शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

कोल्हारे गावाची नळपाणी योजना बंद

By admin | Updated: October 10, 2015 23:36 IST

कर्जत तालुक्यातील कोल्हारे कोल्हारे गावाची नळपाणी योजना गेल्या आठवड्यापासून बंद आहे. महावितरण कंपनीकडून वीज वाहून नेणारे नादुरुस्त खांब बदलले जात नाहीत.

नेरळ : कर्जत तालुक्यातील कोल्हारे कोल्हारे गावाची नळपाणी योजना गेल्या आठवड्यापासून बंद आहे. महावितरण कंपनीकडून वीज वाहून नेणारे नादुरुस्त खांब बदलले जात नाहीत. त्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होऊन पंप जळून जाण्याचे प्रमाण वाढले आहेत. महावितरण कंपनीविरुद्ध प्रचंड नाराजी कोल्हारे ग्रामस्थ यांच्यामध्ये पसरली असून, पाणीपुरवठा सामितीने जाहीर फलक लावून निषेध व्यक्त केला आहे. भारत निर्माणच्या पेयजल कार्यक्रमातून कोल्हारे येथील नळपाणी योजना तयार करण्यात आली होती. गतवर्षी या नळपाणी योजनेचे उद्घाटन झाले होते. या योजनेचे पाणी कोल्हारे गाव, बोपेले तसेच कातकरवाडी आणि रामकृष्णनगर या भागाला दिले जाते. उल्हास नदीवर उगम असलेल्या या नळपाणी योजनेचे पाणी विहिरीत आणून त्यावर विद्युत पंप लावण्यात आले आहेत. यासाठी कोल्हारे गावात असलेल्या रोहित्रामधून विजेचा पुरवठा केला आहे. वीज रोहित्रपासून उल्हास नदीवरील पंप हाऊस हे अंतर किमान दोन किलोमीटर आहे. यादरम्यान कोल्हारे कातकरवाडी असून, तेथे वीज पोहोचून ती पुढे पंप हाउस येथे जाते. त्या संपूर्ण मार्गात असलेले अनेक विजेचे खांब किमान २० वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक खांब जीर्णावस्थेत असून कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत; तर काही खांब झुकलेल्या अवस्थेत आहेत. कोल्हारे ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा आणि स्वछता समिती यांनी कर्जत आणि नेरळ येथील महावितरण कंपनीला याबाबत लेखी तक्र ारी केल्या आहेत. मात्र महावितरण कंपनीकडून नादुरुस्त विजेच्या खांबाची दुरु स्ती करण्यात न आल्याने पंपहाऊसमध्ये होणारा वीजपुरवठा खंडित स्वरूपात आहे.गेल्या सहा महिन्यांत तब्बल १० वेळा वीजपंप नादुरु स्त झाले आहेत. त्यावर आतापर्यंत कोल्हारे पाणीपुरवठा समितीने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र महावितरणने कोल्हारे नळपाणी योजनेला अखंडित वीजपुरवठ्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष राहुल गोमारे यांनी केला आहे. आठ दिवसांपासून नादुरुस्त वीजवाहिन्यांमुळे कमी दाबाने वीज पंपहाऊसपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कोल्हारे गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. रहिवाशांचे प्रचंड हाल सुरू असून, महिलांना डोक्यावर हंडे घेऊन उल्हास नदीवर जावे लागत आहे. या सर्व प्रकरणास पूर्णपणे महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप कोल्हारे पाणीपुरवठा समितीने केला आहे. (वार्ताहर)