शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

स्वच्छता योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल, रायगडचे माजी जिल्हाधिकारी निपुण विनायक यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 05:28 IST

डॉ. निपुण विनायक यांच्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानास राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप बनविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या या अनन्यसाधारण कामगिरीस राष्ट्रीय स्तरावर राजमान्यता देऊन, त्यांच्या कामाचा आदर्श ठेवून त्यांचे अनुकरण व्हावे, या हेतूने त्यांना हा विशेष राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय ज्युरी मंडळाने एकमताने घेतला आहे.

- जयंत धुळपअलिबाग : राष्ट्रीय स्वच्छता अभियान अमलात येण्यापूर्वी आपल्या स्तरावर कचरामुक्त जिल्हा संकल्पना यशस्वी करून त्यानंतरच्या टप्प्यात राष्ट्रीय स्वच्छता अभियानात राष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण योगदान देणारे रायगडचे माजी जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे संचालक तथा केंद्र सरकारमधील विद्यमान उपसचिव डॉ. निपुण विनायक यांची विख्यात शास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. आर. ए. माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील देशातील मान्यवर संस्थांच्या १३ प्रतिनिधींच्या ज्युरी मंडळाने निवड केली आहे.इंडिया सॅनिटेशन कोएलिशन या नैना लाल किडवई यांच्या अध्यक्षतेखाली देशातील स्वच्छता विषयक उपक्रमास सहकार्य करणारी संस्था आणि फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने या ज्युरी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. निपुण विनायक यांच्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानास राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप बनविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या या अनन्यसाधारण कामगिरीस राष्ट्रीय स्तरावर राजमान्यता देऊन, त्यांच्या कामाचा आदर्श ठेवून त्यांचे अनुकरण व्हावे, या हेतूने त्यांना हा विशेष राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय ज्युरी मंडळाने एकमताने घेतला आहे.चंदिगडमध्ये जन्म झालेले डॉ. निपुण विनायक यांचे शालेय शिक्षण चंदिगडमध्येच झाले. सन २००१मध्ये चंदिगड सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी सुवर्ण पदकासह एमबीबीएस पदवी संपादन केली. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेकरिता (आयएएस) निवड झाल्यावर त्यांनी लालबहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन येथे आयएएस प्रशिक्षणादरम्यान, त्यांना ‘डायरेक्टर बेस्ट आॅल राउंड ट्रायनी अ‍ॅवॉर्ड’सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.महाराष्ट्रात जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू झाल्यावर आपल्या अनोख्या कार्यपद्धतीतून प्रशासकीय सुधारणांसाठी असलेल्या राजीव गांधी अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट काम करून दाखविले होते. त्यांच्या या राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन, तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय राजीव गांधी अभियान पुरस्कारातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले होते. नांदेड महापालिका आयुक्त म्हणून देखील त्याची कारकिर्द लोकसहभागातून परिवर्तन घडवून आणण्यात यशस्वी ठरली होती.‘कचराकुंडीमुक्त अलिबाग’ पहिले यशसार्वजनिक हिताच्या व उपयुक्ततेच्या उपक्रमांच्या यशस्वीतेकरिता ‘उत्कटता, सहभाग आणि भागीदारी’ अशा त्रिसूत्रीची निर्मिती डॉ. निपुण विनायक यांनी करून त्यायोगे विविध विकास प्रकल्पांमध्ये शासनासह लोकप्रतिनिधी व जनसामान्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्यात रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना, आगळे यश मिळविले होते. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या सहभागाने डॉ. विनायक यांनी यशस्वी केलेले ‘कचराकुंडीमुक्त अलिबाग’ अभियान, हे स्वच्छ भारत अभियानाच्या यशाचे पहिले यश होते.युनोसेफ द्वारा पुस्तक प्रकाशनडॉ. विनायक यांनी देशातील विविध २० राज्यांचा अभ्यास करून, अस्वच्छतेबाबतच्या जनसामान्यांच्या सवयी बदलण्याकरिता त्यांनी केलेले उपक्रम महत्त्वपूर्ण व प्रभावी ठरले आहेत.याच अनुषंगाने त्यांनी लिहिलेली स्वच्छता विषयक पुस्तके पुणे येथील यशदा या संस्थेने, तर ‘शिक्षण आणि आरोग्यामधील नवकल्पना’ हे पुस्तक युनोसेफ द्वारा प्रकाशित करण्यात आले आहे.डॉ. निपुण विनायक यांनी जिल्हास्तरावर राबवून लोकसहभागातून यशस्वी केलेल्या सार्वजनिक हितांच्या अनेक उपक्रमांची अंमलबजावणी राज्यस्तरावर तर स्वच्छता अभियान या उपक्रमाची राष्ट्रीयस्तरावर अंमलबजावणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Raigadरायगड