शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

स्वच्छतेतून समृद्धी निश्चित- डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 07:13 IST

अस्वच्छता दूर करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून ती वैयक्तिक मानून स्वच्छता केल्यास सर्वात मोठा फायदा आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास होईल व देश समृद्ध होईल.

रेवदंडा : आपला देश खरोखरच सुजलाम, सुफलाम होण्यासाठी स्वच्छतेतूनच समृद्धता निश्चित येते, यासाठी अस्वच्छता दूर करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून ती वैयक्तिक मानून स्वच्छता केल्यास सर्वात मोठा फायदा आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास होईल व देश समृद्ध होईल.प्रथम दर्शनी अनेकांना हे विचार पटणार नाहीत; परंतु शांतपणे खोलवर जाऊन विचार केल्यास स्वच्छता ही समृद्धीकडे नेणारी असल्याचे लक्षात येईल, असे मार्गदर्शक विचार ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची जंयती व निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत रेवदंडा परिसरात श्रीसदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. त्याप्रसंगी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी बोलत होते. या स्वच्छता मोहिमेत गावातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ता, बसस्थानक, विविध नाके चकाचक करण्यात आले.। डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे विविध उपक्रमडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत सातत्याने समाजोपयोगी उपक्र म राज्यभर राबवले जातात, त्यामध्ये प्रामुख्याने वृक्षलागवड आणि संवर्धन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, दाखले वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांना मदत, उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर, जनजागृती शिबिर, पाणपोई, आपद्ग्रस्तांना मदत यासारखे अनेक उपक्र म राबवले जातात.गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठानमार्फत देशभरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. त्यांच्या या महान कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत त्यांनी ज्येष्ठ निरु पणकार डॉ. आप्पासाहेब तथा दत्तात्रेय धर्माधिकारी यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली. देशभरातील सर्वच स्तरातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत आपापले योगदान दिले. त्यामुळेच स्वच्छ भारत अभियानाला योग्य दिशा मिळाली आणि स्वच्छ भारत अभियान यशस्वी झाले.