शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सुदर्शन कंपनीत टँकरमधून रसायन गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 02:22 IST

नाला प्रदूषित झाल्याने माशांचा मृत्यू : बारसोली, किल्ला ग्रामस्थांना वायू प्रदूषणाचा त्रास

रोहा : रोहा धाटाव येथील सुदर्शन कंपनीत अपघातांची मालिका सुरूच असून कंपनीत टँकरमधून रसायन गळती झाल्याने शेजारील बारसोली, किल्ला आदी गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणाचा त्रास झाला. त्याचबरोबर सांडपाण्याने येथील नाला प्रदूषित झाल्याने मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली, परिणामी येथिल ग्रामस्थांनी कंपनीत धडक देत आपला संताप व्यक्त केला आणि कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरले. यासर्व प्रकाराने औद्योगिक परिसरात मात्र खळबळ माजली.धाटाव औद्योगिक वसाहतीमधील सुदर्शन कंपनीतील छोटे मोठे अपघात सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कंपनीच्या आवारात उभा असलेला हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड या विघातक रसायनाने भरलेल्या टँकरमधून अचानक गळती सुरू झाली. या टँकरमध्ये पंधरा हजार लिटर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड होते. जमिनीवर हे रसायन पडले आणि त्यातून दूषित वाफ निघु लागली, ती वातावरणात पसरत परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले. याचा त्रास नजिकच्या बारसोली व किल्ला गावातील नागरिकांना जाणवू लागला. या रसायनाची तीव्रता कमी करण्यासाठी पाण्याचा मारा प्रमाणात केला असता कंपनीच्या बाजुलाच असणा-या नैसर्गिक नाल्यात हे पाणी गेले. त्यामुळे नाल्याचे पाणी पिवळे होत या नाल्यातील शेकडो मासे मृत्युमुखी पडले होते.सध्या परतीच्या पावसाची सुरुवात झाल्याने आदिवासी बांधव याच नाल्यात तसेच पुढे नदीला मिळणा-या पाण्यात मासे पकडतात, त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. या नाल्यातील पाणी पुढे नदीला जाऊन मिळत असल्यामुळे कुंडलिकेत पाणी प्रदूषित होत जलचरांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त केली गेली. या घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीबाबत लगतच्या किल्ला व बारसोली गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी कंपनीत धडक देत व्यवस्थापक बि .एन. कदम यांना धारेवर धरत आपला रोष व्यक्त केला.कंपनी यार्डमध्ये हा टँकर लिकेज झाला. या घटनेबाबत नक्की कारण समजू शकले नसले तरी यामागची चौकशी आम्ही करत आहोत.- बि .एन.कदम, कंपनी व्यवस्थापकनिवडणूक कामात व्यस्ततेमुळे या घटनेची माहिती घेता आली नाही. मात्र यासंबंधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधून पुढील आवश्यक ती कारवाई करु.- कविता जाधव, तहसिलदार, रोहाटँकरमधून रसायन गळती झाल्यावर तातडीची उपाययोजना म्हणून त्यावर भरपूर प्रमाणात पाणी मारुन याचा त्रास आजुबाजुच्या नागरिकांना होऊ नये म्हणून काळजी घेतली.- सुदाम करपे, सुरक्षा अधिकारी