शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

पाली शहर समस्यांच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:04 IST

अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराचा विकास दिवसेंदिवस होत आहे.

- विनोद भोईर पाली : अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराचा विकास दिवसेंदिवस होत आहे. मागील काही वर्षांपासून विविध कारणांनी पालीचा विस्तार झाला आहे. लोकसंख्या वाढली आहे. मात्र येथील नाले व गटारे यांची नियोजनानुसार बांधणी व विस्तार झाला नाही. परिणामी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाली शहरात सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न जटील बनत चालला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील आ वासून उभा राहिला आहे. संबंधितांनी या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.मुख्यालयाचे ठिकाण असल्याने पालीत आजूबाजूच्या गावातील लोक कामानिमित्त व मुलांच्या शिक्षणासाठी राहत आहेत. नोकरी व कामधंद्यानिमित्त आलेले अनेक लोक येथे स्थायिक झालेत. तसेच तालुक्याची मोठी बाजारपेठ असल्याने व्यापार व उद्योगाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे मागील पाच ते दहा वर्षात पालीचा विस्तार चारही बाजूने झाला आहे. कौलारू घरे जाऊन इमारती व बंगले उभे राहिले. गावठाण जमिनीबरोबरच भोवतालच्या शेतजमिनी बिगरशेती करून तेथे नगरे व वसाहती निर्माण झाल्या आहेत. पण हे सर्व होत असताना सर्वात महत्त्वाची बाब दुर्लक्षित झाली आणि ती म्हणजे सांडपाणी व्यवस्था. पाली शहरात गटारे व नाले आहेत. मात्र कित्येक वर्षांपासून नवीन गटारे व नाले निर्माण झालेले नाहीत. असलेले नाले व गटारे खूपच अरुंद आहेत. तसेच त्यांची वेळीच योग्यप्रकारे साफसफाई व दुरुस्ती होत नाही. परिणामी आपल्या क्षमतेपेक्षा अधिक ताण ही गटारे व नाले झेलत आहेत. सगळ्यात गंभीर अवस्था आहे ती येथील बल्लाळेश्वर नगर, धुंदीविनायक नगर, चर्मकार वाड्याशेजारी झालेल्या नवीन वसाहती, इंदिरानगर येथील. येथे गटारे आणि नाले यांचे पुरेसे जाळेच नाही, तर काही ठिकाणी घरे व इमारतींचे सांडपाणी कोणत्याच मुख्य गटार किंवा नाल्याला जोडलेले नाही. ते थेट मोकळ्या जागेत सोडलेले आहे. येथील भाग उंच सखल देखील आहेत. परिणामी पावसाळ्यात येथे सर्वत्र सांडपाणी तुंबते.पावसाळ्याच्या सुरुवातीस तात्पुरत्या स्वरूपात पालीमध्ये नालेसफाईला सुरुवात होते. मात्र वर्षभर नाले व गटारे पाणी बॉटल, प्लॅस्टिकच्या पिशव्या, घरगुती कचरा, गाळाने भरतात. आणि सफाई केल्यावरही काही नागरिक पुन्हा गटारे व नाल्यात कचरा टाकतात. परिणामी पावसाळ्यात नाले गटारे तुंबतात. या तुंबलेल्या गटारांमुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरते व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या त्रासामुळे जनतेसह भाविकही बेजार झाले आहेत.यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांसह येणाऱ्या भाविकांकडून होत आहे.>अंतर्गत रस्त्यांची दुर्दशासुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या पालीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खडतर व खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांसह वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याआधी ठिकठिकाणी फुटलेल्या रस्त्यांवर आता पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यांचा आकार व खोली दुपटीने वाढली आहे. यामुळे नागरिकांसह बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.स्टेट बँकेपासून महाकाली मंदिरापर्यंतचा रस्ता हिवाळ्यात ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आला. मात्र ग्रामपंचायतीकडे रस्ते दुरुस्ती व देखभालीसाठी निधी उपलब्ध नसल्याने त्यावेळी इतर रस्ते दुरुस्त करता आले नाहीत असे ग्रामपंचायती मार्फत सांगितले. येथील सावंत आळी, राम आळी व मधल्या आळीपासून बल्लाळेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता, तसेच भोई आळी, बसस्थानक रस्ता देखील खराब झाला आहे. बस स्थानकाजवळील मार्गावर तर आता भले मोठे खड्डे पडले आहेत. येथून जाणाºया सर्व बस व खाजगी वाहने हमखास या खड्ड्यांमध्ये आदळतात. त्याचबरोबर बल्लाळेश्वर नगर, धुंडीविनायक नगर व शिळोशी आणि मढाळी गावाकडे जाणाºया रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. जिल्हा परिषद शाळा व टॉपवर्थ हायस्कूलकडे जाणाºया रस्त्याची देखील अवस्था बिकट आहे. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते तसेच ते रस्त्यावर देखील साठते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पालीत येणाºया भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना त्रास होतो. वाहन चालविताना अनेक अडचणी येतात. खड्ड्यात पाणी असल्याने व त्यामुळे अंदाज न आल्याने काही ठिकाणी वाहन जोरात खड्ड्यात आदळते. खड्ड्यातून बाहेर आलेल्या खडीमुळे वाहने घसरतात. दुचाकीस्वारांचा तर खड्डे चुकविताना अनेक वेळा तोल जातो. तसेच भाविक, विद्यार्थी व पादचाऱ्यांना येथून मार्ग काढताना अडचणी येतात. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना खराब रस्त्याचा त्रास होतो. लवकरात लवकर पालीतील रस्ते खड्डेमुक्त करावेत अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.येथील भोई आळी, आगर आळी, राम आळी, खडक आळी, कुंभार आळी, मधली आळी, सोनार आळी, कासार आळी, बल्लाळेश्वर नगर, बेगर आळी, वरचा देऊळवाडा, कासार आळी व बल्लाळेश्वर मंदिराच्या भोवतालच्या परिसरातील नाले व गटारे वारंवार तुंबतात.एवढेच काय तर तेथील गटारे व नाल्यांची अवस्था बिकट झाली आहे. साठलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांचा उपद्रव वाढतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नालेसफाई व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांनाही या घाणीचा व दुर्गंधीचा त्रास होत आहे.पावसाळ्यात तर या तुंबलेल्या नाल्याचे व गटाराचे पाणी रस्त्यावर येवून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. तसेच रोगराईला आमंत्रण मिळते. अशी परिस्थिती अजून किती दिवस झेलायची? असा प्रश्न सामान्य नागरिक करतात.