शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

बदललेली आसनव्यवस्था जिल्हा परिषदेसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:26 IST

रायगड जिल्हा परिषदेमधून पंचायत राज समिती जाऊन सुमारे एक महिन्याचा कालावधी लोटला आहे

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेमधून पंचायत राज समिती जाऊन सुमारे एक महिन्याचा कालावधी लोटला आहे, परंतु त्या समितीचे पडसाद अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनामध्ये दिसून येत आहेत. पंचायत राज समितीसाठी त्यावेळी कोट्यवधी रुपयांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यांच्याच सोयीसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या प्रशासकीय इमारतीमधील ना.ना. पाटील सभागृहातील अंतर्गत आसन व्यवस्थेची फेररचना करण्यात आली होती. तीच आता प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय झाली आहे. फेररचनेमुळे ७ डिसेंबर रोजी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खोपोली येथील एका रिसॉर्ट येथे पार पडणार असल्याची चर्चा आहे.राज्याचा कारभार चालवण्यासाठी दिशा ज्या विधिमंडळातून केली जाते त्याच धर्तीवर जिल्ह्याचा कारभार चालावा यासाठी प्रभाकर पाटील यांनी मोठ्या जिद्दीने शिवतीर्थ इमारत अलिबाग येथे उभी केली होती. राज्यकारभार करताना नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करणे, सर्वसाधारण सभा घेणे, अर्थसंकल्प सादर करणे यासाठी शिवतीर्थ इमारतीमधील सभागृह देखील राज्याला लाजवेल असेच आहे. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी, संबंधित उपमुख्यकार्यकारी अधिकारी, लेखाधिकारी, विविध खात्याचे सभापती हे व्यासपीठावर विराजमान होतात, तर जिल्हा परिषदेचे ५९ सदस्य आणि १५ पंचायत समितीचे सभापती हे व्यासपीठासमोर बसतात. त्याचप्रमाणे पत्रकारांनाही बसण्यासाठी समोरच व्यवस्था करण्यात आली होती.शिवतीर्थावरील सभागृह पाहिल्यावर विधिमंडळाची आठवण व्हायची, परंतु आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रायगड जिल्हा परिषदेच्या कारभाराची पाहणी करण्यासाठी पंचायत राज समिती दौऱ्यावर आली होती. त्यामध्ये सुमारे विविध राजकीय पक्षाचे १७ आमदारांचा समावेश होता. त्यांची बडदास्त ठेवण्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेने कोणतीच कसूर केली नाही. पंचायत राज समिती येणार म्हणून त्यांनी चक्क ना.ना.पाटील सभागृहाची आसन व्यवस्था पार बदलून टाकली. त्यांच्यासाठी राऊंड टेबल लावण्यात आले, तसेच चकचकीत कारपेट अंथरण्यात आले होते.पंचायत राज समिती ज्या उद्देशासाठी जिल्ह्यात आली होती तो उद्देश सफल झाल्यावर निघून गेली. मात्र ज्या ना.ना.पाटीलसभागृहाची आसन व्यवस्था बदलली त्यामुळे जिल्हा परिषदेच्या नियमित सभा तेथे घेणे अशक्य झाल्याचे दिसून येते. रचना बदलण्यात आल्यामुळे ५९ सदस्य, अधिकारी, सभापती,पंचायत समितीचे सभापती, विविध अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना सद्य ठिकाणी बसणे अशक्य आहे.>जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात घट७ डिसेंबर रोजी होणारी सर्वसाधारण सभा शिवतीर्थावर न घेता रिशीवन रिसॉर्टवर घ्यावी लागत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये आहे. पनवेल महानगर पालिका अस्तित्वात आल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे सुमारे ४० टक्के उत्पन्न घटले आहे. त्यामुळे विविध विकासकामे करताना जिल्हा परिषदेला फारच कसरत करावी लागत आहे, असे असताना खासगी रिसॉर्टवर अशा बैठका आयोजित करून काय साध्य होणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे.रायगड जिल्हा परिषदेतील सभा बाहेर घेण्याचा कायदेशीर अधिकार अध्यक्षांना आहे. तेत्यांच्या अधिकाराचा वापर करून तसा निर्णय घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा सचिव निखीलकुमार ओसवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.