शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नागरिकांनी पावसाळ्यात काळजी घ्यावी

By admin | Updated: June 28, 2017 03:32 IST

पावसाळा सुरू झाला आहे. तप्त उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असताना पिण्याच्या पाण्यातून अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पावसाळा सुरू झाला आहे. तप्त उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असताना पिण्याच्या पाण्यातून अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अतिवृष्टी आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींनादेखील प्रसंगी सामोरे जावे लागते. आपत्ती निवारणाकरिता आपत्तीअंती करावयाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण नुकतेच जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांत एनडीआरएफच्या माध्यमातून देण्यात आले आहे. तरीसुद्धा व्यक्तिगत पातळीवर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याने शासन व आपत्ती निवारण यंत्रणा यांच्याकडून विशेष आवाहन जनतेस करण्यात आले आहे.दूषित पाण्यामुळे अनेक आजारांची शक्यता असते. हे आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरावे. शेतावर कामाकरिता जाताना घरचे शुद्ध पाणी सोबत घेऊन जावे, शेतातील नाले-ओढ्यांचे वा विहिरीचे पाणी पिऊ नये. गावातील विहिरींचे शुद्धिकरण जलसुरक्षकांकडून नियमित करून घ्यावे. अनोळखी तथा नवीन विहिरीचे पाणी शुद्ध केल्यावर अथवा खात्री झाल्याशिवाय सेवन करू नये. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावर शौचास बसू नये. लहान मुलांनादेखील उघड्यावर शौचास बसवू नये. व्यक्तिगत शौचालय बांधून त्याचा वापर करावा. परिसरात नाले, गटारी, डबकी साचू नये, याबाबत दक्ष राहावे.आठवड्यात एक कोरडा दिवस पाळावा. सर्व पाणी, पाण्याची सर्व भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून, धुवून, पुसून कोरडी करून ठेवावी. डासांच्या अळ्या पाण्यामध्ये होऊ देऊ नये. सांडपाण्यासाठी शोषखडा व परसबाग निर्माण करावी. उघड्यावरचे अन्न व शिळे अन्न खाऊ नये. दूषित मांस व फळे खाऊ नयेत. आजारी व्यक्ती व लहान मुलांना पाणी उकळून गार करून प्यावयास द्यावे. अतिसार, थंडी, ताप आदी आजारांची साथ आल्यास आशा, नर्स, आरोग्यसेवकांकडून त्वरित उपचार करून घ्यावा. त्याचबरोबर जवळच्या प्राथमिक आरोग्यकेंद्राशी संपर्क साधावा. ग्रामसेवक जलसुरक्षक यांना कळवावे. अतिसाराच्या आजारामध्ये जलशुष्कतेसाठी ओआरएस तथा संजीवनी (साखर, मीठ, पाणी) याचा वापर करावा. ताबडतोब उपचार करून घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे. हाथपंप, विहीर, नळगळती, व्हाल्व लिकेज, परिसर स्वच्छ असावा, विहिरीजवळ भांडी, कपडे, प्राणी धुऊ नये. हगवण, अतिसार, कावीळ आदी साथी असल्यास पिण्याच्या पाण्यामध्ये क्लोरीन, लिक्विड पावडर टाकूनच प्यावे. कुठेही पाणी तुंबून असल्यास ते वाहते करावे. आजारी व्यक्ती व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.पाऊस व विजेचा कडकडाट चालू असताना, झाडाखाली उभे राहू नये. वीज कडकडाट चालू असताना टीव्ही बंद करावा, मोबाइलवर बोलणे टाळावे, दुचाकी वाहन चालविताना रस्त्यावर, शेडखाली थांबावे, झाडाखाली थांबू नये, गावात पूर, अतिवृष्टी, घरांची पडझड, वीज पडणे, तथा घातक परिस्थिती असल्यास आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचित करावे व सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.