शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

जिल्ह्यात ढगाळ वातावरण, रब्बी पिकाला धोका; शेतकरी चिंतेत

By राजेश भोस्तेकर | Updated: January 10, 2024 11:53 IST

जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू आहे.

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : जिल्ह्यात दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. थंडी ही कमी होऊन गर्मी सुरू झाली आहे. त्यात मंगळवारी जिल्ह्यातील काही भागात अवेळी पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी सकाळपासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ झाले आहे. काही भागात तुरळक पावसाच्या सरी पडल्या आहेत. थंडीत पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू आहे. कडधान्य, पांढरा कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. आंबा, काजू फळपिके मोहोर धरू लागला आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर पासून थंडी हंगाम सुरू झाल्याने रब्बी पिकांना चांगले वातावरण तयार झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील वातावरणात बदल सुरू झाला आहे. थंडीची तीव्रताही कमी झाल्याने गर्मी वाटू लागली आहे. त्यात मंगळवार पासून पावसाचे विघ्नही आले आहे. 

मंगळवारी जिल्ह्यातील दक्षिण भागात सायंकाळी पावसाच्या सरी पडल्या. तर रात्री अलिबाग तालुक्यातील काही भागात पावसाने सुरुवात केली होती. जिल्ह्यात वाल, मूग, चवळी, हरभरा ही कडधान्य शेतकऱ्यांनी लावली आहेत. अलिबाग मध्ये पांढरा कांदा ही लावला असून पीक तयार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र अशावेळी पावसाचे आगमन झाले असल्याने या पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हा चिंतेत सापडला आहे. 

जिल्ह्यातील वाल पोपटीला मुकण्याची शक्यता

जिल्ह्यात वाल पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील वाल हा प्रसिद्ध असून वालाच्या शेंगा ह्या पोपटीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र पावसाने हजेरी लावल्याने वाल पीक हे धोक्यात येऊ शकते. त्यामुळे यंदा पावसामुळे पोपटीला जिल्ह्यातील वाल मिळणे अवघड झाल्यास पुण्याच्या वालावर पोपटीची चव चाखावी लागणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसalibaugअलिबाग