शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

'शेकाप'चा झाला 'भाकाप', सोबतीला काँग्रेस, अशी ही महाखिचडी - मुख्यमंत्र्यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 19:46 IST

शेकाप हा एकेकाळी शेतकरी आणि कामगारांचा पक्ष होता. पण, आता तो ‘भाकाप’ झाला. भांडवलदार आणि कारखानदारी करणाऱ्यांचा पक्ष झाला आहे. सोबतीला काँग्रेसही आहे. अशी महाखिचडी आहे.

पेण - काँग्रेस-राष्ट्रवादीची अनाचारी, दुराचारी, अत्याचारी, भ्रष्टाचारी अशी ही कारकिर्द आपण पाहिली. पण, आता तो जमाना गेला. या मतदारसंघात शेकापने सुद्धा त्यांना पाठिंबा दिला. शेकाप हा एकेकाळी शेतकरी आणि कामगारांचा पक्ष होता. पण, आता तो ‘भाकाप’ झाला. भांडवलदार आणि कारखानदारी करणाऱ्यांचा पक्ष झाला आहे. सोबतीला काँग्रेसही आहे. अशी महाखिचडी आहे. यांनी सामान्यांचा विचार कधीच केला नाही आणि अगदी मुलभूत गरजांपासून सुद्धा लोकांना वंचित ठेवले असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेकापसह काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला.

रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण येथे भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ पैशासाठी महाराष्ट्रावर राज्य केले आणि सत्तेतून पैसा अन् पैशातून पुन्हा सत्ता असे एक दृष्टचक्र निर्माण केले. सामान्य माणसांच्या गरजांकडे या पक्षांनी पूर्णत: दुर्लक्ष केले आणि अगदी मुलभूत गरजांपासून सुद्धा त्यांना वंचित ठेवले असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या 5 वर्षांत एक नवी कार्यसंस्कृती आम्ही रूजविली आणि गतिमान विकासाचा मार्ग पत्करला. पाणीपुरवठ्याच्या योजना असो की मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प सर्वांना गती दिली. आता तर हा भाग एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा उपलब्ध होत आहे. रस्ते, रेल्वे, बंदरविकास, जलवाहतूक अशी मोठी कामे आता होत आहेत. त्यातून दळणवळणाच्या सोयी तर निर्माण होतच आहेत, शिवाय मोठ्या संधी सुद्धा उपलब्ध होत आहेत. मासेमार बांधवांसाठी सुद्धा अनेक कल्याणकारी योजना आणि उपाय हाती घेण्यात आले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaval-pcमावळRaigadरायगड