शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जिल्ह्यात ढगाळ वातावरण, रब्बी पिकाला धोका; शेतकरी चिंतेत

By राजेश भोस्तेकर | Updated: January 10, 2024 11:53 IST

जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू आहे.

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : जिल्ह्यात दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. थंडी ही कमी होऊन गर्मी सुरू झाली आहे. त्यात मंगळवारी जिल्ह्यातील काही भागात अवेळी पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी सकाळपासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ झाले आहे. काही भागात तुरळक पावसाच्या सरी पडल्या आहेत. थंडीत पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू आहे. कडधान्य, पांढरा कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. आंबा, काजू फळपिके मोहोर धरू लागला आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर पासून थंडी हंगाम सुरू झाल्याने रब्बी पिकांना चांगले वातावरण तयार झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील वातावरणात बदल सुरू झाला आहे. थंडीची तीव्रताही कमी झाल्याने गर्मी वाटू लागली आहे. त्यात मंगळवार पासून पावसाचे विघ्नही आले आहे. 

मंगळवारी जिल्ह्यातील दक्षिण भागात सायंकाळी पावसाच्या सरी पडल्या. तर रात्री अलिबाग तालुक्यातील काही भागात पावसाने सुरुवात केली होती. जिल्ह्यात वाल, मूग, चवळी, हरभरा ही कडधान्य शेतकऱ्यांनी लावली आहेत. अलिबाग मध्ये पांढरा कांदा ही लावला असून पीक तयार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र अशावेळी पावसाचे आगमन झाले असल्याने या पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हा चिंतेत सापडला आहे. 

जिल्ह्यातील वाल पोपटीला मुकण्याची शक्यता

जिल्ह्यात वाल पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील वाल हा प्रसिद्ध असून वालाच्या शेंगा ह्या पोपटीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र पावसाने हजेरी लावल्याने वाल पीक हे धोक्यात येऊ शकते. त्यामुळे यंदा पावसामुळे पोपटीला जिल्ह्यातील वाल मिळणे अवघड झाल्यास पुण्याच्या वालावर पोपटीची चव चाखावी लागणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसalibaugअलिबाग