहा, अशा एकूण १६ डसबिन विसर्जन तलावाच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. अनिरुद्ध अकादमीचे स्वयंसेवकही या कामी सहकार्य करीत आहेत. सिडकोने गेल्या पाच दिवसांत सुमारे तीन टन निर्माल्य संकलन केले आहे. विसर्जन तलावात निर्माल्य टाकण्यास मनाई करण्यात आली आहे.तीन महिन्यांत खत तयार होणार११ दिवसांचे गणपती विसर्जनानंतर त्याचे कंपोस्टिंग केले जाणार आहे. सिडकोने कामोठे येथील सेक्टर ५ येथील मोकळ्या भूखंडावर ही व्यवस्था केली आहे. येथे खड्डा तयार करून, त्यात निर्माल्य आणि पुन्हा माती टाकून तीन थर तयार करण्यात येणार आहेत. तीन महिन्यांत कंपोस्ट खताची निर्मिती होईल.निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीकर्जत : कर्जत नगरपालिकेने स्वच्छतेबरोबर प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजन सुरू केल्या आहेत. उत्सवकाळात उल्हास नदीमध्ये निर्माल्य टाकू नये, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात येत आहे. या निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जाणार आहे.कचरा संकलन आणि विघटनामध्ये कर्जत पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कर्जतचे नाव देशात आघाडीवर नेल्यानंतर आता उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली आहेत.कर्जत शहरात ज्या चार ठिकाणी गणेशघाट आहेत, तेथे निर्माल्य कलश ठेवून पालिका थांबली नाही, तर त्यांनी आपले स्वच्छतादूत दहिवली, महावीर पेठ, आमराई, मुद्रे येथील गणेशघाटावर उभे करून भक्तांकडील निर्माल्य गोळा केले जात आहे.समुद्रकिनाऱ्यांवर निर्माल्य कलशरेवदंडा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत परिसरातील समुद्रकिनाºयावर निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. हा उपक्रम पर्यावरण संवर्धन व जल स्वच्छता अभियान या मुख्य हेतूने राबवला जात आहे.गणेश विसर्जन सोहळ्यानंतर किनाºयावर प्रदूषण निर्माण होते, तसेच किनारे विद्रूप रूप प्राप्त करतात, हे टाळण्यासाठी निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तमंडळींचा त्याला प्रतिसाद मिळत आहे. प्रतिष्ठानतर्फे वृक्षलागवड केल्यावर श्री सदस्यांनी निर्माल्य जमा करून खतनिर्मिती करण्याचा उपक्र म राबवला आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRaigadरायगड