शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
5
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
6
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
7
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
8
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
9
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
11
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
13
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
14
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
15
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
16
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
17
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
18
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
19
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
20
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

जिल्ह्यातील नागरिकांनी पावसाळ्यात काळजी घ्यावी

By admin | Updated: June 28, 2017 03:32 IST

पावसाळा सुरू झाला आहे. तप्त उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असताना पिण्याच्या पाण्यातून अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पावसाळा सुरू झाला आहे. तप्त उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असताना पिण्याच्या पाण्यातून अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अतिवृष्टी आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींनादेखील प्रसंगी सामोरे जावे लागते. आपत्ती निवारणाकरिता आपत्तीअंती करावयाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण नुकतेच जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांत एनडीआरएफच्या माध्यमातून देण्यात आले आहे. तरीसुद्धा व्यक्तिगत पातळीवर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याने शासन व आपत्ती निवारण यंत्रणा यांच्याकडून विशेष आवाहन जनतेस करण्यात आले आहे.दूषित पाण्यामुळे अनेक आजारांची शक्यता असते. हे आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरावे. शेतावर कामाकरिता जाताना घरचे शुद्ध पाणी सोबत घेऊन जावे, शेतातील नाले-ओढ्यांचे वा विहिरीचे पाणी पिऊ नये. गावातील विहिरींचे शुद्धिकरण जलसुरक्षकांकडून नियमित करून घ्यावे. अनोळखी तथा नवीन विहिरीचे पाणी शुद्ध केल्यावर अथवा खात्री झाल्याशिवाय सेवन करू नये. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावर शौचास बसू नये. लहान मुलांनादेखील उघड्यावर शौचास बसवू नये. व्यक्तिगत शौचालय बांधून त्याचा वापर करावा. परिसरात नाले, गटारी, डबकी साचू नये, याबाबत दक्ष राहावे.आठवड्यात एक कोरडा दिवस पाळावा. सर्व पाणी, पाण्याची सर्व भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून, धुवून, पुसून कोरडी करून ठेवावी. डासांच्या अळ्या पाण्यामध्ये होऊ देऊ नये. सांडपाण्यासाठी शोषखडा व परसबाग निर्माण करावी. उघड्यावरचे अन्न व शिळे अन्न खाऊ नये. दूषित मांस व फळे खाऊ नयेत. आजारी व्यक्ती व लहान मुलांना पाणी उकळून गार करून प्यावयास द्यावे. अतिसार, थंडी, ताप आदी आजारांची साथ आल्यास आशा, नर्स, आरोग्यसेवकांकडून त्वरित उपचार करून घ्यावा. त्याचबरोबर जवळच्या प्राथमिक आरोग्यकेंद्राशी संपर्क साधावा. ग्रामसेवक जलसुरक्षक यांना कळवावे. अतिसाराच्या आजारामध्ये जलशुष्कतेसाठी ओआरएस तथा संजीवनी (साखर, मीठ, पाणी) याचा वापर करावा. ताबडतोब उपचार करून घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे. हाथपंप, विहीर, नळगळती, व्हाल्व लिकेज, परिसर स्वच्छ असावा, विहिरीजवळ भांडी, कपडे, प्राणी धुऊ नये. हगवण, अतिसार, कावीळ आदी साथी असल्यास पिण्याच्या पाण्यामध्ये क्लोरीन, लिक्विड पावडर टाकूनच प्यावे. कुठेही पाणी तुंबून असल्यास ते वाहते करावे. आजारी व्यक्ती व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.पाऊस व विजेचा कडकडाट चालू असताना, झाडाखाली उभे राहू नये. वीज कडकडाट चालू असताना टीव्ही बंद करावा, मोबाइलवर बोलणे टाळावे, दुचाकी वाहन चालविताना रस्त्यावर, शेडखाली थांबावे, झाडाखाली थांबू नये, गावात पूर, अतिवृष्टी, घरांची पडझड, वीज पडणे, तथा घातक परिस्थिती असल्यास आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचित करावे व सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.