शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

कोथुर्डे धरणगळती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 02:45 IST

महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणावर गेली तीन वर्षे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले असून, गळती बंद झाल्याने आता २२ गावांचा पाणीप्रश्न या वर्षी सुटला आहे. १८ लाख रुपये खर्च करून ही गळती बंद करण्यात आली आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणावर गेली तीन वर्षे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले असून, गळती बंद झाल्याने आता २२ गावांचा पाणीप्रश्न या वर्षी सुटला आहे. १८ लाख रुपये खर्च करून ही गळती बंद करण्यात आली आहे.कोथुर्डे धरण हे रायगड परिसरात असून, गेल्या काही वर्षांत या धरणाला गळती लागली होती. रायगड विभागासह महाड नगरपालिका आणि दासगाव विभागातील २२ गावांची तहान भागविणारे कोथुर्डे हे एकमेव धरण आहे. गळतीमुळे एप्रिल महिन्यातच धरणाची पातळी घसरत असल्याने या गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. लघू पाटबंधारे विभागाने ही गळती काढण्यासाठी १८.८० लाख रु पये खर्च केला. हे धरण पाणी सोडण्याच्या ठिकाणी आणि काही ठिकाणी मातीच्या भिंतीजवळ गळती लागली होती. यामुळे सेकंदाला १० ते १५ लिटर पाणी म्हणजे जवळपास ३० टक्के पाणी वाया जात होते.या धरणाची गळती थांबवण्यासाठी धरणाच्या मातीच्या भिंतीबाहेरून एक दगडी भिंत तयार करण्यात आली. वाळूची गाळणी (सँडफिल्टर) तयार करून त्यावर मातीचा थर टाकण्यात आला. या मातीत एक रासायनिक द्रव टाकण्यात आला. या प्रक्रि येमुळे या धरणाची गळती थांबली आहे. गळती रोखल्यामुळे पाणीसाठा कायम राहून गावांचा पाणीप्रश्न दूर झाला आहे. अद्याप तरी या गावांना पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. या धरणाची एकूण क्षमता ही २.७२ द.ल.घ.मी. आहे. महाड नगरपालिकेस या धरणातून १.११ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध होते. धरणाच्या गळतीमुळे ३० टक्के वाया जाणारे पाणी आता थांबले असून, या वर्षी धरणाच्या पाण्याचा साठा वाढला आहे. यामुळे गावांची पाणीसमस्या दूर झाली आहे.रायगड आणि दासगाव विभागातील कोकरे, आडीअंबार्ले, मांडले, मोहोप्रे, नांदगाव खु., नांदगाव बु., नाते, तळोशी, वहूर, वरंडोली, चापगाव, दासगाव, गांधारपाले, केंबुर्ली, खर्र्डी, किंजळोली बु., किंजळोली खु., लाडवली, वाळसुरे, करंजखोल, गोंडाळे आणि आचळोली या गावांच्या पाणी योजना या गांधारी नदीवरील याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कोथुर्डे धरणातून आॅक्टोबर ते एप्रिल या दरम्यान केवळ दोन ते तीन वेळा हे पाणी गांधारीच्या पात्रात सोडण्यात येते आणि धरणापासून १० कि.मी. ते १२ कि.मी. दूरवर गांधारीलगत असणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या जॅकवेलने हा पाण्याचा पुरवठा होत असतो. नदीत सोडले जाणारे पाणी पाइपलाइनद्वारे गावाच्या जॅकवेलना जोडले गेले तर वाया जाणारे पाणीदेखील वाचू शकणार आहे.तीन वर्षांचे यशस्वी प्रयत्नधरणाच्या गळतीच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी अभ्यास करताना, स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त माहिती देखील विचारात घेण्यात आली. तीन वर्षे सातत्यपूर्ण प्रयत्न, सॅन्ड फिल्टर व आधुनिक गळती प्रतिबंधक प्रक्रिया याच्या मिलाफातून ही गळती आता कायमस्वरुपी थांबविण्यात अभियंत्यांना यश आले आहे.गेली तीन वर्षे नियोजनबद्ध काम करत धरणाची गळती १०० टक्के थांबवण्यात आली आहे, यामुळे अद्यापि पाण्याचा साठा आहे. नदीत सोडले जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. धरणातून पाइपलाइनद्वारे हे पाणी जॅकवेलना जोडले तर पाणीपुरवठा सुरळीत होऊन पाणीटंचाई समस्या राहणार नाही.- प्रकाश पोळ, शाखा अभियंता,जलसंपदा पाटबंधारे विभाग