शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नागरिकांनी पावसाळ्यात काळजी घ्यावी

By admin | Updated: June 28, 2017 03:32 IST

पावसाळा सुरू झाला आहे. तप्त उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असताना पिण्याच्या पाण्यातून अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पावसाळा सुरू झाला आहे. तप्त उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असताना पिण्याच्या पाण्यातून अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अतिवृष्टी आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींनादेखील प्रसंगी सामोरे जावे लागते. आपत्ती निवारणाकरिता आपत्तीअंती करावयाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण नुकतेच जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांत एनडीआरएफच्या माध्यमातून देण्यात आले आहे. तरीसुद्धा व्यक्तिगत पातळीवर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याने शासन व आपत्ती निवारण यंत्रणा यांच्याकडून विशेष आवाहन जनतेस करण्यात आले आहे.दूषित पाण्यामुळे अनेक आजारांची शक्यता असते. हे आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरावे. शेतावर कामाकरिता जाताना घरचे शुद्ध पाणी सोबत घेऊन जावे, शेतातील नाले-ओढ्यांचे वा विहिरीचे पाणी पिऊ नये. गावातील विहिरींचे शुद्धिकरण जलसुरक्षकांकडून नियमित करून घ्यावे. अनोळखी तथा नवीन विहिरीचे पाणी शुद्ध केल्यावर अथवा खात्री झाल्याशिवाय सेवन करू नये. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावर शौचास बसू नये. लहान मुलांनादेखील उघड्यावर शौचास बसवू नये. व्यक्तिगत शौचालय बांधून त्याचा वापर करावा. परिसरात नाले, गटारी, डबकी साचू नये, याबाबत दक्ष राहावे.आठवड्यात एक कोरडा दिवस पाळावा. सर्व पाणी, पाण्याची सर्व भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून, धुवून, पुसून कोरडी करून ठेवावी. डासांच्या अळ्या पाण्यामध्ये होऊ देऊ नये. सांडपाण्यासाठी शोषखडा व परसबाग निर्माण करावी. उघड्यावरचे अन्न व शिळे अन्न खाऊ नये. दूषित मांस व फळे खाऊ नयेत. आजारी व्यक्ती व लहान मुलांना पाणी उकळून गार करून प्यावयास द्यावे. अतिसार, थंडी, ताप आदी आजारांची साथ आल्यास आशा, नर्स, आरोग्यसेवकांकडून त्वरित उपचार करून घ्यावा. त्याचबरोबर जवळच्या प्राथमिक आरोग्यकेंद्राशी संपर्क साधावा. ग्रामसेवक जलसुरक्षक यांना कळवावे. अतिसाराच्या आजारामध्ये जलशुष्कतेसाठी ओआरएस तथा संजीवनी (साखर, मीठ, पाणी) याचा वापर करावा. ताबडतोब उपचार करून घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे. हाथपंप, विहीर, नळगळती, व्हाल्व लिकेज, परिसर स्वच्छ असावा, विहिरीजवळ भांडी, कपडे, प्राणी धुऊ नये. हगवण, अतिसार, कावीळ आदी साथी असल्यास पिण्याच्या पाण्यामध्ये क्लोरीन, लिक्विड पावडर टाकूनच प्यावे. कुठेही पाणी तुंबून असल्यास ते वाहते करावे. आजारी व्यक्ती व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.पाऊस व विजेचा कडकडाट चालू असताना, झाडाखाली उभे राहू नये. वीज कडकडाट चालू असताना टीव्ही बंद करावा, मोबाइलवर बोलणे टाळावे, दुचाकी वाहन चालविताना रस्त्यावर, शेडखाली थांबावे, झाडाखाली थांबू नये, गावात पूर, अतिवृष्टी, घरांची पडझड, वीज पडणे, तथा घातक परिस्थिती असल्यास आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचित करावे व सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.