शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

कोथुर्डे धरणगळती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 02:45 IST

महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणावर गेली तीन वर्षे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले असून, गळती बंद झाल्याने आता २२ गावांचा पाणीप्रश्न या वर्षी सुटला आहे. १८ लाख रुपये खर्च करून ही गळती बंद करण्यात आली आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणावर गेली तीन वर्षे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले असून, गळती बंद झाल्याने आता २२ गावांचा पाणीप्रश्न या वर्षी सुटला आहे. १८ लाख रुपये खर्च करून ही गळती बंद करण्यात आली आहे.कोथुर्डे धरण हे रायगड परिसरात असून, गेल्या काही वर्षांत या धरणाला गळती लागली होती. रायगड विभागासह महाड नगरपालिका आणि दासगाव विभागातील २२ गावांची तहान भागविणारे कोथुर्डे हे एकमेव धरण आहे. गळतीमुळे एप्रिल महिन्यातच धरणाची पातळी घसरत असल्याने या गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. लघू पाटबंधारे विभागाने ही गळती काढण्यासाठी १८.८० लाख रु पये खर्च केला. हे धरण पाणी सोडण्याच्या ठिकाणी आणि काही ठिकाणी मातीच्या भिंतीजवळ गळती लागली होती. यामुळे सेकंदाला १० ते १५ लिटर पाणी म्हणजे जवळपास ३० टक्के पाणी वाया जात होते.या धरणाची गळती थांबवण्यासाठी धरणाच्या मातीच्या भिंतीबाहेरून एक दगडी भिंत तयार करण्यात आली. वाळूची गाळणी (सँडफिल्टर) तयार करून त्यावर मातीचा थर टाकण्यात आला. या मातीत एक रासायनिक द्रव टाकण्यात आला. या प्रक्रि येमुळे या धरणाची गळती थांबली आहे. गळती रोखल्यामुळे पाणीसाठा कायम राहून गावांचा पाणीप्रश्न दूर झाला आहे. अद्याप तरी या गावांना पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. या धरणाची एकूण क्षमता ही २.७२ द.ल.घ.मी. आहे. महाड नगरपालिकेस या धरणातून १.११ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध होते. धरणाच्या गळतीमुळे ३० टक्के वाया जाणारे पाणी आता थांबले असून, या वर्षी धरणाच्या पाण्याचा साठा वाढला आहे. यामुळे गावांची पाणीसमस्या दूर झाली आहे.रायगड आणि दासगाव विभागातील कोकरे, आडीअंबार्ले, मांडले, मोहोप्रे, नांदगाव खु., नांदगाव बु., नाते, तळोशी, वहूर, वरंडोली, चापगाव, दासगाव, गांधारपाले, केंबुर्ली, खर्र्डी, किंजळोली बु., किंजळोली खु., लाडवली, वाळसुरे, करंजखोल, गोंडाळे आणि आचळोली या गावांच्या पाणी योजना या गांधारी नदीवरील याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कोथुर्डे धरणातून आॅक्टोबर ते एप्रिल या दरम्यान केवळ दोन ते तीन वेळा हे पाणी गांधारीच्या पात्रात सोडण्यात येते आणि धरणापासून १० कि.मी. ते १२ कि.मी. दूरवर गांधारीलगत असणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या जॅकवेलने हा पाण्याचा पुरवठा होत असतो. नदीत सोडले जाणारे पाणी पाइपलाइनद्वारे गावाच्या जॅकवेलना जोडले गेले तर वाया जाणारे पाणीदेखील वाचू शकणार आहे.तीन वर्षांचे यशस्वी प्रयत्नधरणाच्या गळतीच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी अभ्यास करताना, स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त माहिती देखील विचारात घेण्यात आली. तीन वर्षे सातत्यपूर्ण प्रयत्न, सॅन्ड फिल्टर व आधुनिक गळती प्रतिबंधक प्रक्रिया याच्या मिलाफातून ही गळती आता कायमस्वरुपी थांबविण्यात अभियंत्यांना यश आले आहे.गेली तीन वर्षे नियोजनबद्ध काम करत धरणाची गळती १०० टक्के थांबवण्यात आली आहे, यामुळे अद्यापि पाण्याचा साठा आहे. नदीत सोडले जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. धरणातून पाइपलाइनद्वारे हे पाणी जॅकवेलना जोडले तर पाणीपुरवठा सुरळीत होऊन पाणीटंचाई समस्या राहणार नाही.- प्रकाश पोळ, शाखा अभियंता,जलसंपदा पाटबंधारे विभाग