शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हारे गावाची नळपाणी योजना बंद

By admin | Updated: October 10, 2015 23:36 IST

कर्जत तालुक्यातील कोल्हारे कोल्हारे गावाची नळपाणी योजना गेल्या आठवड्यापासून बंद आहे. महावितरण कंपनीकडून वीज वाहून नेणारे नादुरुस्त खांब बदलले जात नाहीत.

नेरळ : कर्जत तालुक्यातील कोल्हारे कोल्हारे गावाची नळपाणी योजना गेल्या आठवड्यापासून बंद आहे. महावितरण कंपनीकडून वीज वाहून नेणारे नादुरुस्त खांब बदलले जात नाहीत. त्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होऊन पंप जळून जाण्याचे प्रमाण वाढले आहेत. महावितरण कंपनीविरुद्ध प्रचंड नाराजी कोल्हारे ग्रामस्थ यांच्यामध्ये पसरली असून, पाणीपुरवठा सामितीने जाहीर फलक लावून निषेध व्यक्त केला आहे. भारत निर्माणच्या पेयजल कार्यक्रमातून कोल्हारे येथील नळपाणी योजना तयार करण्यात आली होती. गतवर्षी या नळपाणी योजनेचे उद्घाटन झाले होते. या योजनेचे पाणी कोल्हारे गाव, बोपेले तसेच कातकरवाडी आणि रामकृष्णनगर या भागाला दिले जाते. उल्हास नदीवर उगम असलेल्या या नळपाणी योजनेचे पाणी विहिरीत आणून त्यावर विद्युत पंप लावण्यात आले आहेत. यासाठी कोल्हारे गावात असलेल्या रोहित्रामधून विजेचा पुरवठा केला आहे. वीज रोहित्रपासून उल्हास नदीवरील पंप हाऊस हे अंतर किमान दोन किलोमीटर आहे. यादरम्यान कोल्हारे कातकरवाडी असून, तेथे वीज पोहोचून ती पुढे पंप हाउस येथे जाते. त्या संपूर्ण मार्गात असलेले अनेक विजेचे खांब किमान २० वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक खांब जीर्णावस्थेत असून कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत; तर काही खांब झुकलेल्या अवस्थेत आहेत. कोल्हारे ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा आणि स्वछता समिती यांनी कर्जत आणि नेरळ येथील महावितरण कंपनीला याबाबत लेखी तक्र ारी केल्या आहेत. मात्र महावितरण कंपनीकडून नादुरुस्त विजेच्या खांबाची दुरु स्ती करण्यात न आल्याने पंपहाऊसमध्ये होणारा वीजपुरवठा खंडित स्वरूपात आहे.गेल्या सहा महिन्यांत तब्बल १० वेळा वीजपंप नादुरु स्त झाले आहेत. त्यावर आतापर्यंत कोल्हारे पाणीपुरवठा समितीने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र महावितरणने कोल्हारे नळपाणी योजनेला अखंडित वीजपुरवठ्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष राहुल गोमारे यांनी केला आहे. आठ दिवसांपासून नादुरुस्त वीजवाहिन्यांमुळे कमी दाबाने वीज पंपहाऊसपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कोल्हारे गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. रहिवाशांचे प्रचंड हाल सुरू असून, महिलांना डोक्यावर हंडे घेऊन उल्हास नदीवर जावे लागत आहे. या सर्व प्रकरणास पूर्णपणे महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप कोल्हारे पाणीपुरवठा समितीने केला आहे. (वार्ताहर)